शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आता घरमालकांना थेट इशारा; घरोघरी होणार पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2024 09:29 IST

किनारी गस्तीसाठी दुप्पट पोलिसांची नियुक्ती करणार

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील भाडेकरू पडताळणीची मुदत संपल्याने आता धडक मोहीम सुरू केली जाईल. जर संबंधितांची नोंद करण्यात आली नसेल तर घरमालकाला एक हजार ते दहा हजार रुपये दंड ठोठावला जाईल. तसेच चौकशीसाठीही यावे लागेल, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, किनारी भागात कार्यरत असलेल्यांपैकी ४० टक्के पोलिस रात्रीच्या गस्तीवर असतील. रात्री दहानंतर उघड्यावर आयोजित केले जाणारे संगीत रजनी कार्यक्रम पूर्णतः बंद केले जातील, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री म्हणाले की, भाडेकरूंच्या पडताळणीसाठी पोलिसांत विविध नमुन्यांतील माहिती अर्ज भरून देण्यासाठी १० ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. आणखी चार ते पाच दिवसांसाठी वाढवून देण्यात आलेली मुदतसुद्धा आता संपली आहे.' ज्यांनी भाडेकरूंची पडताळणी केलेली नाही, त्यांच्यावर काय कारवाई करणार? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता मुख्यमंत्री म्हणाले की, 'आता धडक कारवाई सुरू होईल. ज्यांनी भाडेकरूंची पडताळणी करून घेतलेली नाही, त्यांच्यासाठी एक हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल. भाडेकरू किती काळ राहिला हे पाहिले जाईल, शिवाय एखादा भाडेकरू जर गुन्ह्यात सापडला तर घरमालकालाही चौकशीसाठी पोलिस स्थानकात यावे लागेल.'

मुख्यमंत्री म्हणाले की, 'किनारी भागात रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांची संख्या आम्ही दुप्पट करणार आहोत. राज्यभरात रात्रीच्या बंदोबस्तासाठी २० टक्के पोलिस असतील तर किनारी भागात दुप्पट म्हणजे ४० टक्के पोलिस कार्यरत असतील,'

मंत्रिमंडळ बैठकीत अन्य महत्त्वाचे निर्णय

सरकारी विद्यालयांमधील अकरा मुख्याध्यापकांना निवृत्तीनंतर एक वर्षाची सेवावाढ देणार. आरोग्य खात्यात डॉ. संतोष नाईक यांना एक वर्षाची मुदतवाढ. गोमेकॉतील वेलनेस औषधालयाचे १४ कोटी रुपयांचे बिल मंजूर, बराच काळ हे बिल पडून होते.

एकाच जागी असलेल्यांच्या बदल्या

गेल्या अनेक वर्षे एकाच जागी असलेल्या पोलिसांच्या बदल्यांचे सत्र आता सुरू होणार आहे. पुढील आठ ते दिवसात पोलिस कॉन्स्टेबलपासून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या घाऊक बदल्या केल्या जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

शाळांना कंत्राटी शिक्षक

कमी पटसंख्या असलेल्या शाळांना कंत्राटी पद्धतीवरच शिक्षक नेमता येतील. पुरेसे विद्यार्थी असले तरच पूर्णवेळ कायम शिक्षक नेमण्यासाठी परवानगी दिली जाईल, असे सावंत यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, 'विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षकांचे प्रमाण ठरलेले आहे. त्यानुसारच शिक्षक मंजूर केले जातात.'

बालरथांच्या समस्यांना शाळाच जबाबदार

बालरथांच्या बाबतीत काही समस्या उद्भवल्यास शाळा व्यवस्थापनच जबाबदार राहील, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. ते म्हणाले की, शाळांसाठीची बालरथ योजना चालूच राहील. परंतु नवे बालरथ दिले जाणार नाहीत. शाळा व्यवस्थापनांनी योजनांमधून मिळणाऱ्या पैशातून ही व्यवस्था करावी.

ते म्हणाले की, बालरथ चालवण्यात ज्या काही अडचणी येत आहेत, त्यास शाळा व्यवस्थापनच जबाबदार आहेत. बालरथांच्या देखभाल, ल. दुरुस्तीसाठी दिलेले इतर पैसे कामांसाठी वळवू नयेत. सरकार पगारासाठी निधी देते; परंतु चालक, वाहकांना व्यवस्थापनाकडून वेळेत वेतन दिले जात नाही. त्यामुळे त्यांना चालक, वाहक मिळत नाहीत. सरकारने बालरथाचे अनुदान ३.७५ लाखांवरून वाढवून ४.२५ लाख रुपये केले आहे.

बागा-कळंगुट येथे दोघा स्थानिक युवकांवर एका क्लबचा मालक व कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्लाप्रकरणी तसेच स्थानिक युवतीची छेड काढण्याच्या प्रकरणानंतर तेथील वातावरण तापले होते. याबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, युवकावरील हल्लाप्रकरणी दोघांना अटक झालेली आहे. सरकार कोणाचीही गय करणार नाही. किनारी असो किंवा अन्य भागात, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.'

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतState Governmentराज्य सरकार