शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

जलदुष्काळाची चाहूल; धरणे आटू लागली, ६ जुलैपर्यंत पाऊस लांबल्यास संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 08:53 IST

पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होण्याचे सावट राज्यावर घोंघावत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : पावसाने दडी मारल्याने धरणांची स्थिती बिकट बनली आहे. त्यामुळे राज्यात जलदुष्काळाची ही चाहूल असल्याचे मानले जात आहे. ६ जुलैपर्यंत पाऊस लांबणीवर पडल्यास परिस्थिती गंभीर निर्माण होणार आहे. अंजुणे धरणात फक्त १५ दिवस पुरेल एवढेच पाणी आहे, त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होण्याचे सावट राज्यावर घोंघावत आहे.

सोमवारी धरणांमधील पाणीसाठा तपासला असता अंजुणे धरणात पाण्याची पातळी एकदमच खाली आल्याचे दिसून आले. या धरणात केवळ ३ टक्के पाणी राहिले आहे. पंचवाडी धरण गेल्या आठवड्यात कोरडे पडले होते. परंतु या धरण क्षेत्रात गेल्या चार-पाच दिवसात पावसाच्या हलक्या सरी झाल्याने आता ते २ टक्के भरले आहे.

साळावली धरण २१ टक्के भरलेले आहे. आमठाणे व चापोली धरण प्रत्येकी ४१ टक्के तर गावणे धरण ३६ टक्के भरलेले आहे. गोवा व महाराष्ट्राचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिळारी धरणात मात्र पुरेसा पाणीसाठा आहे. हे धरण ९६ टक्के भरलेले आहे.

अस्नोडा, चांदेल, ओपा जलशुद्धीकरण प्रकल्पांना धरणांमधून पाणीपुरवठा झाला नाही तर मोठा जलदुष्काळ येऊ शकतो. अस्नोडा प्रकल्पावर संपूर्ण बार्देश व डिचोली तालुक्यातील लोकांची पिण्याच्या पाण्यासाठी भिस्त आहे. पाणी कमी झाले की, आमठाणेहून पंपिंग करुन या प्रकल्पासाठी पाणी घेतले जाते. परंतु आमठाणे धरणातील जलाशयाची स्थितीच सध्या बिकट आहे. केवळ ४० दिवस पुरेल एवढेच पाणी या धरणात आहे.

पाणी शंभर दिवस पुरेल

जलस्रोत खात्याचे प्रमोद बदामी यांच्या अभियंता संपर्क साधला असता त्यांनी अंजुणे धरणात १५ ते २० दिवस पुरेल पाणी शिल्लक असल्याचे मान्य केले. परंतु त्याचबरोबर ते म्हणाले की, लोकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. साळावली धरणात शंभर दिवस पुरेल एवढा पाणीसाठा आहे. आमठाणे धरणात ४० दिवस पुरेल एवढा तर तिळारी धरणात तब्बल तीन महिने म्हणजेच ९० दिवस पुरेल एवढे पाणी आहे.

 

टॅग्स :goaगोवाDamधरण