शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

'गांव चलो' पुरे, 'स्मार्ट सिटी चलो' करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2024 13:03 IST

राजधानी पणजीत सकाळ-संध्याकाळ प्रचंड वाहतूक कोंडी होते.

राजधानी पणजीत सकाळ-संध्याकाळ प्रचंड वाहतूक कोंडी होते. विशेषतः शहरात लोकोत्सव, फिश फेस्टिव्हल किंवा कार्निव्हलसारखे सोहळे होतात, तेव्हा हजारो लोकांचा व पर्यटकांचाही जीव गुदमरतो. वाहतूक व्यवस्था कोलमडते. मात्र, सरकारला याचे काही सोयरसुतक नाही. कार्निव्हल, लोकोत्सव, फिश फेस्टिव्हल अशा सोहळ्यांसाठी सरकारी पैसा शक्य तेवढ़चा लवकर खर्च करून मोकळे व्हायचे असे काही जणांनी ठरवून टाकलेले असते. 

गेल्या आठवड्यात पणजीत एवढी वाहतूक कोंडी झाली की, लोकांनी सरकारच्या नावे बोटे मोडली. अगोदरच लाखो पर्यटक आलेले आहेत. पर्यटकांची वाहने पणजीत फिरतात. सरकारी कर्मचारी, खासगी कर्मचारी, विद्यार्थी, व्यावसायिक हे सगळे प्रवास करतात. वाहने अडकून पडल्यानंतर सर्वांचीच कामे खोळंबतात. प्रत्येकाला त्रास होतो. सगळे शहर खोदून ठेवले असताना तरी पणजीत सोहळ्यांचे आयोजन करायला नको, असे सरकारला वाटायला हवे. एकाचवेळी कला अकादमी कांपाल परिसरात लोकोत्सव व फिश फेस्टिव्हलला मान्यता देणारे सरकार पूर्णतः असंवेदनशील झाले आहे काय? सरकारची बुद्धी जर ठीक असती तर पणजीत अधिकाधिक वाहतूक पोलिसांची नियुक्ती करून वाहतुकीचे व्यवस्थापन करता आले असते.

भाजपने 'गांव चलो अभियान' मोहीम रविवारी जोरात राबवली. आता गांव चलो वगैरे पुरे झाले, त्यापेक्षा सर्व मंत्र्यांना सोबत घेऊन स्मार्ट सिटीत एखादे अभियान राबवावे आणि पणजीतील लोक, वाहन चालक, दुकानदार यांचे दुःख समजून घ्यावे. गांव चलो अभियानावेळी मंत्री बाबूश मोन्सेरात नावापुरते पणजीत काही ठिकाणी फिरले, जिथे रस्ते पूर्ण फोडून ठेवले आहेत, जिथे वाहन नेताच येत नाही व धुळीचे साम्राज्य आहे तिथे ते फिरकलेच नसावेत, तसे पाहायला गेल्यास अनेक मंत्री केवळ फोटोपुरते फिरतात. भाजपचा कार्यक्रम आपण केला, फोटो काढून हायकमांडला पाठवला एवढेच समाधान काही आमदार व मंत्र्यांना मिळत असते. अवधेच मंत्री भाजपचे सगळे कार्यक्रम व बैठका गंभीरपणे करत असतात. 

राजधानी पणजीत दुकानदारांचा व्यवसाय थंडावला आहे. फार्मसीत औषधे आणायला जायचे झाले तर वाट सापडत नाही. सांतड़नेजला स्मशानभूमीत कुणाचा मृतदेह न्यायचा झाला तर रस्ता शिल्लक नाही. मोठी कसरत करून कसेबसे लोक स्मशानभूमीपर्यंत पोहोचतात. अर्थात पणजीत कामे व्हायलाच हवीत, रस्ते ठीक व्हायलाच हवेत, सांडपाणी निचरा व्यवस्था किंवा गटारे ठीक व्हायलाच हवीत, त्यामुळे कळ सोसावी लागेल, पण गेली काही वर्षे फक्त खोदाईच चालली आहे. एक रस्ता दुरुस्त करून मग दुसरा फोडावा, पण तसे होत नाही. 

सगळे रस्ते एकाचवेळी फोडले आहेत. कुठून कुठे वाहन न्यावे हे सांगण्यासाठी फोडलेल्या रस्त्यावर कुणीच असत नाही. सांतड़नेज, भाटलेपासून कांपाल ते पणजी मार्केट परिसर व अठरा जून रस्ता अशा सगळ्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते, तरीही पुरेशा संख्येने वाहतूक पोलिस नियुक्त केले जात नाहीत, फक्त राज्यपाल श्री पिल्लई व मुख्यमंत्री सावंत किंवा कुणी केंद्रीय मंत्री पणजीतून जात असतील तरच वाहतूक पोलिसांना उभे केले जाते. हजारो वाहनधारक रोज बिचारे पणजीत वाहने चालवायला कंटाळतात. लोक शहरात येऊ पाहत नाहीत. 

कसिनो व्यावसायिक आणि त्यांचे ग्राहक यांची शेकडो वाहने पणजीत मुख्य रस्त्यावर फिरतात. जुन्या सचिवालयाच्या मागून जाणाऱ्या रस्त्यावर कोंडी होते. कसिनोंवरील ग्राहकांची वाहने सगळीकडे पार्क केलेली असतात. रस्त्यांवरील एकूण वाहतूक कोंडीत हे कसिनो खूप भर टाकतात. स्मार्ट सिटीचे सगळे काम पूर्ण होईपर्यंत पणजीत मोठे सोहळे आयोजित करण्यास मुख्यमंत्र्यांनी तरी मंजुरी देऊ नये. पणजीतील वाहनधारकांचे हाल होत आहेत. पणजीत खड्ड्यात पडून आतापर्यंत दोघांचा जीव गेलाच आहे. एका माजी नगरसेवकाचा कोवळा मुलगा ठार झाला. मळा भागात गेल्याच आठवड्यात एक ६५ वर्षीय नागरिक गटारात पडून मरण पावला. स्मार्ट सिटीच्या कामांतील गलथानपणा हा पणजीसाठी शाप ठरलाय.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण