शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

गोव्यात रोज सरासरी ६८ जणांना श्वानदंश, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 12:58 IST

गोव्यात रोज सरासरी ६८ जणांना भटक्या कुत्र्यांनी चावे घेतल्याचे गेल्या पाच महिन्यांत निष्पन्न झाले आहे

पणजी : गोव्यात रोज सरासरी ६८ जणांना भटक्या कुत्र्यांनी चावे घेतल्याचे गेल्या पाच महिन्यांत निष्पन्न झाले आहे. राज्यात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून ती मोठी डोकेदुखी ठरली आहे. सरकारच्या अधिकृत माहितीनुसार गोव्यात रेबिजचे प्रमाण घटले आहे. असे असले तरी भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे लोकांना ते मोठे तापदायक ठरले आहे. चालू वर्षात पहिल्या पाच महिन्यात १०,३४० जणांना कुत्र्यांनी चावा घेतला असल्याची नोंद आरोग्य खात्यात झालेली आहे. ही आकडेवारी पाहता दर दिवशी साधारणपणे ६८ जणांना श्वानदंश झाल्याचे स्पष्ट होते. आरोग्य खात्याकडे एवढी नोंद झाली असली तरी प्रत्यक्षात त्याहून आकडा जास्त असण्याची शक्यता आहे.

गोवा पर्यटनस्थळ आहे. किनाऱ्यांबरोबरच येथील मंदिरे, चर्च तसेच अन्य प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर देशी-विदेशी पाहुण्यांची नेहमीच गर्दी असते. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव पर्यटकांनाही होत आहे. किनाऱ्यांवर पडून राहिलेला कचरा तसेच अस्वच्छता यामुळे भटकी कुत्री किनाऱ्यावरदेखील फिरताना दिसतात. किनार्‍यांवर पर्यटकांनाही त्या कुत्र्यांचा त्रास होत आहे. सरकारची अधिकृत माहिती सांगते की रेबिजचे एकही प्रकरण गेल्या वर्षभरात राज्यात नोंद झालेले नाही.

गोवा राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव प्रदीम सरमोकादम यांच्या मते ठिकठिकाणी वाढलेल्या कचऱ्यामुळे भटकी कुत्री वाढलेली आहेत. कत्तलखान्याचे टाकाऊ साहित्य तसेच कचरा अनेकदा उघड्यावर फेकला जातो. त्यामुळे कुत्री तेथे आढळतात आणि त्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.

हिवाळ्यात अनेक स्थलांतरित पक्षी गोव्यात येतात. हे पक्षी अंडी घालतात. ही अंडी नष्ट करण्याचे काम कुत्री करत असतात असे सरमोकादम म्हणाले. राज्यात पोपट तसेच अन्य पक्षांचे प्रमाण घटण्याचे कारण काय याचा शोध घ्यावा लागेल, असे ते म्हणाले. जैवविविधता मंडळाचे सदस्य मारियानो फर्नांडिस यांच्या मते विदेशी पर्यटक गोव्यात येतात. पाच- सात महिने वास्तव्य करून राहतात. हे पाहुणे कुत्री पाळतात आणि नंतर त्यांना सोडून देतात. अशा कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. गोवा कॅन या ग्राहक चळवळीचे संस्थापक रोलँड मार्टिन यांच्यामध्ये उघड्यावरफेकलेला कचरा हेच कुत्र्यांची संख्या वाढण्याचे प्रमुख कारण आहे. कचरा व्यवस्थापन योग्यरीत्या झाले तर ही समस्याच राहणार नाही, असे ते म्हणाले.