शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

जलदुष्काळाची चाहूल; धरणे आटू लागली, ६ जुलैपर्यंत पाऊस लांबल्यास संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 08:53 IST

पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होण्याचे सावट राज्यावर घोंघावत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : पावसाने दडी मारल्याने धरणांची स्थिती बिकट बनली आहे. त्यामुळे राज्यात जलदुष्काळाची ही चाहूल असल्याचे मानले जात आहे. ६ जुलैपर्यंत पाऊस लांबणीवर पडल्यास परिस्थिती गंभीर निर्माण होणार आहे. अंजुणे धरणात फक्त १५ दिवस पुरेल एवढेच पाणी आहे, त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होण्याचे सावट राज्यावर घोंघावत आहे.

सोमवारी धरणांमधील पाणीसाठा तपासला असता अंजुणे धरणात पाण्याची पातळी एकदमच खाली आल्याचे दिसून आले. या धरणात केवळ ३ टक्के पाणी राहिले आहे. पंचवाडी धरण गेल्या आठवड्यात कोरडे पडले होते. परंतु या धरण क्षेत्रात गेल्या चार-पाच दिवसात पावसाच्या हलक्या सरी झाल्याने आता ते २ टक्के भरले आहे.

साळावली धरण २१ टक्के भरलेले आहे. आमठाणे व चापोली धरण प्रत्येकी ४१ टक्के तर गावणे धरण ३६ टक्के भरलेले आहे. गोवा व महाराष्ट्राचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिळारी धरणात मात्र पुरेसा पाणीसाठा आहे. हे धरण ९६ टक्के भरलेले आहे.

अस्नोडा, चांदेल, ओपा जलशुद्धीकरण प्रकल्पांना धरणांमधून पाणीपुरवठा झाला नाही तर मोठा जलदुष्काळ येऊ शकतो. अस्नोडा प्रकल्पावर संपूर्ण बार्देश व डिचोली तालुक्यातील लोकांची पिण्याच्या पाण्यासाठी भिस्त आहे. पाणी कमी झाले की, आमठाणेहून पंपिंग करुन या प्रकल्पासाठी पाणी घेतले जाते. परंतु आमठाणे धरणातील जलाशयाची स्थितीच सध्या बिकट आहे. केवळ ४० दिवस पुरेल एवढेच पाणी या धरणात आहे.

पाणी शंभर दिवस पुरेल

जलस्रोत खात्याचे प्रमोद बदामी यांच्या अभियंता संपर्क साधला असता त्यांनी अंजुणे धरणात १५ ते २० दिवस पुरेल पाणी शिल्लक असल्याचे मान्य केले. परंतु त्याचबरोबर ते म्हणाले की, लोकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. साळावली धरणात शंभर दिवस पुरेल एवढा पाणीसाठा आहे. आमठाणे धरणात ४० दिवस पुरेल एवढा तर तिळारी धरणात तब्बल तीन महिने म्हणजेच ९० दिवस पुरेल एवढे पाणी आहे.

 

टॅग्स :goaगोवाDamधरण