शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
3
"गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
4
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
5
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
6
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
7
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
8
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
9
२०२५ची सांगता एकदशीने: २०२६मध्ये किती एकादशी? २ अधिक व्रतांची भर; पाहा, आषाढी-कार्तिकी तिथी
10
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
11
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
12
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
13
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
14
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
15
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
16
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
17
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
18
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
19
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
20
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
Daily Top 2Weekly Top 5

'आयआयटी'ला विरोध का करतात समजत नाही! विधानसभेत दिगंबर कामत यांनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 09:08 IST

शिक्षण खात्याच्या अनुदानित मागण्यांवरील चर्चेवेळी कामत बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: गोव्यासाठी आयआयटी प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. मग 'आयआयटी'ला इतका विरोध का होत आहे, हेच समजत नसल्याची खंत मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी विधानसभेत व्यक्त केली.

शिक्षण खात्याच्या अनुदानित मागण्यांवरील चर्चेवेळी कामत बोलत होते. आयआयटी प्रकल्पासंदर्भात जर काही जमिनीचा विषय असेल तर तो त्वरित सोडवून सदर प्रकल्प मार्गी लावावा अशी मागणीही त्यांनी केली. कामत म्हणाले, की गोव्यात एनआयआयटी कॅम्पस् कार्यरत आहे; मात्र हा एनआयआयटी कॅम्पस् होण्यासही बरीच वर्षे लागली. असेच सध्या आयआयटी प्रकल्पाबाबत होत आहे. 

गोव्याच्या शिक्षण क्षेत्रासाठी आयआयटी प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहे. गोव्यात आयआयटी नसल्याने अनेक विद्यार्थी हे शिक्षण घेण्यासाठी गोव्याबाहेर जात आहेत. त्यामुळे ही सुविधा गोव्यात सुरू झाली तर त्याचा फायदाच होईल; मात्र सध्या अनेकजण या प्रकल्पाला विरोध करीत आहेत. सांगेतील लोकांनी या प्रकल्पाला विरोध केला. हा प्रकल्प तेथे झाला असता तर सांगेचे नाव शिक्षणाबाबत आंतरराष्ट्रीय नकाशावर आले असते; मात्र या प्रकल्पाला इतका विरोध का होत आहे, हेच समजत नसल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.

आयआयटी झाले तर शैक्षणिक हब म्हणून उभारी घेत असलेल्या गोव्याला त्याचा फायदाच होईल. त्यामुळे हा प्रकल्प उभारण्यास जर काही जमिनीं बाबत अडचण येत असेल तर तो मार्गी लावून आयआयटी चालीस लावावा.

सरकार राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण राबवीत आहे, ही चांगली गोष्ट आहे; मात्र त्याचबरोबर त्यासाठी आवश्यक त्या सुविधा तयार करणे; तसेच शिक्षकांना प्रशिक्षण देणेही महत्त्वाचे असल्याचे कामत यांनी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभा