शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

खाणी सुरू होण्यास सरकारचाच अडथळा आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 11:21 IST

मुख्यमंत्री प्रमोद सावंत स्वत: एक खाण अवलंबित आहेत. त्यामुळे त्यांना हा प्रश्न लवकर सुटावा अशी आशा वाटणे स्वाभाविक आहे. परंतु फोमेंतो कंपनी व सेसा गोवा या हितसंबंधी आर्थिक गटांचीच बाजू घेऊन हा प्रश्न सुटणार आहे का?

राजू नायक

गोव्याला ग्रासणारा खाण प्रश्न जुलैर्पयत सोडवून दाखविण्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेले आश्वासन, ते कसे पुरे करणार याबद्दल पर्यावरणवाद्यांना शंका आहे. मला स्वत:लाही वाटते की हे एक नवे फसवे आश्वासन आहे आणि सावंत दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांच्याच मार्गाने जाऊ पाहात आहेत. त्यामुळे हा प्रश्न काही लवकर सुटणार नाही.

स्व. मनोहर पर्रिकर यांनाही शेवटी शेवटी त्याच सहा लिजधारकांना खाणी देऊन हा प्रश्न सुटणार नाही याची खात्री पटली होती. त्यामुळे त्यांनी राज्यात लिजांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. भाजपच्या कोअर समितीलाही वाटते की लिजांचा लिलाव केला जावा. तरीही नव्या मुख्यमंत्र्यांना जुन्याच मार्गाने जावेसे का वाटते?

मुख्यमंत्री प्रमोद सावंत स्वत: एक खाण अवलंबित आहेत. त्यामुळे त्यांना हा प्रश्न लवकर सुटावा अशी आशा वाटणे स्वाभाविक आहे. परंतु फोमेंतो कंपनी व सेसा गोवा या हितसंबंधी आर्थिक गटांचीच बाजू घेऊन हा प्रश्न सुटणार आहे का? यापूर्वी राज्याचे तत्कालीन अ‍ॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी त्यांना लिलाव हाच एकमेव मार्ग असल्याचा सल्ला दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने सर्व ८८ लोह खनिज खाणींचे परवाने रद्द केल्यास एक वर्ष उलटले असून खाणी विकास कायद्यात (एमएमडीआरए) बदल करण्याचीही विनंती राज्याने केंद्राला करून पाहिली आहे. मुख्यमंत्री सावंत पुन्हा ही मागणी धसास लावू पाहातात. ज्याबद्दल केंद्राने अद्याप अनुकूलता दर्शविलेली नाही.गोव्यातील खाणचालक सर्वोच्च न्यायालयात गेले असून मुक्तीपूर्व काळात आपल्याला पोर्तुगीज राजवटीने बहाल केलेल्या लिजेस एमएमडीआरखाली येऊ शकत नाहीत, असा त्यांचा दावा आहे. गोवा मुक्त झाल्यानंतर केंद्राने १९६३ पर्यंत त्यांची कार्यवाही चालू ठेवली होती. अजून या अर्जावर सुनावणी झालेली नाही.

तसे असले तरी, सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील खाणी व गैरव्यवहारांसंदर्भात अजूनपर्यंत जे जे आदेश दिले आहेत त्यांचीही कार्यवाही राज्य सरकारने टाळली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणो चुकार खाणचालकांकडून तीन हजार कोटीही वसूल करण्यास राज्य सरकारला अपयश आले व हे पैसे चोरून सिंगापूरला पाठविण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे शहा आयोगाने राज्यातील खाण गफला ३५ हजार कोटींचा असल्याचे नोंदविले असून पर्रिकरांच्या लोकलेखा समितीनेही त्यावर शिक्कामोर्तब केले होते. या गैरव्यवहारातील रकमेची वसुली व दोषींवर कारवाई व्हावी म्हणून गोवा फाउंडेशन ही संघटनाही सर्वोच्च न्यायालयात गेली असून त्यावरही सुनावणी झालेली नाही. दुस:या बाजूला सर्वोच्च न्यायालयाने खाणींच्या लिजांचा लिलाव हाच पर्याय असल्याचे सूचित केल्यानंतर राज्य सरकार त्याबाबत का हालचाली करीत नाही, हासुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. राज्य सरकारवर श्रीमंत खाणचालकांचा दबाव असल्याचे लपून राहात नसले तरी या प्रवृत्तीमुळे खाणी सुरू होण्यास विलंब होत आहे. राज्याने खाणींचा लिलाव करावा किंवा दुसरा पर्याय म्हणून महामंडळ स्थापन करावे अशीही मागणी आहे. परंतु त्याकडेही सरकार हेतुपुरस्सर कानाडोळा करीत आहे. कायद्यात बदल करून पुन्हा त्याच खाणचालकांकडे खाणी सुपूर्द केल्या जाव्यात या मागणीसाठी राज्याचे एक शिष्टमंडळ आणखी एकदा दिल्लीवारी करेल, असे संकेत मिळतात.

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत.)

टॅग्स :BJPभाजपाManohar Parrikarमनोहर पर्रीकर