शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

पावसाळा संपण्यापूर्वीच कैऱ्या बाजारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 18:20 IST

म्हापसा : पावसाळी हंगाम अद्याप संपलेला नसताना गोमंतकातील बाजारपेठेत कैऱ्या दाखल झाल्या आहेत. कैऱ्या सर्वप्रथम बाजारात उपलब्ध करुन देण्यात ओशेल येथील आंबा व्यावसायीक समीर धारगळकर यांना पुन्हा एकदा यश आले आहे. पुढील काही दिवसात दिवाळीपर्यंत आंबा विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.आंब्यांच्या केलेल्या चांगल्या प्रकारच्या मशागतीच्या जोरावर मागील ...

म्हापसा : पावसाळी हंगाम अद्याप संपलेला नसताना गोमंतकातील बाजारपेठेत कैऱ्या दाखल झाल्या आहेत. कैऱ्या सर्वप्रथम बाजारात उपलब्ध करुन देण्यात ओशेल येथील आंबा व्यावसायीक समीर धारगळकर यांना पुन्हा एकदा यश आले आहे. पुढील काही दिवसात दिवाळीपर्यंत आंबा विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

आंब्यांच्या केलेल्या चांगल्या प्रकारच्या मशागतीच्या जोरावर मागील काही वर्षांपासून धारगळकर सततपणे कैऱ्या बाजारात उपलब्ध करुन देतात. आंब्या प्रमाणे तेवढ्याच आवडीने कैऱ्यांचा वापर करणाऱ्या गोमंतकीयांना शंभर रुपयात दोन या प्रमाणे कैऱ्यांची विक्री त्यांनी करायला सुरुवात केली आहे. म्हापसापासून जवळ असलेल्या शिवोली येथील बाजारपेठेत त्यांनी या कैऱ्या विक्रीसाठी ठेवल्या होत्या. हंगामातील पहिल्यास कैऱ्या विकत घेण्यासाठी ग्राहकांकडून त्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसादही लाभला होता.

 याबाबत धारगळकर यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले राज्यातील आंबा हंगामाची सुरुवात साधारण मार्च महिन्यात होते. हा हंगामा साधारण तीन महिने चालतो. सध्या ऑक्टोबर महिना चालू आहे. अजुन पाच महिने आहेत; पण आताच कैऱ्या बाजारात उपलब्ध केल्या आहेत. यासाठी भरपूर मेहनत घेतली आहे, गेल्या अनेक वर्षांपासून बाजारात सर्वप्रथम कैºया उपलब्ध करणे शक्य झाले आहे. येत्या काही दिवसात पिकलेले आंबे बाजारात आणले जाणार असल्याचे धारगळकर यानी सांगितले.

टॅग्स :goaगोवाMangoआंबा