शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

आता घरमालकांना थेट इशारा; घरोघरी होणार पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2024 09:29 IST

किनारी गस्तीसाठी दुप्पट पोलिसांची नियुक्ती करणार

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील भाडेकरू पडताळणीची मुदत संपल्याने आता धडक मोहीम सुरू केली जाईल. जर संबंधितांची नोंद करण्यात आली नसेल तर घरमालकाला एक हजार ते दहा हजार रुपये दंड ठोठावला जाईल. तसेच चौकशीसाठीही यावे लागेल, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, किनारी भागात कार्यरत असलेल्यांपैकी ४० टक्के पोलिस रात्रीच्या गस्तीवर असतील. रात्री दहानंतर उघड्यावर आयोजित केले जाणारे संगीत रजनी कार्यक्रम पूर्णतः बंद केले जातील, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री म्हणाले की, भाडेकरूंच्या पडताळणीसाठी पोलिसांत विविध नमुन्यांतील माहिती अर्ज भरून देण्यासाठी १० ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. आणखी चार ते पाच दिवसांसाठी वाढवून देण्यात आलेली मुदतसुद्धा आता संपली आहे.' ज्यांनी भाडेकरूंची पडताळणी केलेली नाही, त्यांच्यावर काय कारवाई करणार? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता मुख्यमंत्री म्हणाले की, 'आता धडक कारवाई सुरू होईल. ज्यांनी भाडेकरूंची पडताळणी करून घेतलेली नाही, त्यांच्यासाठी एक हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल. भाडेकरू किती काळ राहिला हे पाहिले जाईल, शिवाय एखादा भाडेकरू जर गुन्ह्यात सापडला तर घरमालकालाही चौकशीसाठी पोलिस स्थानकात यावे लागेल.'

मुख्यमंत्री म्हणाले की, 'किनारी भागात रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांची संख्या आम्ही दुप्पट करणार आहोत. राज्यभरात रात्रीच्या बंदोबस्तासाठी २० टक्के पोलिस असतील तर किनारी भागात दुप्पट म्हणजे ४० टक्के पोलिस कार्यरत असतील,'

मंत्रिमंडळ बैठकीत अन्य महत्त्वाचे निर्णय

सरकारी विद्यालयांमधील अकरा मुख्याध्यापकांना निवृत्तीनंतर एक वर्षाची सेवावाढ देणार. आरोग्य खात्यात डॉ. संतोष नाईक यांना एक वर्षाची मुदतवाढ. गोमेकॉतील वेलनेस औषधालयाचे १४ कोटी रुपयांचे बिल मंजूर, बराच काळ हे बिल पडून होते.

एकाच जागी असलेल्यांच्या बदल्या

गेल्या अनेक वर्षे एकाच जागी असलेल्या पोलिसांच्या बदल्यांचे सत्र आता सुरू होणार आहे. पुढील आठ ते दिवसात पोलिस कॉन्स्टेबलपासून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या घाऊक बदल्या केल्या जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

शाळांना कंत्राटी शिक्षक

कमी पटसंख्या असलेल्या शाळांना कंत्राटी पद्धतीवरच शिक्षक नेमता येतील. पुरेसे विद्यार्थी असले तरच पूर्णवेळ कायम शिक्षक नेमण्यासाठी परवानगी दिली जाईल, असे सावंत यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, 'विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षकांचे प्रमाण ठरलेले आहे. त्यानुसारच शिक्षक मंजूर केले जातात.'

बालरथांच्या समस्यांना शाळाच जबाबदार

बालरथांच्या बाबतीत काही समस्या उद्भवल्यास शाळा व्यवस्थापनच जबाबदार राहील, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. ते म्हणाले की, शाळांसाठीची बालरथ योजना चालूच राहील. परंतु नवे बालरथ दिले जाणार नाहीत. शाळा व्यवस्थापनांनी योजनांमधून मिळणाऱ्या पैशातून ही व्यवस्था करावी.

ते म्हणाले की, बालरथ चालवण्यात ज्या काही अडचणी येत आहेत, त्यास शाळा व्यवस्थापनच जबाबदार आहेत. बालरथांच्या देखभाल, ल. दुरुस्तीसाठी दिलेले इतर पैसे कामांसाठी वळवू नयेत. सरकार पगारासाठी निधी देते; परंतु चालक, वाहकांना व्यवस्थापनाकडून वेळेत वेतन दिले जात नाही. त्यामुळे त्यांना चालक, वाहक मिळत नाहीत. सरकारने बालरथाचे अनुदान ३.७५ लाखांवरून वाढवून ४.२५ लाख रुपये केले आहे.

बागा-कळंगुट येथे दोघा स्थानिक युवकांवर एका क्लबचा मालक व कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्लाप्रकरणी तसेच स्थानिक युवतीची छेड काढण्याच्या प्रकरणानंतर तेथील वातावरण तापले होते. याबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, युवकावरील हल्लाप्रकरणी दोघांना अटक झालेली आहे. सरकार कोणाचीही गय करणार नाही. किनारी असो किंवा अन्य भागात, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.'

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतState Governmentराज्य सरकार