शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

मतभेद मिटले, प्रसंगी कारवाई - दिपक ढवळीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 12:24 IST

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तीन आमदारांमध्ये जे मतभेद होते, ते सामोपचाराने मिटविले गेले आहेत असा दावा मगो पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री दिपक ढवळीकर यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी केला.

ठळक मुद्देमहाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तीन आमदारांमध्ये जे मतभेद होते, ते सामोपचाराने मिटविले गेले आहेत असा दावा दिपक ढवळीकर यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी केला. मगो पक्षाच्या संघटनेचाही आमदारांशी सुसंवाद आहे. बैठकांनाही आमदार उपस्थित असतात.बाबू आजगावकर हे मगो पक्षाचे ज्येष्ठ मंत्री आहेत. आजगावकर यांच्याविरोधात मगो पक्षाने कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही.

पणजी - महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या (मगोप) तीन आमदारांमध्ये जे मतभेद होते, ते सामोपचाराने मिटविले गेले आहेत असा दावा मगो पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री दिपक ढवळीकर यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी केला. जर पक्षातील कुणी सभापतींना किंवा राजभवनला वगैरे परस्पर कसले पत्र दिलेले असेल तर पक्षाच्या घटनेनुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असे ढवळीकर म्हणाले.

ढवळीकर म्हणाले, की तिन्ही आमदारांमध्ये थोडा गैरसमज निर्माण झाला होता. आपण अध्यक्ष या नात्याने आमदारांची बैठक घेतली व गैरसमज दूर करत मतभेद मिटविले आहेत. काहीजण उगाच आमच्या पक्षात गैरसमज निर्माण करू पाहत आहेत. आमदारांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण करू पाहत आहेत. प्रत्यक्षात आमचे आमदार संघटीत आहेत. मगो पक्षाच्या संघटनेचाही आमदारांशी सुसंवाद आहे. बैठकांनाही आमदार उपस्थित असतात.

ढवळीकर म्हणाले, की बाबू आजगावकर हे मगो पक्षाचे ज्येष्ठ मंत्री आहेत. आजगावकर यांच्याविरोधात मगो पक्षाने कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही. उगाच तशा अफवा विरोधक पसरवत आहेत. अशा प्रकारच्या चर्चेला बळ पुरविणाऱ्या घटकांचा मी निषेध करतो. मुळात आजगावकर यांच्याविरोधात पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही. तसे काही घडलेले नाही. जे थोडेफार मतभेद आमदारांमध्ये होते ते अगोदरच दूर झालेले आहेत. 

ढवळीकर म्हणाले, की आजगावकर व दिपक पाऊसकर हे आमदार पूर्णपणे पक्षासोबत आहेत. ते पक्ष सोडून जाण्याचा प्रश्न येत नाही. मी स्वत: शिरोडा मतदारसंघातून विधानसभेची पोटनिवडणूक लढवत आहे. आम्ही गोव्यात भाजपाप्रणीत आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाला पूर्ण सहकार्य केले आहे. यापुढे लोकसभा निवडणुकीवेळीही आम्ही भाजपाला सहकार्य करणार आहोत. शिरोडा मतदारसंघातून मी उमेदवारी मागे घ्यावी असे भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी मला कधी सांगितलेही नाही.

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण