शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल; पित्याच्या आत्महत्याप्रकरणी चार जणांना अटक
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

आईवडिलांबरोबरच आपल्या समाजाला विसरू नका: दामू नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 13:55 IST

हरळय्या समाजातर्फे सांस्कृतिक महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : समाज सुधारलेला आहे. आपण सुधारताना समाज आणि आपल्या आई-वडिलांना विसरू नका. समाजाची जबाबदारी घेताना त्या समाजाची सेवा करावी लागते, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी केले. कला आणि संस्कृती संचालनालय आणि मडगाव रवींद्र भवन यांच्या संयुक्त विद्यमाने बोर्डा येथील संत हरळय्या समाजातर्फे आयोजित 'सांस्कृतिक महोत्सव २०२५'मध्ये नाईक बोलत होते.

रवींद्र भवनात रविवारी आयोजित कार्यक्रमाला नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, माजी उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर, कोंकणी अकादमीचे अध्यक्ष पूर्णानंद च्यारी, डॉ. प्रीतेश कोटे, समाजाचे अध्यक्ष सिद्धार्थ शंके, दवर्ली उपसरपंच विद्याधर आर्लेकर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रदीप पंडित यांनी केले.आपण उंच पदावर पोहोचलो, तरी आपल्या लहान समाजाला वर काढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे आमदार उल्हास तुयेकर यांनी सांगितले.

समाज संघटना स्थापन केली म्हणून होत नाही, त्यांच्याकडून कार्य व्हावे लागते. संत हरहळय्या समाज स्थापन करण्यामागे समाजाला एकत्र आणण्याचा हेतू होता. तो सफल झाला असून समाजाने मोठी प्रगती केली आहे. कोमुनिदादची जागा या समाजाला द्यावी. हा प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे नेणार. कोमुनिदादची जागा या समाजाला दिली तर या समाजाचा मोठा उद्धार होईल, असे माजी मंत्री आजगावकर यांनी सांगितले. 

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण