शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

महाराष्ट्राकडून धरणाचे काम बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 17:45 IST

कर्नाटकनंतर महाराष्ट्रानेही म्हादईचा प्रवाह गोव्यापासून तोडण्याचा सुरू केलेला प्रयत्न तूर्त थांबला आहे.

मयुरेश वाटवेपणजीः

कर्नाटकनंतर महाराष्ट्रानेही म्हादईचा प्रवाह गोव्यापासून तोडण्याचा सुरू केलेला प्रयत्न तूर्त थांबला आहे. गोव्याच्या आक्षेपानंतर महारष्ट्राने विर्डी धरणाचे काम थांबविले आहे.

धरणाचे काम थांबविले असल्याची खात्री करून घेण्यासाठी जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी विर्डी येथे धरणाच्या साईटवर भेट दिली. या पथकात जलस्रोत खात्याचे संचालक प्रमोद बदामीही होते. धरणाचे बांधकाम पूर्णपणे थांबविण्यात आल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.तसेच त्या साईटची छायाचित्रेही त्यांनी घेतली आहेत.

विर्डी येथे महाराष्ट्र स रकारने धरणाचे बांधकाम सुरू केल्याचे पर्यावरण तज्ज्ञ राजेंद्र केरकर आणि इतर पर्यावरणवाद्यांनी उघडकीस आणल्यानंतर खळबळ उडाली. कर्नाटकनंतर महाराष्ट्रही बेकायदेशीरपणे म्हादई वळविण्याचे काम सुरू करते आणि गोवा सरकारला याचापत्ताही लागत नाही या गोष्टीमुळे पर्यावरणवाद्यांनी संतापही व्यक्त केला होता.

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारला सोमवारी नोटीस बजावली होती.विर्डी येथे धरणाचे बांधकाम कोणत्या अधिकारिणीची परवानगी घेऊन सुरू करण्यात आले त्याचे स्पष्टीकरण मागितले होते. तसेच चालू असलेले बांधकाम त्वरित बंद करण्यास सांगितले होतेमंगळवारी महाराष्ट्र सरकारकडून हे बांधकाम बंद करण्याचा आदेश जारी करण्यात आला. त्यानंतर मंगळवारी सकाळी या साईटवर बांधकाम सुरू झाले नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.