शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

जि. पं. निवडणुकीची तारीख पुन्हा अडचणीत

By admin | Updated: February 4, 2015 02:36 IST

पणजी : राज्यातील जिल्हा पंचायतीच्या निवडणुका येत्या १५ मार्च रोजी घेणे बंधनकारक असले तरी, कायदा दुरुस्ती व

पणजी : राज्यातील जिल्हा पंचायतीच्या निवडणुका येत्या १५ मार्च रोजी घेणे बंधनकारक असले तरी, कायदा दुरुस्ती व अन्य शासकीय सोपस्कार पार पाडण्यात सध्या बराच वेळ जात आहे. यामुळे १५ रोजी निवडणुका घेणे आता राज्य निवडणूक आयोगाला अशक्य वाटू लागले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. जिल्हा पंचायत निवडणुकीची तारीख पुन्हा एकदा अडचणीत आल्याची कल्पना सरकारलाही आली आहे. सरकारने गोवा पंचायत व जिल्हा पंचायत निवडणूक प्रक्रियेशी संबंधित नियम दुरुस्त करण्याचा निर्णय गेल्या शुक्रवारी घेतल्यानंतर दुरुस्तीबाबतचा मसुदा मंगळवारी राजपत्रातून अधिसूचित केला आहे. जिल्हा पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर घेण्यासाठी नियमांत आवश्यक बदल करण्यात आले आहेत. राजकीय पक्षांच्या चिन्हांवर निवडणुका होणार आहेत. अधिसूचित करण्यात आलेला मसुदा दहा दिवसांसाठी सूचना व आक्षेपांसाठी लोकांकरिता खुला करण्यात आला आहे. दहा दिवसांनंतर अंतिम अधिसूचना निघेल. सूचना व आक्षेप जास्त आले, तर कदाचित अंतिम अधिसूचना निघण्यास वेळही लागू शकतो. या विलंबामुळे राज्य निवडणूक आयोग चिंतेत आहे; कारण १५ मार्च रोजी निवडणुका घेण्यासाठी वेळ अपुरा पडत आहे. जिल्हा पंचायत मतदारसंघ फेररचनेची व आरक्षणाची अधिसूचना निघण्यास वेळ लागेल. त्यानंतर १५ मार्र्च रोजी निवडणुका घेणे कठीण जाईल, अशी चर्चा निवडणूक आयोगाच्या स्तरावर सुरू झाली आहे. १५ मार्च रोजी निवडणूक घेण्यासाठी निवडणुकीची घोषणा दीड महिना अगोदर तरी व्हायला हवी. ती वेळ टळून जात असल्याचे आयोगाला वाटत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा पंचायत कायदा दुरुस्तीसाठी वटहुकूम जारी केला जाणार आहे. वटहुकुमावर राज्यपालांची सही मिळविण्यासाठी फाईल मंगळवारीच राजभवनावर पाठविण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले. वटहुकूम जारी झाल्यानंतर दुरुस्ती कायदा अस्तित्वात येईल; पण नियम अधिसूचित होण्यासाठी आणखी दहा दिवस लागतील. निवडणुका १५ मार्च रोजी घेता आल्या नाहीत, तर निवडणुकीचा विषय न्यायप्रविष्ट होऊ शकतो. (खास प्रतिनिधी)