शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

“मराठा समाजाशिवाय इतरांची मते भाजपला नकोत का? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे”

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 09:12 IST

भाजपने नेहमीच जातीच्या आधारे होणाऱ्या जनगणनेचा विरोध केला. ते केवळ जातींच्या आधारे राजकारण करतात हे यावरून पुन्हा सिद्ध झाले, अशी टीका करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: मराठा समाजाच्या आमदारांची संख्या भविष्यात ७ वरून १४ होईल, या कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी केलेल्या विधानाचा निषेध करत तृणमूल कॉंग्रेसचे नेते समील वळवईकर यांनी ‘यावरून भाजपला आता मराठा समाज वगळता अन्य समाजाची मते नको आहेत का?' असा सवाल केला. 

मराठा समाजाच्या आमदारांच्या संख्येवरून फळदेसाई यांच्या या विधानावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्टीकरण द्यावे. यावरून भाजपचे धर्माचे तसेच जातीचे राजकारण उघड झाल्याची टीका त्यांनी केली. समील वळवईकर म्हणाले की, फळदेसाई हे आमदार म्हणून कुंभारजुवेतून कॉंग्रेसच्या तिकिटावरून आणि सर्व समाजातील लोकांच्या मतांनी निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारची विधाने करू नयेत. भाजप सबका साथ, सबका विकास म्हणत सर्व धर्मांचा व जातींचा अभिमान असल्याचे सांगते. मग त्यांच्या आमदारांनी असे विधान कसे केले? मराठा समाजाचे जे आमदार निवडून आले, ते केवळ मराठा समाजाच्याच मतांच्या आधारे आमदार झालेले नाहीत. मात्र फळदेसाईंच्या विधानावरून भाजपला अन्य समाजाची मते नको का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे,' अशी टीका त्यांनी केली. 

वळवईकर म्हणाले की, गोव्यात ख्रिश्चिन, एससी, एसटी, बहुजन समाजातील विविध जातींचे मतदार आहेत. उलट राजेश फळदेसाई यांनी केलेले विधान हे इतकी वर्ष राजकारणात असलेले केंद्रीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक व एसटी समाजाचे नेतृत्व करणारे क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांच्यावर अन्याय करणारे आहे. भाजपने नेहमीच जातीच्या आधारे होणाऱ्या जनगणनेचा विरोध केला. ते केवळ जातींच्या आधारे राजकारण करतात हे यावरून पुन्हा सिद्ध झाले, असा आरोप वळवईकर यांनी केला.

आम्ही ३० निवडून आणू : उपेंद्र गावकर

कुंभारजुवे आमदार राजेश फळदेसाई यांनी मराठा समाजाच्या आमदारांची संख्या ७ वरून १४ करू असे विधान केले. मात्र, आता आम्ही २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी, एससी व एसटी समाजाच्या आमदारांची संख्या ३० करु, अशी भूमिका गोमंतक बहुजन महासंघाने मांडली. संघाचे उपेंद्र गावकर म्हणाले की, सध्या बहुजन समाजाच्या आमदारांची १० ते १५ इतकीच आहे. मात्र, पुढील निवडणुकीत ती नक्कीच वाढेल. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण