शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
3
काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
4
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
5
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
6
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
7
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
8
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
9
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
10
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
11
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
12
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
13
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
14
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
15
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
16
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
17
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
18
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
19
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
20
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी

गोव्यात खाणबंदी अंमलबजावणीबाबत, सचिवांचे अधिका-यांना सक्त निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 20:08 IST

खाणबंदीचे काऊंटडाऊन सुरु झाले असताना खात्याचे सचिव दौलतराव हवालदार यांनी बैठक घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी उचलावयाच्या पावलांबद्दल अधिका-यांना महत्त्वाचे निर्देशही दिले.

पणजी : खाणबंदीचे काऊंटडाऊन सुरु झाले असताना खात्याचे सचिव दौलतराव हवालदार यांनी बैठक घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी उचलावयाच्या पावलांबद्दल अधिका-यांना महत्त्वाचे निर्देशही दिले. इंडियन ब्युरो आॅफ माइन्स (आयबीएम)चे विभागीय नियंत्रक वाय. जी. काळे हेही यावेळी उपस्थित होते. 

सर्वोच्च न्यायालयाने १६ मार्चपासून गोव्यातील ८८ खाण लीज रद्दबातल ठरविल्याने खाणी बंद कराव्या लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर वरील बैठक झाली. उपस्थित अन्य अधिका-यांमध्ये राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पर्यावरण अभियंता संजीव जोगळेकर, वन्य प्राणी व पर्यावरण विभागाचे तथा वन खात्याचे वनपाल अनिल कुमार, खाण संचालक प्रसन्न आचार्य बैठकीला उपस्थित होते. 

अहवाल मागितला  

खाणी तपासण्यासाठी स्थापन केलेल्या चार पथकांमध्येअन्य खात्यांच्या प्रतिनिधींचाही समावेश करावा. १५ रोजी खाणबंदीनंतर तपासणी केलेला अहवाल १६ रोजी सादर केला जावा. उत्खनन पूर्णपणे बंद झाल्याची खात्री करुन घ्यावी. १५ मार्चपर्यंत उत्खनन केलेल्या खनिजाच्या वाहतुकीबाबत कायदेशीर सल्ला घेतल्यानंतरच निर्णय होईल. तूर्त १५ मार्चपासून वाहतूक बंद ठेवावी, असे बजावण्यात आले आहे. 

२0१७-१८ या आर्थिक वर्षात ज्या खाणींनी उत्खनन सुरु केले नाही अशा लीज क्षेत्राची पाहणी प्रथम केली जाणार आहे. काल मंगळवारी सायंकाळपासून हे काम सुरुही झाले. त्यानंतर २0१५ नंतर जी लीज क्षेत्रे कार्यरत झाली आणि ज्यांनी उत्खनन व वाहतूक बंद केली त्या खाणींना भेट दिली जाईल.  

सुरक्षा उपाययोजनांचे काय? 

खाण सुरक्षेबाबत सचिवांनी चिंता व्यक्त केली. अशा किती खाणी आहेत की तेथे सुरक्षेची समस्या आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पूर्वीच्या लीजधारकांकडून या खाणींमध्ये सुरक्षा उपाययोजना हाती घेतल्या जाणार आहेत काय, हादेखिल प्रश्न आहे. कायदेशीररित्या १६ मार्चनंतर आजच्या लीजधारकांना सुरक्षा उपाययोजनांसाठी सक्ती करता येणार नसल्याचे विभागीय खाण नियंत्रकांचे म्हणणे होते. मात्र खाण खात्याच्या संचालकांनी अशी माहिती दिली की, लीजधारकांनी १६ मार्चनंतरही सदर जबाबदारी पार पाडण्याची तयारी दाखवली आहे. खाण सुरक्षा संचालनालयाचे कोणीही अधिकारी उपस्थित नव्हते.

खाणींच्या परिसरात राहणा-या लोकांना खंदकांचा किंवा सुरक्षेच्या बाबतीत अन्य गोष्टींचा त्रास होऊ नये यासाठी खाण संचालकांनी संबंधित यंत्रणांशी सन्मवय साधून योग्य त्या उपाययोजना हाती घ्याव्यात, असे सचिवांनी बजावले आहे.

टॅग्स :goaगोवा