शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
3
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
4
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
5
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
6
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
7
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
8
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
9
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
10
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
11
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
12
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
13
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
14
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
15
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
16
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
17
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
18
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
19
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
20
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’

डिचोली, पेडण्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या: नरेश सावळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 12:34 IST

डिचोली व पेडणो तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अजुनही मिळालेली नाही.

पणजी : डिचोली व पेडणो तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अजुनही मिळालेली नाही. सरकारने त्याकडे लक्ष देऊन नुकसान भरपाईचा प्रश्न लवकर सोडवावा अशी मागणी माजी आमदार व मगोपच्या कार्यकारी समितीचे कार्याध्यक्ष नरेश सावळ यांनी केली आहे.

डिचोली व पेडण्यातील शेतकऱ्यांचे काही महिन्यांपूर्वी मोठे नुकसान झाले. तिळारीचे पाणी अचानक सोडल्यानंतर आलेल्या पुराचा अनेकांना फटका बसला. मुळात तिळारीचे पाणी सोडले जाईल याविषयी लोकांत पुरेशी जागृती करण्यात सरकारची खाती अपयशी ठरली होती, असे सावळ म्हणाले. डिचोलीतील साळ, धुमासे, मेणकुरे व अन्य भागांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकाची हानी झाली. साळला टेकून असलेल्या पेडणो तालुक्यातील इब्रामपुरमधील शेतकऱ्यांनाही फटका बसला. केळी बागायतदारांना नुकसान भरपाई देण्यात आल्याचा दावा सरकार करते पण साळ व इब्रामपुरमध्ये अनेक शेतकरी असे आहेत, ज्यांना अजून नुकसान भरपाई मिळालेली नाही.

सरकारने अन्य ठिकाणचा वायफळ खर्च व उधळपट्टी कमी करावी व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. भात पिकासह अन्य पिकाची नाशाडी झालेले शेतकरी अजुनही भरपाईच्या प्रतिक्षेत आहेत. एकाबाजूने रानडुक्कर व अन्य उपद्रवी प्राणी गरीब शेतकऱ्यांचे पीक नष्ट करतात व दुसऱ्याबाजूने सरकार भरपाई देखील लवकर देत नाही ही गोष्ट खेदजनक आहे. काही शेक:यांचे पन्नास हजारांचे नुकसान झाल्यानंतर सरकार केवळ पाच हजारांची भरपाई देते हे देखील धक्कादायक आहे, असे सावळ म्हणाले. भात पीक घेणारे शेतकरी असो किंवा केळी बागायतीत काम करणारे शेतकरी असो, त्यांना खूप कष्ट घ्यावे लागतात याची जाणीव सरकारने ठेवावी, असेही सावळ म्हणाले.

टॅग्स :Farmerशेतकरीgoaगोवा