शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

मुरगावचा विकास होणारच

By admin | Updated: April 10, 2015 01:58 IST

वास्को : वेर्णा-मुरगाव बंदर या रस्त्याचे अर्धवट राहिलेले काम लवकरच पूर्ण होणार असल्याने मुरगाव बंदराचा विकास होणारच. त्याचबरोबर

वास्को : वेर्णा-मुरगाव बंदर या रस्त्याचे अर्धवट राहिलेले काम लवकरच पूर्ण होणार असल्याने मुरगाव बंदराचा विकास होणारच. त्याचबरोबर या शहराचा तसेच राज्याचाही विकास होणार आहे. या रस्त्यासाठी केंद्र सरकारने आपल्या वाट्याला येत असलेली १५६ कोटी रुपये कराराप्रमाणे खात्यात जमा केलेले आहेत. या रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होईल. त्यामुळे यापुढे वास्को शहरातील प्रदूषण, तसेच अपघात होण्याची समस्या सुटणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ, परिवहन आणि जल वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.गुरुवारी संध्याकाळी रवींद्र भवन बायणा येथे सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे दक्षिण गोव्यात बांधण्यात येणाऱ्या तीन महत्त्वाच्या प्रकल्पाची कोनशीला बसविण्याच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी व्यासपीठावर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, खासदार अ‍ॅड. नरेंद्र सावईकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, मुख्य सचिव आर. के., वीजमंत्री मिलिंद नाईक, आमदार कार्लुस आल्मेदा, सार्वजनिक खात्याचे प्रमुख अभियंते परिमल राय, मुरगाव पोर्ट ट्रस्टचे चेअरमन सिरिल जॉर्ज, मच्छीमार खात्याचे मंत्री आवेर्तान फुर्तादो, आमदार बेंजामिन सिल्वा, कायतू डिसिल्वा, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विविध विभागाचे अभियंते, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य जनरल मॅनेजर राजीव सिंग, भाजपा गोवा प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, गोवा राज्य साधनसुविधा महामंडळाचे अध्यक्षडॉ. प्रमोद सावंत आदी उपस्थित होते.वरुणापुरी ते मुरगाव बंदर या ८.७५ कि.मी. लांबीच्या सुमारे ५४६ कोटी रुपये खर्चून उड्डाण पुलासह बांधण्यात येणाऱ्या चौपदरी महामार्गाचा या कामात समावेश आहे.या वेळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले, वरुणापुरी ते मुरगाव बंदर हा महामार्ग पूर्ण झाल्यावर हा मार्ग इतर महामार्गांना जोडला जाईल, त्यामुळे मुरगाव बंदर अधिक विकसित होईल.या सोहळ््यास खास उपस्थित राहिलेल्या संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाषणात ‘वरुणापुरी ते मुरगाव बंदर हा रस्ता गेली १५ वर्षे रखडला होता. समस्या सोडविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दार खटखटावे लागले आणि त्यात यश मिळाले. यासाठी आमदार मिलिंद नाईक यांनी बराच पाठपुरावा केला; पण हा रस्ता पूर्ण करण्याचे श्रेय नितीन गडकरी यांना द्यावे लागेल,’ असे सांगितले.मंत्री नितीन गडकरी येणार असल्याचे कळाल्यावर काटेबायणा, तसेच समुद्रकिनाऱ्यावरील भरती रेषेच्या आत असलेल्या बेकायदेशीर घरमालकांनी गेले २५५ दिवस मामलेदार कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन केलेल्या पीडितांनी आपला मोर्चा रवींद्र भवनकडे वळविला होता; पण पोलिसांनी तो काही अंतरावर अडविला. तसेच गोवा बार्जमालक संघटना, दाबोळी विमानतळकाळ््या-पांढऱ्या टॅक्सी संघटनाआणि मुरगाव बंदर आणि गोदी कामगार संघटना आदींनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना आपले निवेदन सादर केले.मुरगावचे आमदार वीजमंत्री मिलिंद नाईक यांनी सर्वांचे स्वागत केले. मंत्री सुदिन ढवळीकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सचिन चाटे आणि अक्षता पुराणिक भट यांनी अनुक्रमे हिंदी आणि कोकणी भाषेतून केले. (प्रतिनिधी)