शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

'चुका करायला घाबरु नका, त्या चुकीत उद्याचा आविष्कार दडलेला असेल', नोबेल पुरस्कार विजेत्यांचा विद्यार्थ्यांना सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2018 16:57 IST

इंग्लंडचे नोबेल पुरस्कार विजेते रिचर्ड रॉबर्डस् व थॉमस लिंडहाल यांनी हा मंत्र मडगावातील विद्यार्थ्यांना दिला.

मडगाव : चुका होतील या भीतीने प्रयत्न करणे सोडून देऊ नका, मुख्य म्हणजे चुका करण्यासच घाबरु नका, तुमच्या या आजच्या चुकीत कदाचित उद्याचा महान आविष्कार दडलेला असू शकत.  इंग्लंडचे नोबेल पुरस्कार विजेते रिचर्ड रॉबर्डस् व थॉमस लिंडहाल यांनी शनिवारी हा मंत्र मडगावातील विद्यार्थ्यांना दिला.

नोबेल प्राईज सिरिजमध्ये शनिवारी या दोन्ही नोबेल पुरस्कार विजेत्यांशी सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी मडगावच्या रवींद्र भवनात संवाद साधला. यावेळी दोन्ही विजेत्यांनी विद्यार्थ्यांशी समरस होऊन गप्पा मारल्या. त्यांच्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली. आणि आपल्या शोधाबद्दलही माहिती दिली.

डीएनएमधील इंन्ट्रोन्सचा शोध लावणा-या रिचर्ड रॉबर्डस् या ब्रिटीश बायोकेमिस्टला 1993 सालचा वैद्यक विभागातील तर कॅन्सरवर संशोधन करुन डीएनएची दुरुस्ती यंत्रणा शोधून काढणारे थॉमस लिंडहाल यांना 2015 सालचा रसायन शास्त्रचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता. या दोन्ही शास्त्रज्ञांनी आपल्या संशोधनाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.

संशोधन करताना कित्येकवेळा अपयश येते, कित्येकवेळा चुकाही घडतात. वास्तविक या चुकांच्या मालिकांतूनच नवीन आविष्काराची जडणघडण ठरते. त्यामुळे अपशयाला घाबरुन चालणार नाही असे रॉबर्ड रिचर्डस् म्हणाले. ते म्हणाले, कित्येकवेळा यश मिळण्यासाठी तुमच्या प्रयत्नांबरोबरच नशिबाचीही गरज असते. मी स्वत: कित्येकवेळा असा नशिबवान ठरलो आहे. मात्र नशिबाने दिलेली संधी वाया घालविता कामा नये.

थॉमस लिंडहाल म्हणाले, नशिबाबरोबरच खडतर प्रयत्नांच्या अभावी यश तुमच्यापासून दूर जाऊ शकते. जर तुम्हाला कुठलाही छंद असेल तर तो जोपासून त्यातच आपले करियर शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर कुठलीही गोष्ट आवडत असेल तर ती जरुर करा असे त्यांनी सांगितले.

भारत एवढा मोठा देश असून आतार्पयत या देशात केवळ दोनच नोबेल पुरस्कार विजेते का ठरु शकले या प्रश्र्नाला उत्तर देताना रॉबर्डस् म्हणाले, भारताने आता शिक्षण, विज्ञान व संशोधन या तीन क्षेत्रत जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याची गरज आहे. भारतात संशोधन वाढल्यास वैज्ञानिकही वाढतील.

आल्फ्रेड नोबेलसारख्या शास्त्रज्ञाने डायनामाईटचा शोध लावला. मात्र त्यानंतर या शोधाचा विध्वंसासाठी वापर केला गेला, याबद्दल या दोन्ही शास्त्रज्ञांना विचारले असता, कुठलाही शास्त्रज्ञ चांगल्यासाठीच संशोधन करतो. पण हा शोध जेव्हा इतरांकडे पोचतो तेव्हा मात्र त्या शास्त्रज्ञाचा आपल्या संशोधनावर कुठलेही नियंत्रण राहू शकत नाही. कुठल्याही संशोधनाचा चांगला वापर करावा की वाईट हे समाजाने ठरवायचे असते असे लिंडहाल म्हणाले. 

टॅग्स :Nobel Prizeनोबेल पुरस्कार