शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

जलदुष्काळाची चाहूल; धरणे आटू लागली, ६ जुलैपर्यंत पाऊस लांबल्यास संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 08:53 IST

पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होण्याचे सावट राज्यावर घोंघावत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : पावसाने दडी मारल्याने धरणांची स्थिती बिकट बनली आहे. त्यामुळे राज्यात जलदुष्काळाची ही चाहूल असल्याचे मानले जात आहे. ६ जुलैपर्यंत पाऊस लांबणीवर पडल्यास परिस्थिती गंभीर निर्माण होणार आहे. अंजुणे धरणात फक्त १५ दिवस पुरेल एवढेच पाणी आहे, त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होण्याचे सावट राज्यावर घोंघावत आहे.

सोमवारी धरणांमधील पाणीसाठा तपासला असता अंजुणे धरणात पाण्याची पातळी एकदमच खाली आल्याचे दिसून आले. या धरणात केवळ ३ टक्के पाणी राहिले आहे. पंचवाडी धरण गेल्या आठवड्यात कोरडे पडले होते. परंतु या धरण क्षेत्रात गेल्या चार-पाच दिवसात पावसाच्या हलक्या सरी झाल्याने आता ते २ टक्के भरले आहे.

साळावली धरण २१ टक्के भरलेले आहे. आमठाणे व चापोली धरण प्रत्येकी ४१ टक्के तर गावणे धरण ३६ टक्के भरलेले आहे. गोवा व महाराष्ट्राचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिळारी धरणात मात्र पुरेसा पाणीसाठा आहे. हे धरण ९६ टक्के भरलेले आहे.

अस्नोडा, चांदेल, ओपा जलशुद्धीकरण प्रकल्पांना धरणांमधून पाणीपुरवठा झाला नाही तर मोठा जलदुष्काळ येऊ शकतो. अस्नोडा प्रकल्पावर संपूर्ण बार्देश व डिचोली तालुक्यातील लोकांची पिण्याच्या पाण्यासाठी भिस्त आहे. पाणी कमी झाले की, आमठाणेहून पंपिंग करुन या प्रकल्पासाठी पाणी घेतले जाते. परंतु आमठाणे धरणातील जलाशयाची स्थितीच सध्या बिकट आहे. केवळ ४० दिवस पुरेल एवढेच पाणी या धरणात आहे.

पाणी शंभर दिवस पुरेल

जलस्रोत खात्याचे प्रमोद बदामी यांच्या अभियंता संपर्क साधला असता त्यांनी अंजुणे धरणात १५ ते २० दिवस पुरेल पाणी शिल्लक असल्याचे मान्य केले. परंतु त्याचबरोबर ते म्हणाले की, लोकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. साळावली धरणात शंभर दिवस पुरेल एवढा पाणीसाठा आहे. आमठाणे धरणात ४० दिवस पुरेल एवढा तर तिळारी धरणात तब्बल तीन महिने म्हणजेच ९० दिवस पुरेल एवढे पाणी आहे.

 

टॅग्स :goaगोवाDamधरण