शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

वादामुळे अडले दिगंबर कामत, संकल्प आमोणकर, रमेश तवडकरांचे मंत्रिपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2024 10:12 IST

आता महाराष्ट्र निवडणूक निकालानंतरच गोव्यात बदल

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भाजपमधील अंतर्गत वाद, दोन मंत्र्यांचा संघर्ष आणि अन्य तत्सम कारणांमुळे गोव्यात मंत्रिमंडळ फेररचना अडली आहे. आता महाराष्ट्र, हरयाना आदी राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतरच गोव्यात काही राजकीय बदल होतील, अशी माहिती मिळाली आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यात मध्यंतरी जो संघर्ष झाला, त्यानंतर दिल्लीत केंद्रीय नेत्यांनी बैठक घेतली. मंत्रिमंडळाची फेररचना करायची झाली तर आपल्यालाही विश्वासात घेतले जावे, असा मुद्दा मंत्री राणे यांनी मांडला होता, तो केंद्रीय नेत्यांनी अगोदरच मान्य केला आहे. महाराष्ट्र व हरयाना निवडणूक निकाल लागेपर्यंत गोव्यात कोणताही बदल होणार नाहीत, याची कल्पना दिल्लीतील बैठकीनंतर गोव्यातील सर्व मंत्र्यांना आली आहे.

आमदार दिगंबर कामत, रमेश तवडकर, संकल्प आमोणकर, नीलेश काब्राल यांना मंत्रिमंडळात घेण्याचा भाजपच्या श्रेष्ठींचा विचार आहे. चतुर्थीनंतर मंत्रिमंडळ फेररचना होईल, असे विधान मध्यंतरी मुख्यमंत्री सावंत यांनी केले होते, पण कामत किंवा संकल्प यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी आता स्थिती अनुकूल नाही, असे गोव्यातील काही मंत्र्यांनी दिल्लीस कळविले आहे.

त्यांचे पद शाबूत... 

कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी मंत्रिपदासाठी डिलायला लोचो यांचे नाव सुचविले होते. तेही मान्य आलेले नाही. मंत्रिमंडळ फेररचना करण्यापूर्वी रोहन खंवटे यांना देखील विश्वासात घेतले जाणार आहे. कारण पर्यटन मंत्री खंवटे हे सध्या बार्देशमध्ये भाजपचे महत्त्वाचे नेते आहेत. नीळकंठ हळर्णकर किवा गोविंद गावडे यांचे मंत्रिपद काढून घेऊन ते अन्य काही नेत्यांना दिले जाईल ही चर्चा आता संपुष्टात येऊ लागली आहे.

भाजप कोअर टीमची बैठक 

दरम्यान, गोवा भाजपच्या कोअर टीमची महत्त्वाची एक बैठक आज, शुक्रवारी होत आहे. सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या बैठकीवेळी गोव्यातील सध्याची राजकीय स्थिती, काही धार्मिक गटांकडून तयार केले जाणारे वातावरण तसेच भाजपची सदस्य नोंदणी मोहीम यावर चर्चा होईल.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण