शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

‘आमदारांनी गाफील राहू नये’

By admin | Updated: October 29, 2015 02:02 IST

पणजी : राज्यातील अकरा नगरपालिकांचे निकाल आमच्यासाठी अनुकूल आहेत. भाजपच्या आमदार व कार्यकर्त्यांनी पालिका निवडणुकीत खूप मेहनत घेतली

पणजी : राज्यातील अकरा नगरपालिकांचे निकाल आमच्यासाठी अनुकूल आहेत. भाजपच्या आमदार व कार्यकर्त्यांनी पालिका निवडणुकीत खूप मेहनत घेतली. त्याचे चांगले फळ मिळाले. मात्र, विधानसभा निवडणूक २०१७ साली होणार असल्याने आताच्या यशामुळे भाजपच्या आमदारांनी व कार्यकर्त्यांनीही गाफील राहू नये, असा सल्ला मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिला. बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मडगाव, वाळपई, केपे अशा ठिकाणी अगोदर भाजपचे नगरसेवक नव्हतेच. तिथेही आता भाजपला स्थान मिळाले आहे. पालिकांमध्ये आम्हाला सत्ता मिळाली नाही, तरी आमचे नगरसेवक आता त्या पालिकांमध्ये पोहोचले आहेत. तिथे भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. आमच्या सगळ्याच आमदारांनी पालिका निवडणुकीवेळी जोरात काम केले. मात्र, आमदारांनी गाफील न राहता अजून काम वाढविण्याची गरज आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, काँग्रेस पक्ष पालिका निवडणुकीवेळी रिंगणात नव्हता, हा दावा चुकीचा आहे. काँग्रेसचे सगळेच आमदार पालिका निवडणुकीवेळी सक्रिय होते. त्यांनी उमेदवार उभे केले होते. (खास प्रतिनिधी)