शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सरकारचा पैसा केवळ गटारकामात घालवू नका: मुख्यमंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 15:22 IST

लोकांनी प्रकल्पांचे महत्त्व समजून सहकार्य करावे

लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली : सरकारकडून पंचायतींना दिला जाणारा निधी हा लोक कल्याणार्थ आहे. त्यामुळे त्याचा वापर केवळ गटार उभारण्यासाठीच न करता चांगले प्रकल्प उभारून गाव समृद्धीकडे कसा जाईल याचा विचार करा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

हरवळे पंचायत क्षेत्रात काल, शनिवारी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत एमआरएफ शेड, स्वयंपूर्ण मार्केट प्रकल्पाच्या उ‌द्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी स्वयंपूर्ण व्यवसाय सुरू केलेले लुपिन फाऊंडेशनच्या अधिकाऱ्यांचा गौरव मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमास नगराध्यक्ष रश्मी देसाई, गोपाळ सुर्लकर, संजय नाईक, राजू मलिक, सरपंच अंकुश मलिक, लुपिनचे अधिकारी कला कुंतला, ममता दिवकर, सतीश वाघुंनकर, नंदिनी गावस, ओंकार मांद्रेकर, उल्हास मलिक आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, गाव स्वयंपूर्ण होण्यासाठी लोकसहभाग व पंचायत यांचे सहकार्य अपेक्षित आहे. हरवळे पंचायतीने कचरा प्रक्रिया प्रकल्प व स्वयंपूर्ण मार्केट सुरू करून राज्यात आदर्श निर्माण केला आहे, तो आदर्श सर्व पंचायतींनी घ्यावा. गावात नवीन उपक्रम, प्रकल्प उभारताना पंचायतीने लोकांना सहभागी करून घ्यावे, तेव्हाच ते काम पूर्णत्वास जाईल.

स्वयंपूर्ण उपक्रम गतिमान होण्यासाठी व विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी गावातील लोकांना हेरून त्यांना मदत करण्यात लुपिनच्या व्यवस्थापनाने केलेले सहकार्य उत्तम आहे. त्यामुळे गावातील होतकरूंना स्वतःचा व्यावसाय उभा करता आला आहे. या उपक्रमाचा आदर्श घेऊन राज्यातील इतर पंचायतींनीही पुणकार घ्यावा. पायाभूत व मानवी विकास साधताना प्रत्येक गाव, घर स्वयंपूर्ण होणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, संजय नाईक यांनी विविध प्रकल्पांची माहिती दिली. रश्मी देसाई, गोपाळ सुर्लकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामस्थांना बियाणी व इतर साहित्यांचे वाटप करण्यात आले.

हरवळे गावातील ३५ जणांना विविध प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी करण्यात यश आले आहे. त्याच धर्तीवर आता राज्यातील इतर पंचायतींनी पुढाकार घेत स्वावलंबी व्हावे. कचरा प्रक्रियेतून खत निर्मिती व त्याच खताची विक्री करण्याचा उपक्रम हरवळे पंचायतीने राबवून आदर्श घातला आहे. स्वयंपूर्ण मित्रांना बरोबर घेऊन प्रत्येक गाव स्वयंपूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधींसह जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. सावंत यांनी केले. केंद्राच्या सहकार्याने राज्यात अनेक प्रकल्प, विकासकामे सुरू आहेत. ग्रामीण भागापर्यंत प्रकल्प पोहोच- वण्याचे काम करत आहोत, त्याला सहकार्य करा, असेही सावंत म्हणाले.

तुम्ही जागा द्या, इमारतीसाठी निधी देऊ

पंचायतींनी लोकांना विश्वासात घेऊन प्रकल्प उभारावेत. लोकसहभाग असल्यास कोणतेही काम सोपे होऊन जाईल. हरवळे पंचायतीसाठी सुसज्ज इमारतीची गरज आहे. गावकऱ्यांनी जागा उपलब्ध करून दिल्यास भव्य इमारत साकारण्यात येईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. सरकार विविध माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी सरकार तुमच्या दारी यासारखे उपक्रम राबविण्यात येत आहे.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत