शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

गॅस वाहिनी टाकण्याचे काम अखेर दोनापावल, करंजाळेच्या पट्ट्यात सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 20:49 IST

गॅस अथोरिटी ऑफ इंडिया (गेल) आणि भारत पेट्रोलियम कॉर्परेरेशन लिमिटेडतर्फे नैसर्गिक वायूची वाहिनी टाकण्याचे काम अखेर दोनापावल आणि करंजाळेच्या भागात सुरू झाले आहे. पणजी महापालिकेने ब-याच प्रतीक्षेनंतर गेल व भारत पेट्रोलियमच्या ह्या प्रकल्पाची वाहिनी टाकण्यासाठी परवानगी दिल्यानंतर आता दोनापावल- करंजाळेच्या पट्टय़ात वाहिनी टाकण्याचे काम प्रत्यक्ष सुरू झाले आहे.

पणजी : गॅस अथोरिटी ऑफ इंडिया (गेल) आणि भारत पेट्रोलियम कॉर्परेरेशन लिमिटेडतर्फे नैसर्गिक वायूची वाहिनी टाकण्याचे काम अखेर दोनापावल आणि करंजाळेच्या भागात सुरू झाले आहे. पणजी महापालिकेने ब-याच प्रतीक्षेनंतर गेल व भारत पेट्रोलियमच्या ह्या प्रकल्पाची वाहिनी टाकण्यासाठी परवानगी दिल्यानंतर आता दोनापावल- करंजाळेच्या पट्टय़ात वाहिनी टाकण्याचे काम प्रत्यक्ष सुरू झाले आहे.

पणजी महापालिकेकडून अगोदर या प्रकल्पासाठी परवानगीच मिळत नव्हती. महापालिका आयुक्तपदी आयएएस अधिकारी आल्यानंतर परवानगी मिळाली. त्यामुळे आता दोनापावल भागात काम सुरू झाले आहे. सध्या फक्त सहा किलोमीटरची वायूवाहिनी पणजीत टाकण्यासाठी परवानगी मिळाली आहे. काही रस्ते हे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येतात. ते फोडून तिथे वायूवाहिनी टाकण्यासाठी बांधकाम खात्याकडून परवानगी गेलने मागितली आहे. ती मिळालेली नाही. मडकईहून पणजीत वायू आणला जाणार आहे. पूर्वी बांबोळीहून वायूवाहिनी आणण्याचा प्रस्ताव होता पण बांधकाम खात्याने त्यासाठी परवानगी न दिल्याने मार्गात बदल केला गेला. पणजीत उपकेंद्र बांधण्याची गेलची योजना आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे संबंधितांनी जमीन मागितली आहे.

स्वयंपाकाचा गॅस व औद्योगिक वापरासाठीचा गॅस या वाहिनीद्वारे उपलब्ध करण्याची योजना आहे. घरोघर जोडण्या देऊन हा वायू पोहचविण्याचा गोव्याच्या विविध भागांतील हा प्रकल्प एकूण 119 कोटी रुपयांचा आहे. कुंडई, फोंडा आदी भागांमध्ये काम झाले आहे. डिचोली तालुक्यातील कुडचिरे भागातून ही वाहिनी खांडोळा, माशेलमार्गे कुंडई व तिथून फोंडय़ात पोहचली आहे. पणजीला मडकईहून वायू आणताना खूप कसरती कराव्या लागतील. त्यासाठी बरेच काम करावे लागेल, कारण मध्ये नदी, नाले, पुल वगैरे येतात, असे एका अधिका:याने सांगितले. घरगुती वापरासह व्यवसायिक आस्थापनांनाही या वायूचा लाभ होणार आहे. काही उद्योगांनी या वायूसाठी प्रतीक्षा केली आहे. 

गोव्याची वायूवाहिनी ही दाबोळ-बंगळुर वायूवाहिनीला जोडली जाणार आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी, कोल्हापुर जिल्ह्यांसह ही वायूवाहिनी बेळगाव, धारवाड, हवेरी आदी भागांत जाते. जमिनीखालून जाणा:या या वायूवाहिनीला प्रथम गोव्यातील काही भागांत विरोध झाला होता व त्यामुळे कामाला विलंब झाला होता. डिचोलीतील कुडचिरे येथे या वाहिनीचे वाल्व स्टेशन आहे. 

टॅग्स :goaगोवा