शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याच्या समुद्राला उधाण, ‘लुबान’ व ‘तितली’ या चक्रीवादळांचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 17:22 IST

वातावरण बदलाचे संकट किती तीव्र होऊ लागले आहे, याची चाहूल २०१८ सालीच लागली असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिलेला असतानाच गोव्यात गेले दोन दिवस समुद्राने किना-यावर केलेले आक्रमण त्याचाच भाग असल्याचे जाणवते.

- राजू नायक

गोवा- वातावरण बदलाचे संकट किती तीव्र होऊ लागले आहे, याची चाहूल २०१८ सालीच लागली असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिलेला असतानाच गोव्यात गेले दोन दिवस समुद्राने किना-यावर केलेले आक्रमण त्याचाच भाग असल्याचे जाणवते. समुद्र विज्ञान संस्थेचे माजी संशोधक डॉ. बबन इंगोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना जरी समुद्रपातळी वाढ ‘लुबान’ व ‘तितली’ या दोन चक्रीवादळांमुळे झाली आहे, असे नमूद केले असले तरी अंतिमत: तो वातावरण बदलाचाच परिणाम असल्याचे मान्य केले.

वातावरण बदलामुळे जगभर नैसर्गिक प्रतिक्रियांचे अतितीव्र परिणाम जाणवत असून तापमानाच्या वाढीमुळे आर्क्टिक व अंटार्टिकाचे हिमखंड वितळू लागले आहेत. त्यामुळे समुद्रपातळी वाढ एका बाजूला होत असतानाच दुस-या बाजूला तीव्र पाऊस, वादळे, भूकंप व हवामानातील बदलामुळे पिकांवर परिणाम होऊन दुष्काळी परिस्थितीत वाढ होत आहे.

गोव्यात किनारपट्टी ही समुद्रपातळी वाढीमुळे धोक्यात येऊ शकते. तरीही किना-यावर नियम तोडून अनेक बांधकामे, हॉटेल उभी झाली आहेत. शिवाय खानपानगृहांची संख्या वाढत आहे. ही शॅक्स जरी तात्पुरती असली तरी त्यांचे बांधकाम पक्के असते व ती किना-यांच्या नैसर्गिक परिस्थितीत फेरफार करतात, शिवाय मानवी व्यवहार व कचरा यामुळे हे किनारे संवेदनशील बनले आहेत. यावर्षी ऑलिव्ह रिडले कासवांनी या किना-यांकडे पाठ फिरविली आहे. गालजीबाग व मोरजी किना-यांवर यापूर्वी कासव येत असत.

तज्ज्ञांच्या मते, समुद्रपातळी वाढ झाली किंवा आताच्या सारखे समुद्राचे आक्रमण वाढल्याच्या घटना वारंवार घडल्या तर गोवेकरांच्या आवडीचे मासळीचे उत्पादन घटेल तसेच ‘शॅक्स’ या पर्यटकांच्या आवडीच्या विरंगुळ्याच्या ठिकाणावर संक्रांत येईल. मासळीचे उत्पादन २०१७मध्ये ११७.७  टन झाले असून, गोव्याहून ती निर्यात केली जातेय. त्याशिवाय शॅक्स व्यवसायातही करोडो रुपयांची गुंतवणूक होते. किनारी पर्यटनाच्या ओढीनेच गोव्यात पर्यटक येत असतात.गोव्यात हल्लीच्या काळात पर्यटनाला विलक्षण बरकत आली असून १५ लाख लोकसंख्येच्या गोव्यात हंगामात ८० लाख पर्यटक येत असतात, त्यात सहा लाख विदेशी पर्यटक असतात. यंदा तर चार्टर विमानांच्या संख्येत वाढ होऊन ती हजारावर जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी ९०० चार्टर विमाने उतरली होती. या पर्यटकांचा भर किना-यांवर असतो. त्यामुळे किना-यांवर पर्यटकांची गर्दी वाढलीय, शिवाय तेथे ब-याच बेकायदेशीर बांधकामे व अनिष्ट गोष्टींचा वेढा पडला आहे. या गोष्टी प्रदूषणात भर घालतात व त्यामुळे हे किनारे संवेदनशील बनले आहेत. त्यातच तापमान वाढीचा धोका व समुद्रात नित्यनेमाने येणारी वादळे यांनी किना-यांचा नाश होऊन राज्यावर आर्थिक संकट येण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करतात. डॉ. बबन इंगोले म्हणाले की, मत्स्य उत्पादनावर नक्कीच परिणाम होऊन रोजगार व आर्थिक परिस्थितीवर तीव्र परिणाम होऊ शकतो.

टॅग्स :goaगोवा