शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

दोडामार्ग विलिनीकरणाची मागणी निरर्थक : दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 19:29 IST

महाराष्ट्र सरकार सक्षम : तालुक्याच्या विकासासाठी अनेक प्रकल्प

सचिन खुटवळकर/पणजी : दोडामार्ग तालुका गोव्यात विलीन करावा, अशी मागणी जोर धरत असतानाच सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी ही मागणी निरर्थक असल्याचे सांगितले. तालुक्याच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असून अनेक प्रकल्प येऊ घातले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.काही लोकांना अधूनमधून अशा कुरापती काढण्याची सवय असून तालुक्यातील बहुसंख्य लोकांना महाराष्ट्राबद्दल अभिमान असल्याने विलिनीकरणाच्या मुद्द्याला फारसे महत्त्व देण्याची गरज नसल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले. अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान गोव्यातील भाजपच्या काही मंत्र्यांनी दोडामार्गमधील मतदारांना आमिष दाखविताना गोव्यातील सुविधांचा लाभ देण्याचे कबूल केले होते. या नेत्यांनी केलेल्या बुद्धिभेदामुळेच काही तरुण गोव्यात विलिनीकरण करण्याची मागणी करू लागले आहेत. तेथील तरुण गोव्यात रोजगारासाठी जातात व आरोग्य सुविधांसाठी गोव्यावर अवलंबून राहावे लागते, यात नक्कीच तथ्य आहे; परंतु लवकरच आडाळी येथे औद्योगिक वसाहत उभी राहणार असून पाच उद्योजकांनी नोंदणीही केली आहे. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न बºयाच अंशी मिटणार आहे. आरोग्य सेवेबाबत महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच गोवा सरकारशी चर्चा करून तेथील रुग्णालयांत सिंधुदुर्गमधील रहिवाशांना आरोग्य योजनेचा लाभ घेता येईल, याची काळजी घेतली आहे. त्यामुळे विलिनीकरणाच्या मागणीआडून मांडला जाणारा आरोग्य सेवेचा मुद्दाही तकलादू ठरतो, असे केसरकर म्हणाले.तिळारी येथील धरण क्षेत्र परिसरासह दोडामार्ग तालुक्यातील विविध भागांत पर्यटन प्रकल्प विचाराधीन आहेत. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. महाराष्ट्र सरकारच्या कृषी योजनांचा लाभ घेतल्यास परराज्यातच नव्हे, तर परजिल्ह्यातही रोजगारासाठी जाण्याची वेळ तरुणांवर येणार नाही. भेडशी येथे सुसज्ज आरोग्य केंद्र उभारले जात आहे. दोडामार्ग येथील आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचा प्रस्तावही प्रत्यक्षात येईल, असे केसरकर यांनी सांगितले.

गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करा!गोव्यात विलिनीकरण व्हावे, अशी मागणी करणा-यांनी आधी गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करावा, असे केसरकर म्हणाले. खाणबंदी, पर्यटन उद्योगाला लागलेली उतरती कळा आदी कारणांमुळे गोवा सरकारवर आर्थिक कसरती करण्याची वेळ आली आहे. मी वैयक्तिकदृष्ट्या गोव्याच्या व गोमंतकीयांच्या हिताचाच विचार करणारा माणूस आहे. मात्र, तेथील स्थितीचा आढावा घेतल्यास दोडामार्गवासीयांना सत्यस्थिती समजून येईल. त्यांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.

विलिनीकरणासंबंधी चर्चेसाठी रविवारी बैठकदोडामार्ग तालुका गोव्यात विलीन करण्याच्या चळवळीची दिशा ठरविण्यासाठी रविवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी दोडामार्ग येथील गणेश मंदिरात सकाळी १0 वाजता बैठकीचे आयोजन केले आहे. तालुका निर्मितीनंतर चार विधानसभा निवडणुका झाल्या. मात्र, तालुक्याला नेहमीच विकासाच्या प्रक्रियेतून डावलले गेले. या संदर्भात वाचा फोडण्यासाठी तसेच विलिनीकरणाबाबतची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी ही बैठक आयोजित केली आहे.

टॅग्स :goaगोवाkonkanकोकण