शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

कोरोनाचे भय; गावे घाबरली, शहरे बावरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 20:42 IST

कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे सरकारी यंत्रणेवरील ताण वाढला

पणजी : राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढू लागल्याने व त्याविषयीच्या अफवांनाही वेग आल्याने काही तालुक्यांमधील छोटी गावे घाबरली आहेत. तर शहरे बावरून जाऊ लागली आहेत. ग्रामीण भागात लोक स्वत:हून आपले व्यवहार बंद ठेवू लागले आहेत. कोरोना रुग्ण कोणत्या गावात किती आहेत याची नेमकी माहिती सरकारही उघड करत नाही. पण आरोग्य खात्याचे काही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर व अशा कर्मचाऱ्यांची निवासस्थाने सत्तरी तालुक्यासह अन्य काही ठिकाणी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काही गावे घाबरूनच गेली आहेत.लोकांनी एकमेकांच्या घरी जाणे बंद केल्याची उदाहरणे गावांमध्ये सापडू लागली आहेत. सत्तरीतील गुळेली गावाने गावातील सगळी दुकाने स्वत:हून बंद ठेवली. लोक घरातच राहू लागले आहेत. बाहेर पडत नाहीत. हाच प्रकार काही प्रमाणात अन्य ठिकाणी पहायला मिळतो. नातेवाईक जास्त संख्येने एकमेकांच्या घरी जात नाहीत. मांगोरहीलला कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर सरकारी यंत्रणेवरील ताण वाढला. लोकांमधील वातावरणातही ताण अनुभवास येत आहे. सांगेतील एका गावातही चिंतेचे वातावरण आहे. मांगोरहीलमुळे पूर्ण वास्को परिसर चिंताग्रस्त बनला. आज रविवारी सायंकाळपासून वास्कोच्या भाजी विक्रेत्यांनी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोणता रुग्ण कोणत्या गावातील आहे हे सरकार जाहीर करत नाही पण लोकांना ते कळून येऊ लागले आहे. पोलिसांकडूनही लोकांना माहिती मिळते.राज्यात कोरोनाचे भय वाढल्यानेच राज्यातील मशीदी येत्या दि. 3० जूनपर्यंत खुल्या करायच्या नाहीत असे असोसिएशन ऑफ ऑल गोवा मुस्लिम जमातने जाहीर केले आहे. सरकारने येत्या सोमवारपासून मंदिरे, चर्चेस, मशीदी अशी प्रार्थनास्थळे खुली करता येतात पण तिथे सामूहिक सोहळे होऊ नयेत असे म्हटले होते. मात्र मशीद खुली करण्यास संघटना तयार नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या