शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

मुरगावचा विकास होणारच

By admin | Updated: April 10, 2015 01:58 IST

वास्को : वेर्णा-मुरगाव बंदर या रस्त्याचे अर्धवट राहिलेले काम लवकरच पूर्ण होणार असल्याने मुरगाव बंदराचा विकास होणारच. त्याचबरोबर

वास्को : वेर्णा-मुरगाव बंदर या रस्त्याचे अर्धवट राहिलेले काम लवकरच पूर्ण होणार असल्याने मुरगाव बंदराचा विकास होणारच. त्याचबरोबर या शहराचा तसेच राज्याचाही विकास होणार आहे. या रस्त्यासाठी केंद्र सरकारने आपल्या वाट्याला येत असलेली १५६ कोटी रुपये कराराप्रमाणे खात्यात जमा केलेले आहेत. या रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होईल. त्यामुळे यापुढे वास्को शहरातील प्रदूषण, तसेच अपघात होण्याची समस्या सुटणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ, परिवहन आणि जल वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.गुरुवारी संध्याकाळी रवींद्र भवन बायणा येथे सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे दक्षिण गोव्यात बांधण्यात येणाऱ्या तीन महत्त्वाच्या प्रकल्पाची कोनशीला बसविण्याच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी व्यासपीठावर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, खासदार अ‍ॅड. नरेंद्र सावईकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, मुख्य सचिव आर. के., वीजमंत्री मिलिंद नाईक, आमदार कार्लुस आल्मेदा, सार्वजनिक खात्याचे प्रमुख अभियंते परिमल राय, मुरगाव पोर्ट ट्रस्टचे चेअरमन सिरिल जॉर्ज, मच्छीमार खात्याचे मंत्री आवेर्तान फुर्तादो, आमदार बेंजामिन सिल्वा, कायतू डिसिल्वा, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विविध विभागाचे अभियंते, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य जनरल मॅनेजर राजीव सिंग, भाजपा गोवा प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, गोवा राज्य साधनसुविधा महामंडळाचे अध्यक्षडॉ. प्रमोद सावंत आदी उपस्थित होते.वरुणापुरी ते मुरगाव बंदर या ८.७५ कि.मी. लांबीच्या सुमारे ५४६ कोटी रुपये खर्चून उड्डाण पुलासह बांधण्यात येणाऱ्या चौपदरी महामार्गाचा या कामात समावेश आहे.या वेळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले, वरुणापुरी ते मुरगाव बंदर हा महामार्ग पूर्ण झाल्यावर हा मार्ग इतर महामार्गांना जोडला जाईल, त्यामुळे मुरगाव बंदर अधिक विकसित होईल.या सोहळ््यास खास उपस्थित राहिलेल्या संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाषणात ‘वरुणापुरी ते मुरगाव बंदर हा रस्ता गेली १५ वर्षे रखडला होता. समस्या सोडविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दार खटखटावे लागले आणि त्यात यश मिळाले. यासाठी आमदार मिलिंद नाईक यांनी बराच पाठपुरावा केला; पण हा रस्ता पूर्ण करण्याचे श्रेय नितीन गडकरी यांना द्यावे लागेल,’ असे सांगितले.मंत्री नितीन गडकरी येणार असल्याचे कळाल्यावर काटेबायणा, तसेच समुद्रकिनाऱ्यावरील भरती रेषेच्या आत असलेल्या बेकायदेशीर घरमालकांनी गेले २५५ दिवस मामलेदार कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन केलेल्या पीडितांनी आपला मोर्चा रवींद्र भवनकडे वळविला होता; पण पोलिसांनी तो काही अंतरावर अडविला. तसेच गोवा बार्जमालक संघटना, दाबोळी विमानतळकाळ््या-पांढऱ्या टॅक्सी संघटनाआणि मुरगाव बंदर आणि गोदी कामगार संघटना आदींनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना आपले निवेदन सादर केले.मुरगावचे आमदार वीजमंत्री मिलिंद नाईक यांनी सर्वांचे स्वागत केले. मंत्री सुदिन ढवळीकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सचिन चाटे आणि अक्षता पुराणिक भट यांनी अनुक्रमे हिंदी आणि कोकणी भाषेतून केले. (प्रतिनिधी)