शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

विधानसभा विसर्जन नको; सत्तास्थापनेसाठी संधी द्या, काँग्रेसकडून राष्ट्रपतींना निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 19:23 IST

गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला असून काँग्रेसने आता थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून आपल्याला सत्ता स्थापनेची संधी द्यावी, असे साकडे घातले आहे.

पणजी : गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला असून काँग्रेसने आता थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून आपल्याला सत्ता स्थापनेची संधी द्यावी, असे साकडे घातले आहे. काँग्रेसला संधी दिल्याशिवाय विधानसभा विसर्जित करु नये, अशी विनंती पक्षाने केली आहे. राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांना याबाबतीत आवश्यक ते निर्देश द्यावेत, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.विधानसभा विसर्जित केली जाऊ शकते, अशी भीती काँग्रेसला आहे. काँग्रेसकडे बहुमत असल्याचा पक्षाचा दावा असून सत्ता स्थापनेसाठी बोलवावे, अशी मागणी करण्यात आलेली आहे. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची या पत्रावर सही असून ते म्हणतात की, ह्यराज्यात प्रशासन पूर्णपणे कोलमडलेले आहे आणि त्यामुळे जनता मात्र भरडली जात आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणामुळे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. लोकांच्या मूलभूत समस्याही सुटलेल्या नाहीत. या सरकारने लोकांचा तसेच सभागृहाचाही विश्वास गमावला असून हे सरकार अल्पमतात आले आहे.ह्णचोडणकर यांचे असेही म्हणणे आहे की, १६ आमदारांसह विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असलेला काँग्रेस सत्ता स्थापनेसाठी तयार असून विधानसभेत कोणत्याही क्षणी बहुमत सिध्द करु शकतो. राज्यपालांकडेही याआधी पक्षाने राज्यातील भाजप आघाडी सरकार बडतर्फ करुन काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी बोलवावे, अशी मागणी करणारी निवेदने दिलेली आहेत.ह्णकोणत्याही परिस्थितीत विधानसभा विसर्जित केली जाऊ नये, अशी मागणी करताना तसे निर्देश राष्ट्रपतींनी राज्यपालांना द्यावेत आणि मार्गदर्शनही करावे. कट कारस्थान करुन विधानसभा विसर्जनाची चाल खेळली जाऊ शकते. याआधी पर्रीकर मुख्यमंत्री असताना अशीच चाल खेळून त्यांनी विधानसभा विसर्जन करुन घेतलेले आहे. त्याची पुनरावृत्ती होऊ देऊ नका. घटनेचा कोणत्याही प्रकारे उपमर्द करु देऊ नका. अशी चाल झाल्यास ती मोडून काढा, अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे.काँग्रेसने याआधी राज्यपालांना चार निवेदने दिली. परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे पक्षाने आता थेट राष्ट्रपतींनाच साकडे घातले.दरम्यान, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनीही पक्षाकडे पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा केला आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस