शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

गोव्यात रोज सरासरी ६८ जणांना श्वानदंश, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 12:58 IST

गोव्यात रोज सरासरी ६८ जणांना भटक्या कुत्र्यांनी चावे घेतल्याचे गेल्या पाच महिन्यांत निष्पन्न झाले आहे

पणजी : गोव्यात रोज सरासरी ६८ जणांना भटक्या कुत्र्यांनी चावे घेतल्याचे गेल्या पाच महिन्यांत निष्पन्न झाले आहे. राज्यात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून ती मोठी डोकेदुखी ठरली आहे. सरकारच्या अधिकृत माहितीनुसार गोव्यात रेबिजचे प्रमाण घटले आहे. असे असले तरी भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे लोकांना ते मोठे तापदायक ठरले आहे. चालू वर्षात पहिल्या पाच महिन्यात १०,३४० जणांना कुत्र्यांनी चावा घेतला असल्याची नोंद आरोग्य खात्यात झालेली आहे. ही आकडेवारी पाहता दर दिवशी साधारणपणे ६८ जणांना श्वानदंश झाल्याचे स्पष्ट होते. आरोग्य खात्याकडे एवढी नोंद झाली असली तरी प्रत्यक्षात त्याहून आकडा जास्त असण्याची शक्यता आहे.

गोवा पर्यटनस्थळ आहे. किनाऱ्यांबरोबरच येथील मंदिरे, चर्च तसेच अन्य प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर देशी-विदेशी पाहुण्यांची नेहमीच गर्दी असते. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव पर्यटकांनाही होत आहे. किनाऱ्यांवर पडून राहिलेला कचरा तसेच अस्वच्छता यामुळे भटकी कुत्री किनाऱ्यावरदेखील फिरताना दिसतात. किनार्‍यांवर पर्यटकांनाही त्या कुत्र्यांचा त्रास होत आहे. सरकारची अधिकृत माहिती सांगते की रेबिजचे एकही प्रकरण गेल्या वर्षभरात राज्यात नोंद झालेले नाही.

गोवा राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव प्रदीम सरमोकादम यांच्या मते ठिकठिकाणी वाढलेल्या कचऱ्यामुळे भटकी कुत्री वाढलेली आहेत. कत्तलखान्याचे टाकाऊ साहित्य तसेच कचरा अनेकदा उघड्यावर फेकला जातो. त्यामुळे कुत्री तेथे आढळतात आणि त्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.

हिवाळ्यात अनेक स्थलांतरित पक्षी गोव्यात येतात. हे पक्षी अंडी घालतात. ही अंडी नष्ट करण्याचे काम कुत्री करत असतात असे सरमोकादम म्हणाले. राज्यात पोपट तसेच अन्य पक्षांचे प्रमाण घटण्याचे कारण काय याचा शोध घ्यावा लागेल, असे ते म्हणाले. जैवविविधता मंडळाचे सदस्य मारियानो फर्नांडिस यांच्या मते विदेशी पर्यटक गोव्यात येतात. पाच- सात महिने वास्तव्य करून राहतात. हे पाहुणे कुत्री पाळतात आणि नंतर त्यांना सोडून देतात. अशा कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. गोवा कॅन या ग्राहक चळवळीचे संस्थापक रोलँड मार्टिन यांच्यामध्ये उघड्यावरफेकलेला कचरा हेच कुत्र्यांची संख्या वाढण्याचे प्रमुख कारण आहे. कचरा व्यवस्थापन योग्यरीत्या झाले तर ही समस्याच राहणार नाही, असे ते म्हणाले.