शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

'म्हादई'चे पाणी वळवू नका; बेळगावमध्ये मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 08:36 IST

शेतकरी, विद्यार्थ्यांसह पर्यावरणप्रेमी एकवटले

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : म्हादाई आणि कळसा-भांडुरा प्रकल्पांमुळे पश्चिम घाटातील जैवविविधता आणि वनसंपदेला धोका निर्माण झाला आहे. या प्रकल्पांमुळे गोव्यालाही मोठा फटका बसणार असून, संपूर्ण उत्तर कर्नाटकचे रूपांतर वाळवंटात होणार असल्याची भीती व्यक्त करत काल सकाळी 'रॅली फॉर बेळगाव'च्या बॅनरखाली बेळगावात मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी बेळगाव जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले.

यावेळी बेळगाव शहरातील सरदार हायस्कूल मैदानावर पर्यावरणप्रेमी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांसह नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव आणि पश्चिम घाटातील जंगले, तलाव आणि धबधबे यांचे रक्षण करण्याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या रॅलीचा उद्देश होता. निदर्शकांनी सांगितले की, ही चळवळ केवळ पाण्याबद्दल नाही, तर पाण्याचा न्याय सुनिश्चित करणे, जैवविविधतेचे रक्षण करणे आणि येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करणे यासाठी देखील आहे.

कर्नाटकने पाणी वळवण्याच्याबाबतीत आणखी एक पाऊल पुढे टाकताना अलीकडेच कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी भूसंपादनाबाबत खानापूर तालुक्यात शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या. पाणी वळवल्यास बेळगाव तसेच उत्तर कर्नाटक भागावर मोठा परिणाम होईल, अशी भीती स्थानिकांनाही आहे. त्या पार्श्वभूमीवरच हे आंदोलन होते.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सदर मोर्चाची सांगता झाली. त्या ठिकाणी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन सादर करण्यात आले. म्हादई प्रकल्पासह हिडकल जलाशयाचे पाणी हुबळी धारवाडकडे वळवण्याच्या प्रकल्पाविरोधातील आजच्या या जनआंदोलनाचे नेतृत्व दिलीप कामत, शिवाजीराव कागणीकर, कॅ. नितीन धोंड, अमृत चरंतीमठ, लिंगराज जगजंपी, सुरेश हेबळीकर, नाईला कोयलो, नीता पोतदार, शारदा गोपाळ, सुजित मुळगुंद आदींनी केले.

गोव्यात चळवळीला बळ मिळणार

म्हादईचे नदीचे पाणी वळवल्याने वन्यजीव तसेच मानव जीवितावर कोणताही परिणाम होणार नाही, असा अहवाल एनआयओने दिल्याने त्यावरून गोव्यात गेले काही दिवस खळबळ माजली आहे. विरोधी पक्षांनी हा विषय उचलून धरला. आरजीने दोनापावला येथे एनआयओच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शनेही केली होती. गोव्यातून पाणी वळविण्यास विरोध करणाऱ्या म्हादई बचाव आंदोलन, स्थानिक पर्यावरणप्रेमींच्या चळवळीला बेळगावच्या या आंदोलनामुळे बळ मिळाले आहे.

आम्ही मात्र गप्पच : राजन घाटे

म्हादई आमची जीवनदायिनी आहे. पण, म्हादईसाठी राज्यात कुठेच चळवळ होत नाही, उलट कर्नाटकमधील बेळगाव येथे म्हादई वळविण्याविरोधात मोर्चा काढला जात आहे. हे खरोखरच कौतुकास्पद आहे. आम्ही देखील या मोर्चाला पाठिंबा दिला पाहिजे, तरच म्हादई वाचणार आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते राजन घाटे यांनी दिली. प्रा. राजेंद्र केरकर यांनी अनेकदा आम्हाला मार्गदर्शन केले आहे, पण त्यांना लोकांकडून बळ मिळाले नाही. व्याघ्रप्रकल्प क्षेत्र व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो, तेव्हा आमच्याच पंचायतीमधील सरपंच, पंच सदस्यांनी दबावात येत याला विरोध केला. उच्च न्यायालयाने आम्हाला व्याघ्र प्रकल्प क्षेत्र करण्यासाठी मान्यता दिली आहे तर ते का होत नाही? आमच्याच स्वार्थासाठी आम्ही म्हादईचा गळा घोटला आहे, असे घाटे यांनी यावेळी सांगितले. म्हादईच्या विषयावरून राजन घाटे यांनी मंगळवारी आझाद मैदान येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी व इतर मान्यवर उपस्थित होते. म्हादई वाचविण्यासाठी व्याघ्रप्रकल्प क्षेत्र घोषित करणे अत्यंत गरजेचे आहे. आतापर्यंत या विषयासाठी सरकारने ७ ते ८ कोटी रुपये खर्च केले आहेत. मंत्री विश्वजित राणे म्हणतात की, राज्यात वाघ नाही. परंतु, आज वाघ, बिबटे गावागावात पोहोचले आहेत. त्यामुळे सर्वानी एकत्र येऊन या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन घाटे यांनी केले. 

टॅग्स :goaगोवाKarnatakकर्नाटकbelgaonबेळगाव