शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कोळशानंतर आता लाकडी चिप्समुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे मुरगाव व वास्कोतील नागरिक नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 19:23 IST

मुरगाव बंदरात उतरविण्यात आलेल्या लाकडी चिप्सच्या भुशामुळे प्रदूषण वाढत असल्याचे मुरगाव तसेच वास्को मतदारसंघात दिसून आले आहे.

वास्को: गोव्याच्या मुरगाव बंदरात हाताळण्यात येणा-या कोळशामुळे काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत असतानाच आता मुरगाव बंदरात उतरविण्यात आलेल्या लाकडी चिप्सच्या भुशामुळे प्रदूषण वाढत असल्याचे मुरगाव तसेच वास्को मतदारसंघात दिसून आले आहे. गुरुवारी (दि.१४) संध्याकाळी वास्कोतील खारीवाडा समुद्रातून मोठ्या प्रमाणात लाकडी चिप्स वाहून आल्याचे दिसून आल्याने समुद्राच्या पाण्यातही प्रदूषण होत असल्याकारणाने ह्या भागात राहणा-या मासेमारी कुटुंबीयातही मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत असून लाकडी चिप्स माल हाताळणी बंद करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.मुरगाव तालुक्यात असलेल्या मुरगाव, वास्को इत्यादी मतदारसंघात राहणा-या नागरिकांना मागच्या अनेक वर्षापासून कोळसा प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचे दिसून आले आहे. सदर कोळसा प्रदूषणाच्या विरुद्ध मुरगाव तालुक्यातील शेकडो नागरिकांनी यापूर्वी अनेक वेळा आंदोलने सुद्धा छेडली आहेत. मागच्या काही महिन्यांपासून येथे होणारे कोळसा प्रदूषण ब-याच प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले होते, मात्र गेल्या आठवड्यातून पुन्हा येथे कोळसा प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकात याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असल्याचे दिसून आले. विविध सोशल मिडीयावर शेकडो लोकांनी होणा-या कोळसा प्रदूषणांची विविध चित्र गेल्या आठवड्याभरात घालण्यास सुरू करून याबाबत गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ का गप्प बसले आहे, असा सवालही उपस्थित केला होता. वास्को व मुरगाव मतदारसंघात वाढत असलेल्या कोळसा प्रदूषणाबाबत नागरिकांनी तीव्र विरोध करण्यास सुरुवात केल्यानंतर गोवा प्रदूषण नियंत्रण महामंडळाने याबाबत दखल घेत मुरगाव बंदरात कोळसा हाताळणा-या कंपनींना २१ फेब्रुवारीपर्यंत कोळसा हाताळणी बंद ठेवण्याबाबत आदेश जारी केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी उपलब्ध केली आहे.कोळशाच्या प्रदूषणामुळे वास्को तसेच मुरगाव मतदारसंघातील नागरिक नाराज असतानाच गुरुवारपासून लाकडी चिप्सच्या भुशामुळे प्रदूषण होत असल्याचे दिसून आल्याने पुन्हा एकदा ह्या प्रकाराबाबत नागरिकांत नाराजगीचे वातावरण निर्माण होत असल्याचे दिसून आले. सदर माल हाताळणारी कंपनी लाकडी चिप्सचा साठा बंद करून ठेवत नसल्याने मोठ्या प्रमाणात लाकडी चिप्स समुद्रात पडून त्या खारीवाडा किना-यावर वाहून आल्याचे दिसून आल्याने ह्या भागात राहणा-या मासेमा-यांनी तसेच नागरिकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला. अशा प्रकारे समुद्राच्या पाण्यात प्रदूषण होत असल्याने याचा समुद्रातील जनजीवनावर वाईट परिणाम होण्याची भीती ह्या भागात राहणारे पारंपरिक मासेमारी व्यवसाय करणारे किस्तोदियो डी’सोझा यांनी व्यक्त करून सदर प्रकरणात कारवाई करण्याची गरज असल्याची मागणी त्यांनी केली.लाकडी चिप्सचा भुसा वा-याने मोठ्या प्रमाणात हवेत मिसळून सध्या येथे हवेतही प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत असून यामुळे कोणाला आजाराच्या सामोरे जावे लागल्यास याला कोण जबाबदार असा सवाल लोकांनी उपस्थित केला आहे. मुरगाव बंदरात हाताळण्यात येणाºया लाकडी चिप्समुळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी अचुक पावले उचला अन्यथा ह्या मालाची हाताळणी बंद करा अशी मागणी मुरगाव तसेच वास्कोतील नागरीकांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :goaगोवा