शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

वेस्टर्न बायपासचा स्टील्ट प्रस्ताव केंद्रीय अंदाज समितीच्या विचारात: फ्रान्सिस सार्दिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 18:37 IST

मडगावात मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सार्दिन यांनी ही माहिती दिली.

मडगाव: वेस्टर्न बायपासचा खारेबांद ते तळेबांध दरम्यानचा रस्ता स्टील्टवरच बांधावा अशी मागणी बाणावलीच्या नागरिकंकडून होत असल्याच्या पाश्र्र्वभूमीवर दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी हा विषय केंद्र सरकारच्या अंदाज समितीकडे मांडला आहे. या बैठकीत यासंबंधी चर्चा झाली असून लवकरच हा विषय केंद्रीय दळणवळण मंत्रलयाकडे मांडला जाईल अशी माहिती सार्दिन यांनी दिली.

मडगावात मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सार्दिन यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणो केंद्रात अखत्यारित येणा:या प्रकल्पात जर फेरफार करायचा असेल तर अंदाजित खर्चाच्या वरचा निधी राज्य सरकारला द्यावा लागतो. वेस्टर्न बायपासचा हा भाग बॉक्स कल्वर्टवर बांधण्याचे ठरविल्यामुळे गोवा सरकारला 130 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. जर हा भाग स्टील्टवर उभा केला तर त्यासाठी 450 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत.

खर्च जरी वाढत असला तरी आगामी काळातील वाहतूक लक्षात घेऊन तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी हा दुसरा प्रस्ताव राज्य सरकारने मान्य करावा असे सार्दिन म्हणाले. काही काळानंतर केंद्राकडून राज्य सरकारला खर्च केलेल्या अतिरिक्त निधीचा परतावा मिळू शकेल असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, सार्दिन यांनी गोवा सरकारच्या एकंदरच कारभारावर टीका करताना सरकारचा गुप्तवार्ता विभागच कुचकामी असल्याचे उत्तर प्रदेशच्या त्या तोतया मंत्र्याने सिद्ध केले असे म्हटले. ते म्हणाले, उत्तर प्रदेश सरकारकडून कुठलाही संदेश आलेला नसताना त्या तोतया मंत्र्याला सरकारी पाहुणा म्हणून दर्जा कसा दिला गेला असा सवाल त्यांनी केला. गोवा सरकार सध्या कर्ज घेऊन प्रशासन चालवतो. राज्यावरील कर्जाचा बोजा 20 हजार कोटीवर पोहोचला आहे. बंद पडलेला खाण व्यवसायही सुरु करण्याबाबत सरकार काहीच करत नाही. केवळ आश्र्वासने देऊन लोकांची बोळवण केली जाते. खाण उद्योग सुरु करता येत नसेल तर सरकारने तसे जाहीर करावे असे आव्हान त्यांनी दिले.

सध्या नागरिकता दुरुस्ती कायद्यासंदर्भात देशभरात जो विरोध होत आहे त्यासंदर्भात बोलताना, भाजप सरकार धर्माच्या नावावर देशात फूट घालू पहात आहे. या सरकारात गुंडगिरी वाढली आहे. बुरखाधारी गुंड येऊन जेएनयुच्या विद्याथ्र्याना मारहाण करतात आणि पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेतात. देशातील कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस