शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

अशाच प्रकारे हळूहळू दाबोळी विमानतळ संपविला जाईल; कॉग्रेस नेता एल्वीस गोंम्सचा आरोप

By पंकज शेट्ये | Updated: February 27, 2024 20:23 IST

दाबोळी संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज असल्याचे आवाहन कॉग्रेस नेता एल्वीस गोंम्स यांनी केले.

पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: मोपा विमानतळावरील विमान वाहतूक वाढवण्यासाठी केंद्र सरकार दबाव आणून दाबोळी विमानतळावरील विमानसेवा तेथे नेणार असल्याचा ८ महीन्यापूर्वी आम्ही केलेला दावा हळू हळू करून खरा ठरत आहे. काही महीन्यापूर्वी एअर इंडियाने गॅटविक जाणारी विमानसेवा आणि ओमान एअर विमान कंपनीने त्यांची विमानसेवा दाबोळी विमानतळावरून मोपा विमानतळावर नेली. आता कतार एअरवेझ विमान कंपनीने त्यांची विमानसेवा दाबोळीवरून मोपावर नेण्याचे ठरवले असून अशा प्रकारे हळू हळू करून भविष्यात दाबोळी विमानतळ पूर्णपणे संपणार आहे. केंद्र सरकारच्या दबावामुळेच दाबोळीवरील विमानसेवा मोपावर जात असून त्यामुळे दक्षिण गोव्यातील हॉटेल, टॅक्सी इत्यादी पर्यटक व्यवसायांनी आर्थिक नुकसानी व्हायला लागलेली आहे. दक्षिण गोव्यातील लोकांना झालेल्या नुकसानीचा बदला लोकसभा निवडणूकीवेळी दक्षिण गोव्यातील मतदारांनी घेऊन दाबोळी संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज असल्याचे आवाहन कॉग्रेस नेता एल्वीस गोंम्स यांनी केले.

मंगळवारी (दि.२७) कॉग्रेस नेता एल्वीस गोंम्स यांनी दाबोळी विमानतळावर येऊन कतार एअरवेझ कंपनीने त्यांची येथील विमानसेवा मोपावर हलवण्याचा निर्णय घेतल्याची माहीती दिली. यावेळी त्यांच्याबरोबर अन्य कॉग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. आठ महीन्यापूर्वी आम्ही केंद्र सरकार दबाव आणून दाबोळीवरील विमानसेवा मोपाला नेण्याचा प्रयत्न करत असल्याची माहीती दिली होती. दाबोळीवरील विमानसेवा मोपाला नेऊन दाबोळी संपवण्याचा प्रयत्न चालला असल्याचे आम्ही त्यावेळी सांगितले होते. त्यानंतर येथील एका सरकार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने आम्ही दाबोळी विमानतळाच्या विषयावरून विनाकारण भिती निर्माण करत असल्याचा आरोप केला होता. दाबोळी विमानतळावरील साधनसुविधेत वाढ करण्यात येत असून दाबोळी बंद होणार नसल्याचा दावा त्यांनी केला होता असे गोम्स यांनी सांगितले.

आम्ही दावा केल्याच्या काही दिवसानंतर प्रथम एअर इंडिया विमानाने त्यांची दाबोळी विमानतळावरून गॅटविकला जाणारी विमानसेवा मोपा विमानतळावर नेली. त्यानंतर ओमान एअरने त्यांची विमानसेवा दाबोळीवरून हलवून मोपावर नेली. आता कतार एअरवेझने त्यांची विमानसेवा दाबोळीवरून मोपाला नेण्याचे निश्चित केल्याची माहीती गोंम्स यांनी दिली. मोपा विमानतळ खासगी व्यवस्थापन चालवत असून त्याच्या हीतासाठी केंद्र सरकार दबाव आणून दाबोळीवरील विमानसेवा तेथे नेत असल्याचा आरोप गोंम्स यांनी केला. मागील काळात दाबोळीवरील विमानसेवा मोपाला नेल्याने दक्षिण गोव्यातील हॉटेल, टॅक्सी इत्यादी पर्यटक व्यवसायांना आर्थिक नुकसानी झालेली असून ती नुकसानी कायमस्वरुपी सोसावी लागणार आहे असे ते म्हणाले.

भविष्यात अशाच प्रकारे हळू हळू करून इतर विमानसेवा दाबोळीवरून हलवून मोपाला नेण्यात येणार असून अशा प्रकारे दाबोळी विमानतळ संपवण्यात येणार असल्याचा आरोप गोंम्स यांनी केला. दाबोळीवरील प्रवासी विमानसेवा पूर्णपणे बंद पाडून हा विमानतळ फक्त मालवाहू (कार्गो) विमानतळ करण्याचा हेतू सरकारचा असल्याचा दावा गोंम्स यांनी करून यामुळे दक्षिण गोव्यातील पर्यटक व्यवसाय ढासाळणार असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारने दाबोळी विमानतळ बंद पाडण्याचे जे षडयंत्र आखले आहे त्यासाठी त्यांना येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत दक्षिण गोव्यातील लोकांनी धडा शिकवण्याची गरज असल्याचे गोंम्स म्हणाले.

टॅग्स :goaगोवाAirportविमानतळcongressकाँग्रेस