शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

धोकादायक शाळेवर बहिष्कार; मोरपिर्ला गावातील पालक आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 12:11 IST

उच्च माध्यमिक विद्यालयाची तातडीने दुरुस्तीची मागणी; दुरुस्ती केल्याचा मुख्याध्यापिकेचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क केपे : शाळा धोकादायक स्थितीत आहे, याची जाणीव करून देऊनसुद्धा सरकारने मोरपिर्ला शासकीय उच्च माध्यमिक स्कूलच्या इमारत दुरुस्तीचे केवळ आश्वासन दिले. ते आश्वासन पाळले नाही. सरकारने आम्हाला दिलेली आश्वासने अद्याप हवेतच आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या मुलांना या धोकादायक इमारत असलेल्या शाळेत पाठविणार नाही, असा ठाम निर्धार रविवारी मोरपिर्ला गावातील पालकांनी केला.

राज्यात आज, सोमवारपासून (दि. ५ जून) नवे शैक्षणिक सत्र सुरू होत आहे. मात्र, जोपर्यंत शाळेची दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत या धोकादायक बनलेल्या शाळेच्या इमारतीत आमच्या मुलांना पाठविणार नाही असा निर्णय पालकांनी जाहीर केला. यावेळी सुमारे १०० हून अधिक पालक उपस्थित होते. पालकांनी मोठ्या संख्येने शाळेबाहेर एकत्र येऊन सरकारला बहिष्काराचा इशारा दिला.

पालक आर्यन गावकर म्हणाले, 'मागील बैठकीमध्ये जेव्हा शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी येऊन शाळेची पाहणी केली होती, तेव्हा झालेल्या बैठकीत त्यांनी आम्हाला मुलांना पाच तारखेला शाळेला पाठविण्याचे आवाहन केले. त्यावेळी बैठकीत पालकांनी शाळा इमारत धोकादायक असल्याने एखादा अपघात अथवा दुर्घटना घडली तर जबाबदार कोण? असा सवाल केला होता. याबाबत लेखी हमी देण्याची मागणी केली. मात्र, त्या अधिकाऱ्यांनी लेखी देण्यास नकार दिला. त्यामुळे आम्ही पालकांनी निर्णय घेतला आहे की, सध्या शाळा ज्या धोकादायक परिस्थितीत आहे ते पाहता आपल्या मुलांना संकटात ढकलणे शक्य नाही. त्यामुळे पालकांनी सोमवारी शाळेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत शिक्षण खाते योग्य तोडगा काढत नाही किंवा शाळेच्या दुरुस्तीचे काम सुरू होत नाही, तोपर्यंत मुलांना पाठविणार नाही.'

पालक राजेंद्र वेळीप म्हणाले, 'मोरपिर्ला स्कूलच्या आवारात शाळेच्या तीन वेगवेगळ्या इमारती आहे. त्यात एक प्राथमिक शाळा तसेच अन्य हायस्कूलच्या इमारती आहेत. तिन्ही इमारतीची गेल्या ४० वर्षांत दुरुस्ती झालेली नाही. सरकार याबद्दल फक्त आश्वासन देत आहे. आम्हाला सरकार सांगते की, तुमच्या मुलांना शाळेला पाठवा. पण जर कुठली दुर्घटना • घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल वेळीप यांनी केला

मुलांना शाळेबाहेर उभे करु

पालकांनी सांगितले की, 'सरकारने शाळेच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले होते; पण ते पूर्ण केलेले नाही. सोमवारपासून शाळा सुरू होत आहेत. मात्र, जोपर्यंत सरकार आम्हाला शाळा दुरुस्तीविषयी निर्णय घेत नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या मुलांना दररोज स्कूलच्या बाहेर घेऊन उभे राहू, पण मुलांना शाळेमध्ये पाठविणार नाही.'

शाळांमध्ये आजपासून मुलांचा किलबिलाट

नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात ही सोमवार पासूनच होणार असल्याचे शिक्षण खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सोमवारी इयत्ता पहिली ते १२ वीपर्यंतचे वर्ग भरणार आहेत. शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितले की, इयत्ता पहिली ते इयत्ता १२ वीपर्यंतचे वर्ग सोमवारी सुरू होणार आहेत. इयत्ता पहिली, पाचवी आणि अकरावीचे अजून प्रवेश पूर्ण न झालेले असू शकतात किंवा प्रवेश प्रक्रिया झाली असली तरी प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यासाठी इतर तांत्रिक समस्या असू शकतात. त्यामुळे या वर्गांना काही प्रमाणात सवलत दिली जाऊ शकते. हे तिन्ही वर्ग सोमवारीच सुरू झाले पाहिजेत, असा आग्रह नाही.

आम्ही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचे काम केले आहे. सर्व वर्गखोल्या रंगवल्या आहेत. शाळेत तीन स्मार्ट क्लासरूम आहेत. रोबोटिक्स लॅब आहे. - मारिया मुरेना मिरांडा, मुख्याध्यापिका

 

टॅग्स :goaगोवाSchoolशाळा