शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

दाबोळी विमानतळ चालू राहण्याची खात्री द्या: खासदार विरियातो फर्नांडिस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2024 13:26 IST

अधिवेशनात केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: दाबोळी विमानतळ बंद पाडण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न चालू असल्याची आम्हाला शंका आहे. या विमानतळाबाबत दक्षिण गोव्यातील नागरिकांना मोठी चिंता निर्माण झाली आहे. दक्षिण गोव्याची संपूर्ण अर्थव्यवस्था दाबोळी विमानतळावर अवलंबून आहे. दाबोळी विमानतळ कायमस्वरूपी चालू राहणार याची खात्री द्या, अशी मागणी दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नाडिस यांनी केली आहे.

केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री किंजारापू राममोहन नायडू यांना: यांना उद्देशन लोकसभा अधिवेशनावेळी ते बोलत होते. खासदार फर्नांडिस यांनी नुकतेच लोकसभा अधिवेशनात दाबोळी विमानतळविषयी प्रश्न उपस्थित केला. हे विमानतळ बंद करण्याचा प्रयत्न चालू असल्याचा संशय आम्हा दक्षिण गोव्यातील लोकांना आहे. २०२३-२४ या कालावधीत दाबोळी विमानतळावर ६८ लाख ५५ हजार प्रवासी हाताळण्यात आले असून नव्याने बांधलेल्या मोपा विमानतळावर ४४ लाख ३८ हजार प्रवाशी हाताळल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दाबोळी विमानतळ आणि मोपा विमानतळावरून हाताळण्यात येणाऱ्या प्रवासी विमानसेवेच्या किमतीत फरक असल्याचे दिसून येते. तो फरक 'युर्सर डेव्हलोप्मेण्ट फी' मुळे असल्याचे फर्नांडीस यांनी सांगितले. हल्लीच दाबोळी विमानतळावरील स्पाईस जेट, ओमान एअरवेझ, कतार एअरवेझ, तूय एअरवेझ आणि नुकतेच एअर अरेबिया विमानसेवा कंपन्यांनी त्यांची दाबोळी विमानतळावरील विमानसेवा उत्तर गोव्यातील मोपा विमानतळावर नेल्याचे फर्नांडीस यांनी लोकसभेत सांगितले.

दाबोळी विमानतळावरून विमानसेवा देणाऱ्या कंपन्या मोपा विमानतळावर नेत असल्याने दाबोळी विमानतळावर मोठा परिणाम होणार आहे. दाबोळी विमानतळ फक्त विमानतळ नसून दक्षिण गोव्याची अर्थव्यवस्था या विमानतळावर अवलंबून आहे. दाबोळी विमानतळावर येणाऱ्या लाखो पर्यटकांमुळे येथील हॉटेल, शेंक, टॅक्सी आणि अन्य विविध व्यवसाय अवलंबून आहेत. त्यामुळे लाखो लोकांच्या रोजगाराच्या हितासाठी दाबोळी विमानतळ कायमस्वरूपी चालू राहणार याची खात्री करून घ्या, अशी मागणी फर्नाडिस यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्र्यांकडे केली.

 

टॅग्स :goaगोवाAirportविमानतळcongressकाँग्रेसsouth-goa-pcदक्षिण गोवा