शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

१२००० कोटी रुपये खर्चूनही अखंडीत वीज पुरवठा करण्यात भाजप सरकार अपयशी - विराेधी नेते युरी आलेमाव

By सूरज.नाईकपवार | Updated: December 21, 2023 16:45 IST

वीज तोटा नियंत्रित करण्यात आणि थकबाकीदारांकडून मोठी थकबाकी वसूल करण्यात अपयश आलेल्या भाजप सरकारला ग्राहकांवर बोजा टाकण्याचा अधिकार नाही, असा टोला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हाणला आहे.

मडगाव : गोव्यातील वीज वितरण प्रणाली सुधारण्यासाठी २०१९ ते २०२२ पर्यंत १२००० कोटी खर्च करूनही ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. वीज तोटा नियंत्रित करण्यात आणि थकबाकीदारांकडून मोठी थकबाकी वसूल करण्यात अपयश आलेल्या भाजप सरकारला ग्राहकांवर बोजा टाकण्याचा अधिकार नाही, असा टोला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हाणला आहे.

वीज खात्याने संयुक्त विद्युत नियामक आयोगासमोर (जेईआरसी) वीज दरात जवळपास७ ते १४ टक्के वाढ प्रस्तावित करण्यासाठी सादर केलेल्या याचिकेवर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सलग तिसऱ्या वर्षी वीज दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सरकारवर टीका केली आहे.

माझ्या विधानसभेतील प्रश्नांच्या उत्तरांत दिलेल्या माहितीवरून गोव्यात ३४८० थकबाकीदार आहेत ज्यांची थकबाकी १ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. गोवा सरकारचीच २६६९ कार्यालये थकबाकीदार असून, औद्योगिक क्षेत्रातील सुमारे एक हजार थकबाकीदार आणि १३०८१ व्यावसायिक आस्थापनांचे थकबाकीदार आहेत हे स्पष्ट झाले आहे असे त्यांनी नमूद केले.

विधानसभेत दिलेल्या उत्तरांतून गॅरिसन अभियंता, मिलिटरी डेंटल सेंटर यांनी २०१६पासून ५३.०३ लाख, कार्यकारी अभियंता विभाग ८एमआरटी यांच्याकडून तब्बल २.५५ कोटी थकबाकी आहे, तसेच सार्वजनीक बांधकाम खाते, पणजी महानगरपालीका, क्रीडा खाते आणि इतर विविध सरकारी कार्यालयांकडून सरकारला कोट्यावधी रुपयांची थकबाकी येणे आहे हे उघड झाले आहे. थकबाकीदारांमध्ये वीज खात्याचीच वीज वापर शुल्कापोटी सरकारकडे१५.४९ लाख थकबाकी आहे, असे युरी आलेमाव यांनी निदर्शनास आणून दिले.

गोव्यातील वीज वीतरण प्रणाली सुधारण्याला सरकारने आपले प्राधान्य दिले पाहिजे. वीजमंत्री रामकृष्ण उर्फ सुदिन ढवळीकर यांनी गेल्या चार वर्षात झालेल्या तब्बल १२ हजार कोटींच्या खर्चाची चौकशी करावी तसेच विविध थकबाकीदारांकडून, विशेषत: वीज भक्षक कारखाने व आस्थापनांकडून कित्येक कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्याचे एक कालबद्ध लक्ष्य ठरवावे आणि गोव्यातील विविध औद्योगिक आस्थापनांकडून होणारी वीज चोरी थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना आखल्या पाहिजेत, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

महागाई आणि बेरोजगारीमुळे आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी धडपडणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांवर बोजा टाकणे पूर्णपणे अन्यायकारक आहे. वीज दरवाढीचा प्रस्ताव मागे घेण्याची वीजमंत्र्यांना विनंती करतो. मी जेईआरसीसमोर माझा दरवाढीला आक्षेप सादर करेन, अशी माहिती युरी आलेमाव यांनी दिली.

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाelectricityवीज