शहरं
Join us  
Trending Stories
1
रुग्णवाहिकेतून उतरवले; ओल्या बाळंतीणीची बाळासह २ किमी पायपीट, रुग्णवाहिका चालकाची कमालीची अमानुषता
2
Gautam Gambhir: गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारताच्या नावावर 'या' ५ लाजिरवाण्या विक्रमांची नोंद!
3
आता Apple नं घेतला कर्मचारी कपातीचा मोठा निर्णय; 'या' ५ कारणांमुळे कंपनीनं केली घोषणा
4
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरील फोटो लीक, रणबीरचा आर्मी लूक तर आलियाने रेट्रो स्टाईलमध्ये वेधलं लक्ष
5
Astrology: गजकेसरी आणि रूचक राजयोग! २५ नोव्हेंबर रोजी 'या' ५ राशींचे भाग्य चमकणार!
6
Hayli Gubbi: भारतीयांच्या चिंतेत भर! भारतात आली इथियोपिया ज्वालामुखीची राख, महाराष्ट्रातील कोणत्या भागात ढग?
7
"माझं काळीज तुटलंय...", स्मशानभूमीबाहेर धाय मोकलून रडली धर्मेंद्र यांची चाहती, काळजाला चर्रर्र करणारा व्हिडीओ
8
चीनमध्ये अरुणाचल प्रदेशातील महिलेसोबत असभ्य वर्तन, आता भारतानेही दिले सडेतोड प्रत्युत्तर
9
जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत मोठा फेरबदल! लॅरी पेज दुसऱ्या क्रमांकावर; 'ही' व्यक्ती टॉप-१० मधून बाहेर!
10
Pakistan attack Afghanistan: पाकिस्तानी लष्कराचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला, लहान मुलांसह १० जणांचा मृत्यू
11
"वनडेतून निवृत्ती घेऊन त्याने कसोटीत खेळायला हवं होतं"; किंग कोहलीच्या सहकाऱ्याची पोस्ट व्हायरल
12
PM Modi: ११ फूट रुंद, २२ फूट लांब, १९१ फूट उंच; पंतप्रधान मोदी राम मंदिराच्या शिखरावर फडकवणार भगवा ध्वज!
13
विवाह पंचमी २०२५: विवाह पंचमीला रामसीतेचा विवाह, पण इतरांसाठी ही विवाहतिथी निषिद्ध का?
14
"त्यांचं अचूक टायमिंग..", धर्मेंद्र यांचा शेवटचा सिनेमा 'इक्कीस'; सुहासिनी मुळेंनी सांगितली आठवण
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, दर महिन्याला छोटी रक्कम जमा करा; ५ वर्षात बनेल १४ लाखांचा फंड
16
मोहम्मद पैगंबरांच्या केसासाठी १० लाखांचे दागिने गमावले, माहीममधील कुटुंबाची भामट्याकडून फसवणूक
17
मंथली एक्सपायरीवर शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी २६ हजारांच्या पार; IT Stocks मध्ये घसरण, मेटल शेअर्स वधारले
18
T20 World Cup 2026 Schedule : कधी अन् कुठं रंगणार IND vs PAK यांच्यातील सामना? मोठी माहिती आली समोर
19
Benjamin Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंचा भारत दौरा पुन्हा लांबणीवर! कारण काय? 
20
IND vs SA: गुवाहाटी कसोटीत भारताचा विजय अशक्य का? आतापर्यंत एकदाच गाठलाय ३००+ स्कोर!
Daily Top 2Weekly Top 5

'गांव चलो' पुरे, 'स्मार्ट सिटी चलो' करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2024 13:03 IST

राजधानी पणजीत सकाळ-संध्याकाळ प्रचंड वाहतूक कोंडी होते.

राजधानी पणजीत सकाळ-संध्याकाळ प्रचंड वाहतूक कोंडी होते. विशेषतः शहरात लोकोत्सव, फिश फेस्टिव्हल किंवा कार्निव्हलसारखे सोहळे होतात, तेव्हा हजारो लोकांचा व पर्यटकांचाही जीव गुदमरतो. वाहतूक व्यवस्था कोलमडते. मात्र, सरकारला याचे काही सोयरसुतक नाही. कार्निव्हल, लोकोत्सव, फिश फेस्टिव्हल अशा सोहळ्यांसाठी सरकारी पैसा शक्य तेवढ़चा लवकर खर्च करून मोकळे व्हायचे असे काही जणांनी ठरवून टाकलेले असते. 

गेल्या आठवड्यात पणजीत एवढी वाहतूक कोंडी झाली की, लोकांनी सरकारच्या नावे बोटे मोडली. अगोदरच लाखो पर्यटक आलेले आहेत. पर्यटकांची वाहने पणजीत फिरतात. सरकारी कर्मचारी, खासगी कर्मचारी, विद्यार्थी, व्यावसायिक हे सगळे प्रवास करतात. वाहने अडकून पडल्यानंतर सर्वांचीच कामे खोळंबतात. प्रत्येकाला त्रास होतो. सगळे शहर खोदून ठेवले असताना तरी पणजीत सोहळ्यांचे आयोजन करायला नको, असे सरकारला वाटायला हवे. एकाचवेळी कला अकादमी कांपाल परिसरात लोकोत्सव व फिश फेस्टिव्हलला मान्यता देणारे सरकार पूर्णतः असंवेदनशील झाले आहे काय? सरकारची बुद्धी जर ठीक असती तर पणजीत अधिकाधिक वाहतूक पोलिसांची नियुक्ती करून वाहतुकीचे व्यवस्थापन करता आले असते.

भाजपने 'गांव चलो अभियान' मोहीम रविवारी जोरात राबवली. आता गांव चलो वगैरे पुरे झाले, त्यापेक्षा सर्व मंत्र्यांना सोबत घेऊन स्मार्ट सिटीत एखादे अभियान राबवावे आणि पणजीतील लोक, वाहन चालक, दुकानदार यांचे दुःख समजून घ्यावे. गांव चलो अभियानावेळी मंत्री बाबूश मोन्सेरात नावापुरते पणजीत काही ठिकाणी फिरले, जिथे रस्ते पूर्ण फोडून ठेवले आहेत, जिथे वाहन नेताच येत नाही व धुळीचे साम्राज्य आहे तिथे ते फिरकलेच नसावेत, तसे पाहायला गेल्यास अनेक मंत्री केवळ फोटोपुरते फिरतात. भाजपचा कार्यक्रम आपण केला, फोटो काढून हायकमांडला पाठवला एवढेच समाधान काही आमदार व मंत्र्यांना मिळत असते. अवधेच मंत्री भाजपचे सगळे कार्यक्रम व बैठका गंभीरपणे करत असतात. 

राजधानी पणजीत दुकानदारांचा व्यवसाय थंडावला आहे. फार्मसीत औषधे आणायला जायचे झाले तर वाट सापडत नाही. सांतड़नेजला स्मशानभूमीत कुणाचा मृतदेह न्यायचा झाला तर रस्ता शिल्लक नाही. मोठी कसरत करून कसेबसे लोक स्मशानभूमीपर्यंत पोहोचतात. अर्थात पणजीत कामे व्हायलाच हवीत, रस्ते ठीक व्हायलाच हवेत, सांडपाणी निचरा व्यवस्था किंवा गटारे ठीक व्हायलाच हवीत, त्यामुळे कळ सोसावी लागेल, पण गेली काही वर्षे फक्त खोदाईच चालली आहे. एक रस्ता दुरुस्त करून मग दुसरा फोडावा, पण तसे होत नाही. 

सगळे रस्ते एकाचवेळी फोडले आहेत. कुठून कुठे वाहन न्यावे हे सांगण्यासाठी फोडलेल्या रस्त्यावर कुणीच असत नाही. सांतड़नेज, भाटलेपासून कांपाल ते पणजी मार्केट परिसर व अठरा जून रस्ता अशा सगळ्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते, तरीही पुरेशा संख्येने वाहतूक पोलिस नियुक्त केले जात नाहीत, फक्त राज्यपाल श्री पिल्लई व मुख्यमंत्री सावंत किंवा कुणी केंद्रीय मंत्री पणजीतून जात असतील तरच वाहतूक पोलिसांना उभे केले जाते. हजारो वाहनधारक रोज बिचारे पणजीत वाहने चालवायला कंटाळतात. लोक शहरात येऊ पाहत नाहीत. 

कसिनो व्यावसायिक आणि त्यांचे ग्राहक यांची शेकडो वाहने पणजीत मुख्य रस्त्यावर फिरतात. जुन्या सचिवालयाच्या मागून जाणाऱ्या रस्त्यावर कोंडी होते. कसिनोंवरील ग्राहकांची वाहने सगळीकडे पार्क केलेली असतात. रस्त्यांवरील एकूण वाहतूक कोंडीत हे कसिनो खूप भर टाकतात. स्मार्ट सिटीचे सगळे काम पूर्ण होईपर्यंत पणजीत मोठे सोहळे आयोजित करण्यास मुख्यमंत्र्यांनी तरी मंजुरी देऊ नये. पणजीतील वाहनधारकांचे हाल होत आहेत. पणजीत खड्ड्यात पडून आतापर्यंत दोघांचा जीव गेलाच आहे. एका माजी नगरसेवकाचा कोवळा मुलगा ठार झाला. मळा भागात गेल्याच आठवड्यात एक ६५ वर्षीय नागरिक गटारात पडून मरण पावला. स्मार्ट सिटीच्या कामांतील गलथानपणा हा पणजीसाठी शाप ठरलाय.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण