शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
3
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
4
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
5
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
6
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
7
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
8
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
9
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
10
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
11
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
12
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
13
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
14
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
15
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
16
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
18
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
19
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
20
'आता मतदार काय ते ठरवतील', विरोध करूनही दिलीप मानेना प्रवेश, सुभाष देशमुखांचा भाजपला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘कळसा-भंडुरा’ला पर्यावरणीय परवाना, गोव्याला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 22:03 IST

म्हादईचे पाणी वळविण्यासाठी कर्नाटकला प्रोत्साहन देत केंद्र सरकारने बुधवारी कळसा-भंडुरा प्रकल्पाला पर्यावरणीय परवाना (ईसी) दिला.

पणजी - म्हादईचे पाणी वळविण्यासाठी कर्नाटकला प्रोत्साहन देत केंद्र सरकारने बुधवारी कळसा-भंडुरा प्रकल्पाला पर्यावरणीय परवाना (ईसी) दिला. यामुळे हा पाणी प्रकल्प बांधण्याचा कर्नाटकचा मार्ग मोकळा झाला आहे तर गोव्यासाठी हा फार मोठा फटका ठरला आहे. गोवा फॉरवर्डसह वेगवेगळे राजकीय पक्ष तसेच बिगर शासकीय संघटनांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी सायंकाळी व्टीटरवर कर्नाटकच्या कळसा-भंडुरा पिण्याच्या पाणी प्रकल्पाला पर्यावरणीय परवाना देण्यात आला असल्याचे जाहीर केले. केंद्रीय मंत्रिमंडळातील आपले सहकारी खाणमंत्री प्रल्हाद जोशी यांच्या पाठपुराव्याअंती हा पर्यावरणीय परवाना देण्यात आला असल्याचे जाहीर केले. यानंतर गोव्यात केंद्राच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. 

पिण्याच्या पाण्याचा नव्हे, म्हादई नदीचा गळा घोटणारा प्रकल्प : विजय सरदेसाई 

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना केंद्र सरकारचा हा निर्णय धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. कळसा-भंडुरी प्रकल्प हा पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प नव्हे, तर म्हादई नदीचा गळा घोटणारा प्रकल्प असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सरकारात घटक असताना तसेच पक्षाची भूमिका म्हणून गोवा फॉरवर्डने आजवर प्राणपणाने या प्रकल्पाला विरोध केला आहे. म्हादईचे पाणी वळविण्याच्या कृतीचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन करता येणार नाही. म्हादईचे पाणी वळविल्याने गोव्याची निसर्गसंपदा नष्ट होईल. माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी हा धोका ओळखला होता. विद्यमान मुख्यमंत्र्यांनी यावर आपले धोर जाहीर करायला हवे. गोवा आणि गोमंतकीय म्हादईवर मातेप्रमाणे प्रेम करतात आणि मुख्यमंत्र्यांच्या उत्तराच्या प्रतीक्षेत लोक आहेत, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे. 

गोवा सरकारचे अपयश : अभियानची टीका 

म्हादईसाठी न्यायालयीन लढा देणाऱ्या म्हादई बचाव अभियानने गोव्यासाठी हा फार मोठा फटका असल्याचे म्हटले आहे. प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ असून केंद्राची ही भूमिका पक्षपाती आहे. मोदी सरकारवर दबाव आणण्यास गोव्याचे भाजप सरकार अपयशी ठरले. यापुढे परिस्थिती आणखी बिकट होणार आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

टॅग्स :goaगोवाWaterपाणी