शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

सेटिंगचे राजकारण करत नाही; मनोज परब यांचे शिंदे गटाला प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 09:26 IST

शिवसेना शिंदे गटासोबत जाण्याएवढी आरजी रिकामटेकडी नाही. अशाने आरजीचे नुकसान होईल असे कुणाला वाटत असेल तर तसे होणार नाही, असे मनोज परब यांनी सुनावले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'आम्ही सेटिंगचे राजकारण करीत नाही. सेटिंग करायचेच असते तर आमच्या एकमेव आमदाराने भाजप सरकारला पाठिंबा देऊन मंत्रिपद घेतले असते, असे प्रत्युत्तर रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे मनोज परब यांनी विरोधकांना दिले. मी तुम्हाला कधी, कुठे भेटलो ते सांगा. जर मी भेटलो असेल तर त्याचे फोटो सार्वजनिक करा असे खुले आव्हान त्यांनी शिवसेनेचे (शिंदे गट) नेते तथा माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांना दिले.

परब हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे विधान मंगळवारी अडसूळ यांनी केले होते. त्यावर परब यांनी 'अडसूळ यांचे विधान खोटे आहे. आरजीवर कुणीही नियंत्रण मिळवू शकत नाही' असे स्पष्ट केले. परब म्हणाले की, 'मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत 'वर्षा' बंगल्यावर भेट घेतली होती त्यांच्या व्यतिरिक्त कुणाला भेटलो नाही. जर मी वारंवार वर्षा बंगल्यावर जात असेन तर तेथील अधिकाऱ्यांकडे जाऊन मी कधी आणि केव्हा गेलो होतो, हे अडसूळ यांनी तपासावे. जर मनोज परब या नावाने त्यांची अन्य कोणी व्यक्ती भेटत असेल तर ते समजण्याची गरज आहे.

अडसूळ आणि माझी जर खास मैत्री असेल तर त्यांनी गोव्यात आल्यानंतर मला फोन का केला नाही? भाजपने आदेश दिला म्हणून अडसूळ आमच्या विरोधात विधाने करीत नाहीत ना? असा संशय निर्माण होत आहे. भाजपला विरोध करण्याची धमक आरजीतच आहे,' असे परब म्हणाले.

सेनेचे चिरीमिरीचे राजकारण बंद करा

शिवसेनेने चिरीमिरी राजकारण बंद करावे. गोमंतकीय तसेच आरजी अशा राजकारणाला बळी पडणार नाही. शिवसेनेसोबत जाण्याएवढी आरजी रिकामटेकडी नाही. आपल्या अशा विधानांमुळे जर आरजीचे नुकसान होईल असे कुणाला वाटत असेल तर तसे होणार नाही' असेही मनोज परब यांनी सुनावले.

आरजी- शिवसेना एकाच माळेचे मणी: आप  

रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) व शिंदे गटाची शिवसेना हे दोन्ही पक्ष एकाच माळेचे मणी आहेत त्यामुळे आरजीने आता शिवसेनेत विलीन व्हावे, अशी टीका आम आदमी पक्षाने (आप) गोवा अमित पालेकर अध्यक्ष परिषदेत केली.

'केवळ मतांचे विभाजन व्हावे, या उद्देशाने भाजपनेच आरजी पक्ष तयार केला आहे. विधानसभा निवडणुकीतही ते दिसून आले. त्यामुळे भाजपचाच अजेंडा आरजी पुढे नेत आहे,' असा आरोप त्यांनी केली. 'आरजी व भाजप एकमेकांवर टीका करून केवळ जनतेची फसवणूक करीत आहे, तर दुसरीकडे भाजप व शिंदे गटाची शिवसेना हे महाराष्ट्रात एकत्र सत्तेत आहेत. त्यामुळे आरजी व शिवसेना एकाच माळेचे मणी असल्याचे सिद्ध होते,' अशी टीका त्यांना केली. पालेकर म्हणाले की, 'आम आदमी पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळाला आहे. भारतातील सरकारचे भविष्य हे 'केजरीवाल' मॉडेलच आहे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आमदार व्हेन्झी व्हिएस म्हणाले, 'आप हा देशातील एकमेव राजकीय पक्ष आहे की, ज्याने कमी कालावधीत आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली. जे भाजप व कॉग्रेसला दीर्घकाळ सत्तेत असूनही जमले नाही ते आपने केले. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी केजरीवाल मॉडेलच हवे आप गोवाचे प्रभारी दीपक सिंगला 'उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक, उपाध्यक्ष अॅड. सुरेल तिळवे व सहप्रभारी चेतन रावल उपस्थित होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाShiv Senaशिवसेना