शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचा पैसा केवळ गटारकामात घालवू नका: मुख्यमंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 15:22 IST

लोकांनी प्रकल्पांचे महत्त्व समजून सहकार्य करावे

लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली : सरकारकडून पंचायतींना दिला जाणारा निधी हा लोक कल्याणार्थ आहे. त्यामुळे त्याचा वापर केवळ गटार उभारण्यासाठीच न करता चांगले प्रकल्प उभारून गाव समृद्धीकडे कसा जाईल याचा विचार करा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

हरवळे पंचायत क्षेत्रात काल, शनिवारी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत एमआरएफ शेड, स्वयंपूर्ण मार्केट प्रकल्पाच्या उ‌द्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी स्वयंपूर्ण व्यवसाय सुरू केलेले लुपिन फाऊंडेशनच्या अधिकाऱ्यांचा गौरव मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमास नगराध्यक्ष रश्मी देसाई, गोपाळ सुर्लकर, संजय नाईक, राजू मलिक, सरपंच अंकुश मलिक, लुपिनचे अधिकारी कला कुंतला, ममता दिवकर, सतीश वाघुंनकर, नंदिनी गावस, ओंकार मांद्रेकर, उल्हास मलिक आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, गाव स्वयंपूर्ण होण्यासाठी लोकसहभाग व पंचायत यांचे सहकार्य अपेक्षित आहे. हरवळे पंचायतीने कचरा प्रक्रिया प्रकल्प व स्वयंपूर्ण मार्केट सुरू करून राज्यात आदर्श निर्माण केला आहे, तो आदर्श सर्व पंचायतींनी घ्यावा. गावात नवीन उपक्रम, प्रकल्प उभारताना पंचायतीने लोकांना सहभागी करून घ्यावे, तेव्हाच ते काम पूर्णत्वास जाईल.

स्वयंपूर्ण उपक्रम गतिमान होण्यासाठी व विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी गावातील लोकांना हेरून त्यांना मदत करण्यात लुपिनच्या व्यवस्थापनाने केलेले सहकार्य उत्तम आहे. त्यामुळे गावातील होतकरूंना स्वतःचा व्यावसाय उभा करता आला आहे. या उपक्रमाचा आदर्श घेऊन राज्यातील इतर पंचायतींनीही पुणकार घ्यावा. पायाभूत व मानवी विकास साधताना प्रत्येक गाव, घर स्वयंपूर्ण होणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, संजय नाईक यांनी विविध प्रकल्पांची माहिती दिली. रश्मी देसाई, गोपाळ सुर्लकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामस्थांना बियाणी व इतर साहित्यांचे वाटप करण्यात आले.

हरवळे गावातील ३५ जणांना विविध प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी करण्यात यश आले आहे. त्याच धर्तीवर आता राज्यातील इतर पंचायतींनी पुढाकार घेत स्वावलंबी व्हावे. कचरा प्रक्रियेतून खत निर्मिती व त्याच खताची विक्री करण्याचा उपक्रम हरवळे पंचायतीने राबवून आदर्श घातला आहे. स्वयंपूर्ण मित्रांना बरोबर घेऊन प्रत्येक गाव स्वयंपूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधींसह जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. सावंत यांनी केले. केंद्राच्या सहकार्याने राज्यात अनेक प्रकल्प, विकासकामे सुरू आहेत. ग्रामीण भागापर्यंत प्रकल्प पोहोच- वण्याचे काम करत आहोत, त्याला सहकार्य करा, असेही सावंत म्हणाले.

तुम्ही जागा द्या, इमारतीसाठी निधी देऊ

पंचायतींनी लोकांना विश्वासात घेऊन प्रकल्प उभारावेत. लोकसहभाग असल्यास कोणतेही काम सोपे होऊन जाईल. हरवळे पंचायतीसाठी सुसज्ज इमारतीची गरज आहे. गावकऱ्यांनी जागा उपलब्ध करून दिल्यास भव्य इमारत साकारण्यात येईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. सरकार विविध माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी सरकार तुमच्या दारी यासारखे उपक्रम राबविण्यात येत आहे.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत