शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
3
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
4
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
5
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
6
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
7
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
8
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
9
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
10
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
11
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
12
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
13
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
14
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
15
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
16
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
17
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
18
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!

मतभेद जाहीरपणे मांडू नका!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; ३६ नवनिर्वाचित मंडळ अध्यक्षांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2025 08:59 IST

भाजपच्या सर्व ३६ नवनिर्वाचित मंडळ अध्यक्षांचा सोमवारी मुख्यमंत्र्यांहस्ते सन्मान करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : बरे-वाईट जे काही असेल ते बाहेर बोलू नका. प्रदेशाध्यक्ष, सरचिटणीस किंवा माझ्याकडे बोला. काही गैरसमज असतील तर ते पक्षांतर्गतच बोलून दूर करुयात, असा सल्ला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ऐकमेकांविरुद्ध बोलणाऱ्या मंत्री, आमदार व कार्यकर्त्यांना दिला.

भाजपच्या सर्व ३६ नवनिर्वाचित मंडळ अध्यक्षांचा सोमवारी मुख्यमंत्र्यांहस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यास पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा राज्यसभा खासदार अरुण सिंग, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, प्रदेश सरचिटणीस अॅड. नरेंद्र सावईकर व दामू नाईक उपस्थित होते. कार्यक्रमाला मंत्री, आमदार, प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, येत्या डिसेंबरमध्ये जिल्हा पंचायत निवडणूक होणार आहे. त्यानंतर मार्च २०२५मध्ये पालिका निवडणुका होतील आणि २०२७मध्ये सर्वात मोठी विधानसभेची निवडणूक होईल. मंडळ अध्यक्ष सक्षम असेल, तर उमेदवार सहजपणे निवडून येतो. त्यामुळे मंडळ अध्यक्षांचीही तेवढीच महत्त्वाची भूमिका आहे. आज जे मंडळ अध्यक्ष झालेले आहेत,

त्यातील ५० ते ६० टक्के कार्यकर्ते हे युवा मोर्चातून आलेले आहेत. सर्वजण तरुण आहेत. त्यांनी दिलेली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडून आगामी प्रत्येक निवडणुकांमध्ये भाजपला सत्ता मिळवून देणे अपेक्षित आहे. आतापर्यंत ३६ मतदारसंघात आम्ही मंडळ अध्यक्ष निवडले. उर्वरित चार मतदारसंघातही अध्यक्ष नियुक्त करून शंभर टक्के मतदारसंघ पूर्ण करू. जुन्या मंडळ अध्यक्षांनी आता आपली जबाबदारी संपली, अशा समजूतीत राहू नये. त्यांनाही नवनवीन पदे मिळतील. नव्या मंडळ अध्यक्षांना मार्गदर्शन करण्याची व त्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याची जबाबदारी जुन्या लोकांची आहे. भाजपमध्ये कार्यकर्ता हे सर्वांत मोठे पद आहे. त्यामुळे सर्वांनीच जबाबदारीने काम करावे.

दरम्यान, ४५ वर्षे वयोमर्यादा केल्यामुळे सुरुवातीला आमच्यासमोरही अडचण निर्माण झाली होती. मात्र, पक्षाने राष्ट्रीय स्तरावर घेतलेला हा निर्णय आहे. त्यामुळे सर्वच राज्यांना तो लागू होतो. गोव्यातही त्याचे आम्हाला पालन करावे लागले. कार्यक्षम असेच मंडळ अध्यक्ष आम्ही नेमलेले आहेत. वयोमर्यादा आल्यानंतर काही जणांनी तर बूथ अध्यक्षपदावर आपण काम करतो, असे सांगितले, संदीप सूद, कमांडर पाध्ये यांनी आपणहून बूथ स्वीकारले.

पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस तथा राज्यसभा खासदार अरुण सिंग म्हणाले, 'पक्षामध्ये प्रत्येक काम सन्मानाचे काम असते. कोणीही आपल्याला कमी लेखू नये किंवा उच्चही मानू नये. परिवार म्हणून सर्वांना घेऊन पुढे जा. बूथ मजबूत करा, यश तुमचेच आहे'.

विधानसभेच्या तयारीला लागा

२०२७ची विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून कामाला लागा, असा सल्ला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नवनिर्वाचित मंडळ अध्यक्षांना दिला. पक्षाने ४५ वर्षांखालील मंडळ अध्यक्ष दिले आहेत. भाजप आता तरुण झाला असून, ही युवा ब्रिगेड येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपला निश्चितच सत्ता मिळवून देईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

एकमेकांच्या साथीने काम करा 

सन २०२२च्या निवडणुकीत सर्व मंडळ अध्यक्षांनी उत्तम प्रकारे सहकार्य केले. त्यामुळेच भाजपचे उमेदवार निवडून येऊ शकले. अनेकदा मंत्री, आमदारांना मतदारांपर्यंत पोहोचता येत नाही. हे काम मंडळ अध्यक्षांनी चोखपणे बजावावे. काहीवेळा पक्ष उमेदवार बदलतो. त्यावेळीही कार्यकर्त्यांनी साथ द्यायला हवी. आमदारापेक्षाही मंडळ अध्यक्षाची जबाबदारी मोठी असते. त्याने मतदारांशी संपर्क ठेवणे अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपा