शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

डिचोली, पेडण्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या: नरेश सावळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 12:34 IST

डिचोली व पेडणो तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अजुनही मिळालेली नाही.

पणजी : डिचोली व पेडणो तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अजुनही मिळालेली नाही. सरकारने त्याकडे लक्ष देऊन नुकसान भरपाईचा प्रश्न लवकर सोडवावा अशी मागणी माजी आमदार व मगोपच्या कार्यकारी समितीचे कार्याध्यक्ष नरेश सावळ यांनी केली आहे.

डिचोली व पेडण्यातील शेतकऱ्यांचे काही महिन्यांपूर्वी मोठे नुकसान झाले. तिळारीचे पाणी अचानक सोडल्यानंतर आलेल्या पुराचा अनेकांना फटका बसला. मुळात तिळारीचे पाणी सोडले जाईल याविषयी लोकांत पुरेशी जागृती करण्यात सरकारची खाती अपयशी ठरली होती, असे सावळ म्हणाले. डिचोलीतील साळ, धुमासे, मेणकुरे व अन्य भागांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकाची हानी झाली. साळला टेकून असलेल्या पेडणो तालुक्यातील इब्रामपुरमधील शेतकऱ्यांनाही फटका बसला. केळी बागायतदारांना नुकसान भरपाई देण्यात आल्याचा दावा सरकार करते पण साळ व इब्रामपुरमध्ये अनेक शेतकरी असे आहेत, ज्यांना अजून नुकसान भरपाई मिळालेली नाही.

सरकारने अन्य ठिकाणचा वायफळ खर्च व उधळपट्टी कमी करावी व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. भात पिकासह अन्य पिकाची नाशाडी झालेले शेतकरी अजुनही भरपाईच्या प्रतिक्षेत आहेत. एकाबाजूने रानडुक्कर व अन्य उपद्रवी प्राणी गरीब शेतकऱ्यांचे पीक नष्ट करतात व दुसऱ्याबाजूने सरकार भरपाई देखील लवकर देत नाही ही गोष्ट खेदजनक आहे. काही शेक:यांचे पन्नास हजारांचे नुकसान झाल्यानंतर सरकार केवळ पाच हजारांची भरपाई देते हे देखील धक्कादायक आहे, असे सावळ म्हणाले. भात पीक घेणारे शेतकरी असो किंवा केळी बागायतीत काम करणारे शेतकरी असो, त्यांना खूप कष्ट घ्यावे लागतात याची जाणीव सरकारने ठेवावी, असेही सावळ म्हणाले.

टॅग्स :Farmerशेतकरीgoaगोवा