शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

सामुदायिक शेतीमुळे यंदा भाताचे उत्पादन वाढणार; कृषी संचालकांनी व्यक्त केला अंदाज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2024 16:41 IST

कृषी खात्याकडून सामुदायिक शेतीसाठी ९० टक्के अनुदान सुरु केल्याने मागील काही वर्षापासून सामुदायिक शेतीचे प्रमाण वाढले आहे.

नारायण गावस, पणजी: राज्यात कृषी खात्याकडून राबविल्या जाणाऱ्या सामुदायिक शेती या उपक्रमामुळे यंदाच्या वर्षी भात शेतीच्या लागवडीत वाढ हाेण्याची शक्यता कृषी खात्याचे संचालक नेव्हील अफान्सो यांनी व्यक्त  केली आहे. कृषी खात्याकडून सामुदायिक शेतीसाठी ९० टक्के अनुदान सुरु केल्याने मागील काही वर्षापासून सामुदायिक शेतीचे प्रमाण वाढले आहे. या वर्षी मोठ्या प्रमाणात सामुदायिक शेतीसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी कृषी खात्याकडे अनेक अर्ज येत आहे.

सचालाक अफान्सो म्हणाले, राज्यात भात शेतीची लागवड वाढविली तसेच अनेक शेतकरी शेतीकडे वळावे यासाठी कृषी खात्यातर्फे सामुदायिक शेती हा उपक्रम सुरु केला आहे. किमान १० पेक्षा जास्त शेतकरी एकत्र येऊन ही शेती करु शकतात. यात भात शेतीची लागवड केली जात आहे. या शेतकऱ्यांना कृषी खात्याकडून भात तसेच  अन्य शेतीसाठी लागणारे इतर उपकरणावर ७० ते ९० टक्के अनुदान दिले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ही शेती करताना काहीच नुकसान होत नाही. तसेच उत्पादनही जास्त प्रमाणात मिळते आता मान्सून पावसाला सुरुवात  होणार असल्याने अनेक शेतकऱ्यांनी या वर्षी खास शेती करण्यासाठी अर्ज केले आहेत. 

संचालक नेविल अफान्सो म्हणाले, कृषी खात्याकडे शेतकऱ्यांना यंदा भात शेती लागवडीसाठी  शेतकऱ्यांना प्रोत्साहित  केले आहे. काही वर्षापूर्वी भात शेतीची लागवड कमी झाली हाेती. पण आता त्याला कृषी खात्याने पुर्नजीवीत केले असून जास्तीत जास्त शेतकरी भात शेतीकडे वळतात. यासाठी त्यांना पूर्ण सहकार्य सुरु केले आहे. शेतकऱ्यांना नांगरणीसाठी लागणारे ट्रॅक्टर, भात बियाणे, खत या सर्वांवर  ७० ते ९० टक्के अनुदानात दिले जात आहे. यंदाच्या वर्षी भात शेतीची लागवड वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :goaगोवाFarmerशेतकरीmonsoonमोसमी पाऊस