शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
2
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
3
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
4
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
5
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
6
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
8
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
9
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
10
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
11
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
12
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
13
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
14
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
15
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
16
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
17
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
18
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
19
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
20
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 

दलित-मराठा एकत्र आल्यामुळेच भाजपाने घडवले भीमा-कोरेगाव प्रकरण - आनंद तेलतुंबडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 13:51 IST

दलित आणि मराठा समाज एकत्र आल्यामुळे भाजपाने धसका घेतला आणि भीमा-कोरगाव प्रकरण घडवून आणले, असे प्रतिपादन व्यवस्थापन क्षेत्रात जागतिक स्तरावर नाव असणारे संशोधक, भीमा-कोरगाव प्रकरणाचे अभ्यासक प्रा. आनंद तेलतुंबडे यांनी येथे शुक्रवारी केले.

सुरेश गुदलेपणजी : दलित आणि मराठा समाज एकत्र आल्यामुळे भाजपाने धसका घेतला आणि भीमा-कोरगाव प्रकरण घडवून आणले, असे प्रतिपादन व्यवस्थापन क्षेत्रात जागतिक स्तरावर नाव असणारे संशोधक, भीमा-कोरगाव प्रकरणाचे अभ्यासक प्रा. आनंद तेलतुंबडे यांनी येथे शुक्रवारी केले. गोव्यातील विविध संघटनांनी एकत्र येऊन प्रा. तेलतुंबडे यांचे व्याख्यान आयोजिले होते. लोकशाही, मतभेद आणि आर्थिक वाढ असा त्यांचा विषय होता. या व्याख्यानाच्या शेवटी ते भीमा-कोरगाव प्रकरणावर बोलले. काय घडवले गेले, कसे घडवले गेले ते त्यांनी उलगडले. जात आणि धर्माचा वापर करून ब्राह्मण्यवादी राजसत्तेने कसे डाव साधले असा त्यांच्या कथनाचा सूर होता. भीमा-कोरगावची ऐतिहासिक पार्श्वभूमी त्यांनी सांगितली.

यानंतर ते म्हणाले, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्यासह सुमारे २५० वर संघटना एकत्र येऊन एल्गार परिषद आयोजिली होती. यामध्ये मराठा संघटनाही होत्या आणि याच एकत्रिकरणाचा धसका भाजपने घेतला. संभाजी महाराजांच्या अंत्यसंस्काराच्या विषयाचा खोटा इतिहास रचला गेला. पर्यायी, खोटा इतिहास रचण्यात संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे खूप काळांपासून सक्रीय आहेत. खरे तर मूळ गावात वडू-तुळापूर समेट झाला होता तरीही अन्य गावात हिंसेची तयारी केलेली. घरांमध्ये अगोदरच दगड जमवलेले, टँकरमध्ये रॉकेल भरून ठेवलेले. प्रा. तेलतुंबडे सांगत होते. दलितच दलितांना कसे मारतील? अशी विचारणाही त्यांनी केली.संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंविरोधात तक्रार दाखल झाली पण आजपर्यंत काहीही झाले नाही, असे ते म्हणाले. पोलिसांनीच कुभांड रचले. एल्गार परिषदेत भडकावू भाषणे दिली, अशी आवई उठवली. एल्गार परिषद माओवाद्यांची असल्याचा कांगावा केला.

समाजात माओवादी या विषयी खूप गैरसमज पसरवलेले आहेत. माओवादी म्हणजे रक्ताची लढाई असा समज पसरवला गेला आहे, असे ते म्हणाले. देशातील विचारवंतांच्या निवासस्थानावर छापे टाकले गेले. त्यावेळी प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्या गोव्यातील घरांवरही छापा टाकला होता. ते घरी नव्हते. त्यांच्या पत्नी अगोदरच मुंबईला गेल्या होत्या. तेही मुंबईत होते. गोवा इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंच्ट महाविद्यालयात प्रा. तेलतुंबडे वरिष्ठ प्राध्यापक आहेत. छापा टाकला तेव्हा सुरक्षा रक्षकांना धमकावले, सहकाऱ्यांनाही पोलिसांनी धमकावल्याची माहिती त्यांनी दिली. पोलिसांनी घराचा व्हिडिओ घेतला आणि ते गेले. ते म्हणाले, पोलिस काहीही करू शकतात. आमच्याबाबतीत षड़यंत्र रचू शकतात तर इतरांबाबत काहीही होईल. पोलीस कोणालाही अटक करू शकतात.संगणक म्हणजे सत्य साईबाबाप्रा. आनंद तेलतुंबडे यांच्या निवासस्थानी छापा घातला तेव्हा संगणक ताब्यात घेतल्याचे बोलले गेले. या संदर्भात प्रा. तेलतुंबडे म्हणाले, संगणक म्हणजे सत्य साईबाबा आहे, तुम्ही मागाल ते संगणक देऊ शकतो. जसे सत्या साईबाब हवेत वस्तू काढत तसे. त्यामुळे पोलिसांनी संगणकांवर मिळालेली माहिती म्हणून जे काही जाहीर केले आहे ते शंभर टक्के कुभांड आहे. खरे तर राजकारणी, पोलिस आणि न्याय-व्यवस्था स्वतंत्र पाहिजे पण आपल्या देशात या तिन्ही व्यवस्था हितसंबंधित आहेत. 

 

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारMilind Ekboteमिलिंद एकबोटेSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी