शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
3
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
4
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
5
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
6
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
7
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
8
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
9
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
10
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
11
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
12
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
13
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
14
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
15
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
16
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
17
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
18
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
19
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
20
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम

विधानसभा विसर्जन नको; सत्तास्थापनेसाठी संधी द्या, काँग्रेसकडून राष्ट्रपतींना निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 19:23 IST

गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला असून काँग्रेसने आता थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून आपल्याला सत्ता स्थापनेची संधी द्यावी, असे साकडे घातले आहे.

पणजी : गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला असून काँग्रेसने आता थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून आपल्याला सत्ता स्थापनेची संधी द्यावी, असे साकडे घातले आहे. काँग्रेसला संधी दिल्याशिवाय विधानसभा विसर्जित करु नये, अशी विनंती पक्षाने केली आहे. राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांना याबाबतीत आवश्यक ते निर्देश द्यावेत, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.विधानसभा विसर्जित केली जाऊ शकते, अशी भीती काँग्रेसला आहे. काँग्रेसकडे बहुमत असल्याचा पक्षाचा दावा असून सत्ता स्थापनेसाठी बोलवावे, अशी मागणी करण्यात आलेली आहे. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची या पत्रावर सही असून ते म्हणतात की, ह्यराज्यात प्रशासन पूर्णपणे कोलमडलेले आहे आणि त्यामुळे जनता मात्र भरडली जात आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणामुळे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. लोकांच्या मूलभूत समस्याही सुटलेल्या नाहीत. या सरकारने लोकांचा तसेच सभागृहाचाही विश्वास गमावला असून हे सरकार अल्पमतात आले आहे.ह्णचोडणकर यांचे असेही म्हणणे आहे की, १६ आमदारांसह विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असलेला काँग्रेस सत्ता स्थापनेसाठी तयार असून विधानसभेत कोणत्याही क्षणी बहुमत सिध्द करु शकतो. राज्यपालांकडेही याआधी पक्षाने राज्यातील भाजप आघाडी सरकार बडतर्फ करुन काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी बोलवावे, अशी मागणी करणारी निवेदने दिलेली आहेत.ह्णकोणत्याही परिस्थितीत विधानसभा विसर्जित केली जाऊ नये, अशी मागणी करताना तसे निर्देश राष्ट्रपतींनी राज्यपालांना द्यावेत आणि मार्गदर्शनही करावे. कट कारस्थान करुन विधानसभा विसर्जनाची चाल खेळली जाऊ शकते. याआधी पर्रीकर मुख्यमंत्री असताना अशीच चाल खेळून त्यांनी विधानसभा विसर्जन करुन घेतलेले आहे. त्याची पुनरावृत्ती होऊ देऊ नका. घटनेचा कोणत्याही प्रकारे उपमर्द करु देऊ नका. अशी चाल झाल्यास ती मोडून काढा, अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे.काँग्रेसने याआधी राज्यपालांना चार निवेदने दिली. परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे पक्षाने आता थेट राष्ट्रपतींनाच साकडे घातले.दरम्यान, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनीही पक्षाकडे पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा केला आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस