शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
2
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
3
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
4
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
5
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
6
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
7
संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
8
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
9
GST संकलनातून भरली सरकारची तिजोरी; डिसेंबरमध्ये 6% वाढीसह ₹1.74 लाख कोटी पार...
10
Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
11
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
12
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
13
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
14
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
15
या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला
16
२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
17
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
18
निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे, 'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी
19
AI दिसत नाही, पण आहे सर्वत्र! आपल्या रोजच्या आयुष्यात AI ने नेमकं काय बदललं?
20
नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अभियंत्यांना खडसावले! रस्त्यांच्या निकृष्ट कामांबाबत कानपिचक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2024 12:59 IST

नव्याने हॉटमिक्सिंग करण्यात आलेल्या रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल 'लोकमत'शी बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. मात्र केवळ कंत्राटदारावरच नव्हे तर आपल्या जबाबदारीमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांवरही कठोर कारवाई व्हायला हवी, असा इशारा वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल दिला.

नव्याने हॉटमिक्सिंग करण्यात आलेल्या रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल ते 'लोकमत'शी बोलत होते. कामाचा दर्जा राखला जातो की नाही यासंदर्भात बांधकाम विभागात काही नियमावली ठरवण्यात आलेली आहे. त्यानुसारच रस्ते करायला हवेत. 

सीपीडब्ल्यूडीच्या अंतर्गत सरकारी अभियंते कंत्राटधाराबरोबर एक करार करतात. त्या कराराची अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्याचे काम अभियंत्यांचे आहे. कोणतेही काम करत असताना विविध स्तरावरील अभियंत्यांची एक जबाबदारी ठरवून दिलेली असते. 

सीपीडब्ल्यूडी अंतर्गत काम होत नसेल तर त्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे त्यांच्या निविदा काढून घेण्याचे सर्व अधिकार अभियंत्यांना आहेत. बहुदा आज हे होताना दिसत नाही. म्हणूनच आज रस्त्यांचे जी वाताहात झाली आहे त्याला सरकारी अभियंतेही तेवढेच जबाबदार आहेत, त्यामुळे यापुढे अशा अभियंत्यांवरही कठोर कारवाई व्हायला हवी, असेही ढवळीकर म्हणाले.

जबाबदारीने वागा

माझ्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर हॉटमिक्सिंग झालेले आहे. त्यापैकी एकच रस्ता खराब झालेला आहे. सदरचा रस्ता १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ववत करण्यात येईल, असे ढवळीकर यांनी सांगून काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदाराने उद्या दुसऱ्याा कंत्राटदारांच्या नावावर निविदा घेतल्यावर काय कारवाई करणार या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, आज लोकांमध्ये जी नाराजी पसरली आहे त्याला अभियंते जबाबदार आहेत. यापुढे असे प्रकार घडू नयेत म्हणून सरकारी अभियंत्याना कठोर व्हावे लागेल.

आरोप नकोत, पुरावे द्या... 

नोकरभरती संदर्भात होणाऱ्या टिके बाबतीत बोलताना ते म्हणाले की सदरची टीका ही निरर्थक आहे. बाबूश मोन्सेरात व विजय सरदेसाई या दोघांनाही मी चांगलाच ओळखतो. जे कोण आरोप करत आहेत त्यांनी हवेत वल्गना करण्यापेक्षा त्यांच्याकडे जर ह्या संबंधित काही पुरावे असतील तर ते जाहीर करावेत.

केवळ हजर राहू नका, दर्जाकडे लक्ष द्या

रस्त्याची कामे होत असताना सरकारी अभियंते कंत्राटदाराबरोबर तिथे हजर असतात. यापुढे त्यांनी नुसते हजर न राहता तांत्रिक दृष्ट्या कंत्राटदार व त्याची माणसे काम योग्य करत आहेत की नाही हे पाहणे गरजेचे आहे. ठरवून दिलेल्या दर्जानुसार काम होत नसेल तर तिथल्.. तिथेच कारवाई करण्याचे धारिष्ट त्यांनी दाखवायला हवे.

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकारLokmatलोकमत