शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

गोव्यात छोट्या ग्राहकांसाठीची वीज दरवाढ येत्या महिन्यापासून मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2018 20:28 IST

राज्यात झालेल्या वीज दरवाढीविरुद्ध अलिकडेच लोकांनी, आमदारांनी व सरकारमधील काही मंत्र्यांनीही टीकेचा सूर लावल्यानंतर जी वीज दरवाढ मागे घेण्याची घोषणा वीज मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी केली होती, ती दरवाढ अजून कायम आहे पण येत्या महिन्यापासून ही दरवाढ मागे घेतली जाणार आहे.

पणजी : राज्यात झालेल्या वीज दरवाढीविरुद्ध अलिकडेच लोकांनी, आमदारांनी व सरकारमधील काही मंत्र्यांनीही टीकेचा सूर लावल्यानंतर जी वीज दरवाढ मागे घेण्याची घोषणा वीज मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी केली होती, ती दरवाढ अजून कायम आहे पण येत्या महिन्यापासून ही दरवाढ मागे घेतली जाणार आहे. त्याविषयीची प्रक्रिया पूर्ण होत आली असून दर कपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या महिन्यात होणार आहे.एप्रिल महिन्यातही वीज ग्राहकांना वाढीव बिले आली. पूर्वी ज्यांना तीनशे- साडेतीनशे रुपयांचे बिल यायचे त्यांना पाचशे-सहाशे रुपयांचे बिल आले आहे. एफपीपीसीए शुल्क व अन्य विविध प्रकारचे शूल्क वीज बिलामध्ये आहेत. ग्राहकांमध्ये दरवाढीबाबत अजुनही नाराजी आहे. दोनशे युनीटपर्यंत जे वीज वापरतात, त्यांच्यासाठीची वीज दरवाढ मागे घेण्याची घोषणा सरकारने केल्यामुळे येत्या महिन्यापासून ही कपात लागू होईल. मंत्री विश्वजित राणे, काँग्रेसचे आमदार दिगंबर कामत आदींनी केल्या टीकेमुळे सरकारने दर कपातीचा निर्णय घेतला तरी, त्याची अंमलबजावणी मात्र अजून झालेली नाही. अर्थ खात्याकडून फाईल वीज मंत्र्यांर्पयत पोहचण्यासाठी विलंब लागला. कालच्या गुरुवारी फाईल मंत्री मडकईकर यांच्याकडे गेली व त्यांनी ती मंजुर केली आहे. जे लोक दोनशे युनीटपेक्षा जास्त वीज वापरतात, त्यांच्यासाठी प्रती युनीट क्.25 पैशांची वाढ आहे. सध्या दोनशे युनीटपेक्षा जास्त वीज वापरणा:यांसाठी युनीटमागे 2 रुपये 4क् पैसे असा दर आहे. हा दर 2 रुपये 65 पैसे होणार आहे. संयुक्त वीज नियमन आयोगाने वीज दरात वाढ केली. सरकार वीज अनुदानावर वार्षिक जो पैसा खर्च करते, त्यात आणखी सात ते दहा कोटींची भर टाकली जाणार आहे. सरकार अनुदानावरील खर्च वाढवून छोटय़ा ग्राहकांना दिलासा देणार आहे. सरकारने 4.9 टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव आणला होता, त्यात आयोगाने वाढ करून वाढीचे प्रमाण 6.5 टक्क्यांर्पयत नेले. सरकारने 2क्क् वीज युनिटांर्पयत जे वीज वापरतात, त्यांना दिलासा दिला तरी, इतरांना मात्र दरवाढीची झळ बसेलच. दोनशे युनीटपेक्षा जास्त वीज वापरणारे ग्राहक संख्येने कमी नाहीत.