शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

गोव्यात खाण लिजांचा  लिलाव व्हायला हवा,  ‘आप’ची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 18:57 IST

गोव्यातील खाण लिजांचा लिलावच व्हायला हवा, अशी स्पष्ट भूमिका आम आदमी पक्षाने घेतली आहे. २00७ ते २0११ या कालावधीत बेकायदा खाण व्यवसायातून तब्बल १६४0 लाख मेट्रिक टन म्हणजेच त्यावेळच्या दरानुसार ९८,४00 कोटी रुपयांची लूट झालेली असून ही रक्कम सरकारने वसूल करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

पणजी : गोव्यातील खाण लिजांचा लिलावच व्हायला हवा, अशी स्पष्ट भूमिका आम आदमी पक्षाने घेतली आहे. २00७ ते २0११ या कालावधीत बेकायदा खाण व्यवसायातून तब्बल १६४0 लाख मेट्रिक टन म्हणजेच त्यावेळच्या दरानुसार ९८,४00 कोटी रुपयांची लूट झालेली असून ही रक्कम सरकारने वसूल करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

पक्षाचे नेते एल्विस गोम्स म्हणाले की, खाणी जनतेची मालमत्ता असल्याने खनिज संपत्तीवर लोकांचा अधिकार आहे. बेकायदा खाण व्यवसायात झालेल्या लुटीवर कोणीही आमदार बोलत नाही उलट केंद्राने वटहुकूम काढावा, अशी जी मागणी करताहेत ती निषेधार्ह आहे. मोपा विमानतळाच्या ठिकाणी एंटरटेन्मेंट झोनमध्ये सर्व कसिनो हलवून ‘मोपा’चे सरकार लास व्हिएशग करु पहात आहे, अशी टीकाही गोम्स यांनी केली. गोम्स म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने खाणी बंद केलेल्या नाहीत केवळ खाण लिजांचा लिलांव करावा, असे निर्देश दिलेले आहेत आणि त्यात वावगे असे काही नाही.  गोम्स पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना खरे तर या आजारपणात विश्रांतीची गरज होती परंतु आपल्या अनुपस्थितीत आघाडी सरकार गडगडू लागते की काय अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आणि ते बजेट मांडण्याच्या निमित्ताने धावत गोव्यात आले. 

पक्षाचे अन्य एक नेते सिध्दार्थ कारापूरकर यांनी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या सीईसीने तब्बल १६४0 लाख मेट्रिक टन खनिजाचा घोटाळा झाल्याचे अहवालात म्हटले आहे, असा दावा करताना त्यावेळचा दर विचारात घेता ही लूट वसूल केल्यास राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या नावावर तब्बल ७ लाख २ हजार ८५७ रुपये म्हणजेच चार जणांच्या एखाद्या छोट्या कुटुंबाच्या नावावर २८ लाख रुपये रक्कम जमा करता येईल तसेच खाणबंदीची झळ पोचलेले ट्रकमालक, बार्जमालक तसेच अन्य अवलंबितांना भरपाई देता येईल. परंतु खाणमालकांशी लागेबांधे असल्याने सरकार ही लूट वसूल करण्यास अनुत्सुक आहे, असा आरोप केला. 

पक्षाचे सचिव प्रदीप पाडगांवकर यांनी उपसभापती मायकल लोबो यांनी खाणींच्या प्रश्नावर उपोषणाचा दिलेला इशारा तसेच चाळीसही आमदारांचे शिष्टमंडळ दिल्लीला नेण्याच्या बाबतीत केलेल्या विधानाचा निषेध केला. आप खाण व्यवसायाच्या विरोधात नाही परंतु खाणींचा लिलांव व्हायला पाहिजे, अशी पक्षाची भूमिका आहे.  म्हादईचे पाणी वळविण्यासाठी कर्नाटकने आवश्यक ती सर्व तयारी केली असताना राज्य सरकार गप्प आहे. म्हादईचे पाणी वळविल्यास दहा वर्षांनंतर उत्तर गोव्यात दुष्काळ पडेल परंतु आमदारांना या प्रश्नाबाबत कोणतेही सोयरसूतक नाही, अशी टीका पाडगांवकर यांनी केली. 

टॅग्स :goaगोवा