शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

'चुका करायला घाबरु नका, त्या चुकीत उद्याचा आविष्कार दडलेला असेल', नोबेल पुरस्कार विजेत्यांचा विद्यार्थ्यांना सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2018 16:57 IST

इंग्लंडचे नोबेल पुरस्कार विजेते रिचर्ड रॉबर्डस् व थॉमस लिंडहाल यांनी हा मंत्र मडगावातील विद्यार्थ्यांना दिला.

मडगाव : चुका होतील या भीतीने प्रयत्न करणे सोडून देऊ नका, मुख्य म्हणजे चुका करण्यासच घाबरु नका, तुमच्या या आजच्या चुकीत कदाचित उद्याचा महान आविष्कार दडलेला असू शकत.  इंग्लंडचे नोबेल पुरस्कार विजेते रिचर्ड रॉबर्डस् व थॉमस लिंडहाल यांनी शनिवारी हा मंत्र मडगावातील विद्यार्थ्यांना दिला.

नोबेल प्राईज सिरिजमध्ये शनिवारी या दोन्ही नोबेल पुरस्कार विजेत्यांशी सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी मडगावच्या रवींद्र भवनात संवाद साधला. यावेळी दोन्ही विजेत्यांनी विद्यार्थ्यांशी समरस होऊन गप्पा मारल्या. त्यांच्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली. आणि आपल्या शोधाबद्दलही माहिती दिली.

डीएनएमधील इंन्ट्रोन्सचा शोध लावणा-या रिचर्ड रॉबर्डस् या ब्रिटीश बायोकेमिस्टला 1993 सालचा वैद्यक विभागातील तर कॅन्सरवर संशोधन करुन डीएनएची दुरुस्ती यंत्रणा शोधून काढणारे थॉमस लिंडहाल यांना 2015 सालचा रसायन शास्त्रचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता. या दोन्ही शास्त्रज्ञांनी आपल्या संशोधनाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.

संशोधन करताना कित्येकवेळा अपयश येते, कित्येकवेळा चुकाही घडतात. वास्तविक या चुकांच्या मालिकांतूनच नवीन आविष्काराची जडणघडण ठरते. त्यामुळे अपशयाला घाबरुन चालणार नाही असे रॉबर्ड रिचर्डस् म्हणाले. ते म्हणाले, कित्येकवेळा यश मिळण्यासाठी तुमच्या प्रयत्नांबरोबरच नशिबाचीही गरज असते. मी स्वत: कित्येकवेळा असा नशिबवान ठरलो आहे. मात्र नशिबाने दिलेली संधी वाया घालविता कामा नये.

थॉमस लिंडहाल म्हणाले, नशिबाबरोबरच खडतर प्रयत्नांच्या अभावी यश तुमच्यापासून दूर जाऊ शकते. जर तुम्हाला कुठलाही छंद असेल तर तो जोपासून त्यातच आपले करियर शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर कुठलीही गोष्ट आवडत असेल तर ती जरुर करा असे त्यांनी सांगितले.

भारत एवढा मोठा देश असून आतार्पयत या देशात केवळ दोनच नोबेल पुरस्कार विजेते का ठरु शकले या प्रश्र्नाला उत्तर देताना रॉबर्डस् म्हणाले, भारताने आता शिक्षण, विज्ञान व संशोधन या तीन क्षेत्रत जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याची गरज आहे. भारतात संशोधन वाढल्यास वैज्ञानिकही वाढतील.

आल्फ्रेड नोबेलसारख्या शास्त्रज्ञाने डायनामाईटचा शोध लावला. मात्र त्यानंतर या शोधाचा विध्वंसासाठी वापर केला गेला, याबद्दल या दोन्ही शास्त्रज्ञांना विचारले असता, कुठलाही शास्त्रज्ञ चांगल्यासाठीच संशोधन करतो. पण हा शोध जेव्हा इतरांकडे पोचतो तेव्हा मात्र त्या शास्त्रज्ञाचा आपल्या संशोधनावर कुठलेही नियंत्रण राहू शकत नाही. कुठल्याही संशोधनाचा चांगला वापर करावा की वाईट हे समाजाने ठरवायचे असते असे लिंडहाल म्हणाले. 

टॅग्स :Nobel Prizeनोबेल पुरस्कार