शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

गोव्यात वीज समस्येचा कहर, पर्रिकरांनी अमेरिकेहून साधला गोव्याच्या वीज मंत्र्याशी संपर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 20:38 IST

राज्यातील वीज यंत्रणा पूर्णपणो कोलमडल्यासारखी स्थिती रविवारी दिवसा व रात्रभर तिसवाडी तालुक्यात व राज्यातील अन्य भागांतही अनुभवास आल्यानंतर सरकारला शॉकच बसला आहे.

पणजी  - राज्यातील वीज यंत्रणा पूर्णपणो कोलमडल्यासारखी स्थिती रविवारी दिवसा व रात्रभर तिसवाडी तालुक्यात व राज्यातील अन्य भागांतही अनुभवास आल्यानंतर सरकारला शॉकच बसला आहे. वीजेच्या समस्येबाबत अनेक आमदार, जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच तसेच लोक प्रचंड नाराज झाले असून वीज यंत्रणोविषयी तक्रारी अमेरिकेर्पयत पोहचल्या आहेत. मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी सोमवारी सायंकाळी वीज मंत्री पांडुरंग मडकईकर यांच्याशी संपर्क साधला व निष्काळजी अभियंत्यांविरुद्ध प्रसंगी कारवाई करा, अशी सूचना केली. उच्चदाबाच्या वीज वाहिन्यांची नवी कनेक्शने देण्यावरही र्निबध लागू करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.राज्याच्या सर्वच भागांमध्ये सध्या वीजेच्या समस्येचाच विषय चर्चेत आहे. वादळवारा नसताना देखील ग्रामीण भागात पूर्ण दिवस वीज प्रवाह खंडीत राहण्याचे प्रकार घडतात. काही आमदारांसह विविध भागांतील सरपंच, नगरसेवक, नगराध्यक्ष वगैरे हैराण झाले आहेत. लोक आपआपल्या भागातील लोकप्रतिनिधींशी संपर्क साधतात व तक्रारी करतात.पण लोकांना आम्ही उत्तर काय म्हणून द्यावे असा प्रश्न अनेक आमदारांनाही पडला आहे. भाजपमधील अनेकांची सध्या गोची झालेली आहे. त्यांचेही कार्यकर्ते वीज समस्येबाबत तक्रारी करत आहेत. रविवारी ताळगाव, पणजी, सांतआंद्रे, कुंभारजुवे आदी मतदारसंघांतील बहुतेक भाग अंधारात राहिले. यामुळे सरकारमध्येही चिड वाढली. एका बिल्डरच्या सोयीसाठी उच्चदाबाची वाहिनी हलविण्याचा प्रयत्न झाला अशीही टीका होत आहे. सरकारने मात्र हा आरोप फेटाळला.या सगळ्य़ा पाश्र्वभूमीवर अमेरिकेहून सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री र्पीकर यांचा मडकईकर यांना फोन आला. वीजप्रश्नी काय झाले आहे अशी विचारणा मुख्यमंत्र्यांनी केली तेव्हा मडकईकर यांनी अपु:या साधनसुविधांमुळे ज्या समस्या भेडसावत आहेत, त्याची माहिती दिली. यापुढे वीज क्षेत्रत आणखी कोणत्या सुविधा जर निर्माण करायच्या असतील तर त्याबाबतचे इस्टीमेट्स तयार करा, आपण निधीची तरतुद करू, असे मुख्यमंत्र्यांनी मडकईकर यांना सांगितले. सध्या 5क्क् कोटी रुपये कामाच्या निविदा जारी झाल्या आहेत. जे अभियंते किंवा अधिकारी निष्काळजीपणा किंवा कामचुकारपणा करतात त्यांच्याविरोधात कारवाई करा अशी सूचनाही आपल्याला मुख्यमंत्र्यांनी केल्याचे मंत्री मडकईकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.रेड्डी अकार्यक्षम?  वीज खात्याचे मुख्य अभियंते एन. रेड्डी यांच्यावर सध्या सगळीकडून टीकेचा रोख आहे. रेड्डी हे येत्या जुलैच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. त्यांना कामामध्ये रस राहिलेली नाही अशी खात्यात चर्चा आहे. याविषयी लोकमतने मंत्री मडकईकर यांना विचारले असता, मडकईकर म्हणाले, की कदंब पठारावरील वीजवाहिनी हलविताना शट डाऊन घेतला गेला. वीजवाहिनी हलविण्याच्या कामात पावसामुळे व्यत्यय आला व काम लांबले. मात्र वीज खात्याने पर्यायी वीज वाहिनीची व्यवस्था करायला हवी होती. दीर्घकाळ लोकांना अंधारात ठेवायला नको होते हे मी मान्य करतो. वीज खाते त्याबाबत कमी पडले. मुख्य अभियंते रेड्डी यांच्याकडून मी अहवाल माहितला आहे.मडकईकर म्हणतात -बुधवारी वीज खात्यातील सर्व अभियंत्यांची बैठक घेईन- यापुढे उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांचे कनेक्शन देण्यावर निर्बंध- कुठच्याच भागात यापुढे एक तासापेक्षा जास्तवेळ वीज शट डाऊन घेतला जाणार नाही. जर घ्यावा लागला तर पर्यायी व्यवस्था अगोदर केली जाईल- बिल्डरच्या सोयीसाठी कदंब पठारावरील उच्च दाबाची वीजवाहिनी हलविली हा आरोप चुकीचा आहे. माङया मतदारसंघातील लोकांना अंधारात ठेवून मी बिल्डरची सोय करूच शकत नाही- वीजवाहिनी हलविण्याचे काम पावसामुळे लांबले. यापुढे काळजी घेऊ. कामचुकार अधिका:यांवर प्रसंगी कारवाई. 

टॅग्स :electricityवीजgoaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर