शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
3
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
4
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
5
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
6
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
7
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
8
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
9
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
10
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
11
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
12
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
13
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
16
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
17
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
18
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
19
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती

डिचोली, पेडण्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या: नरेश सावळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 12:32 PM

डिचोली व पेडणो तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अजुनही मिळालेली नाही.

पणजी : डिचोली व पेडणो तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अजुनही मिळालेली नाही. सरकारने त्याकडे लक्ष देऊन नुकसान भरपाईचा प्रश्न लवकर सोडवावा अशी मागणी माजी आमदार व मगोपच्या कार्यकारी समितीचे कार्याध्यक्ष नरेश सावळ यांनी केली आहे.

डिचोली व पेडण्यातील शेतकऱ्यांचे काही महिन्यांपूर्वी मोठे नुकसान झाले. तिळारीचे पाणी अचानक सोडल्यानंतर आलेल्या पुराचा अनेकांना फटका बसला. मुळात तिळारीचे पाणी सोडले जाईल याविषयी लोकांत पुरेशी जागृती करण्यात सरकारची खाती अपयशी ठरली होती, असे सावळ म्हणाले. डिचोलीतील साळ, धुमासे, मेणकुरे व अन्य भागांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकाची हानी झाली. साळला टेकून असलेल्या पेडणो तालुक्यातील इब्रामपुरमधील शेतकऱ्यांनाही फटका बसला. केळी बागायतदारांना नुकसान भरपाई देण्यात आल्याचा दावा सरकार करते पण साळ व इब्रामपुरमध्ये अनेक शेतकरी असे आहेत, ज्यांना अजून नुकसान भरपाई मिळालेली नाही.

सरकारने अन्य ठिकाणचा वायफळ खर्च व उधळपट्टी कमी करावी व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. भात पिकासह अन्य पिकाची नाशाडी झालेले शेतकरी अजुनही भरपाईच्या प्रतिक्षेत आहेत. एकाबाजूने रानडुक्कर व अन्य उपद्रवी प्राणी गरीब शेतकऱ्यांचे पीक नष्ट करतात व दुसऱ्याबाजूने सरकार भरपाई देखील लवकर देत नाही ही गोष्ट खेदजनक आहे. काही शेक:यांचे पन्नास हजारांचे नुकसान झाल्यानंतर सरकार केवळ पाच हजारांची भरपाई देते हे देखील धक्कादायक आहे, असे सावळ म्हणाले. भात पीक घेणारे शेतकरी असो किंवा केळी बागायतीत काम करणारे शेतकरी असो, त्यांना खूप कष्ट घ्यावे लागतात याची जाणीव सरकारने ठेवावी, असेही सावळ म्हणाले.

टॅग्स :Farmerशेतकरीgoaगोवा