शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महाराष्ट्राकडून धरणाचे काम बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 17:45 IST

कर्नाटकनंतर महाराष्ट्रानेही म्हादईचा प्रवाह गोव्यापासून तोडण्याचा सुरू केलेला प्रयत्न तूर्त थांबला आहे.

मयुरेश वाटवेपणजीः

कर्नाटकनंतर महाराष्ट्रानेही म्हादईचा प्रवाह गोव्यापासून तोडण्याचा सुरू केलेला प्रयत्न तूर्त थांबला आहे. गोव्याच्या आक्षेपानंतर महारष्ट्राने विर्डी धरणाचे काम थांबविले आहे.

धरणाचे काम थांबविले असल्याची खात्री करून घेण्यासाठी जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी विर्डी येथे धरणाच्या साईटवर भेट दिली. या पथकात जलस्रोत खात्याचे संचालक प्रमोद बदामीही होते. धरणाचे बांधकाम पूर्णपणे थांबविण्यात आल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.तसेच त्या साईटची छायाचित्रेही त्यांनी घेतली आहेत.

विर्डी येथे महाराष्ट्र स रकारने धरणाचे बांधकाम सुरू केल्याचे पर्यावरण तज्ज्ञ राजेंद्र केरकर आणि इतर पर्यावरणवाद्यांनी उघडकीस आणल्यानंतर खळबळ उडाली. कर्नाटकनंतर महाराष्ट्रही बेकायदेशीरपणे म्हादई वळविण्याचे काम सुरू करते आणि गोवा सरकारला याचापत्ताही लागत नाही या गोष्टीमुळे पर्यावरणवाद्यांनी संतापही व्यक्त केला होता.

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारला सोमवारी नोटीस बजावली होती.विर्डी येथे धरणाचे बांधकाम कोणत्या अधिकारिणीची परवानगी घेऊन सुरू करण्यात आले त्याचे स्पष्टीकरण मागितले होते. तसेच चालू असलेले बांधकाम त्वरित बंद करण्यास सांगितले होतेमंगळवारी महाराष्ट्र सरकारकडून हे बांधकाम बंद करण्याचा आदेश जारी करण्यात आला. त्यानंतर मंगळवारी सकाळी या साईटवर बांधकाम सुरू झाले नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.