शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

दत्ता नाईकांनी देश प्रथम भावना जपली: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 12:40 IST

मिनेझिस ब्रागांझा सभागृहात शनिवारी शिक्षणतज्ज्ञ प्रा. दत्ता नाईक यांच्या हितचिंतकांनी विशेष श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : स्व. प्रा. दत्ता नाईक हे मी पाहिलेले निःस्वार्थी व्यक्तिमत्त्व. त्यांनी त्यांच्या कार्यातून अनेक युवकांना प्रेरित केले आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी युवकांना राष्ट्रवादाकडे नेले. देश प्रथम या भावनेतूनच दत्ता नाईक यांनी आतापर्यंत समाजात काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या युवकांनी त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी काम केले पाहिजे, हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात शनिवारी शिक्षणतज्ज्ञ प्रा. दत्ता नाईक यांच्या हितचिंतकांनी विशेष श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्री सावंत बोलत होते. यावेळी केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, खासदार सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार संकल्प आमोणकर, नरेंद्र सावईकर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते. दत्ता नाईक यांच्याकडून नेहमीच समर्पण भावना शिकायला मिळाली. ते मला जेव्हा जेव्हा भेटले तेव्हा त्यांनी केवळ आदिवासी समाजाच्या हिताचे विषय मांडले. त्यांचे कार्य येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित एक पुस्तक यावे, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

दत्ता नाईक व माझे गुरू-शिष्याचे नाते होते. ते एक कुशल संघटक व शिक्षणतज्ज्ञ होते. माझ्यातील व्यासपीठाची भीती त्यांनीच नाहीशी केली. ते नेहमीच सांगायचे आपल्याला कधीच कमी लेखू नये. याच मंत्राच्या आधारे मी आज यशस्वी झालो, असे खासदार तानावडे म्हणाले. दत्ता नाईक यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून श्रद्धांजली कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी उपस्थित बहुतांश मान्यवरांनी भावना व्यक्त केल्या. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत