शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

सध्या राज्यात हुकूमशाहीचाच अनुभव: युरी आलेमाव  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 12:39 IST

कुडचडे संविधान बचाव अभियान

लोकमत न्यूज नेटवर्क, कुडचडे: सरकारला सामान्य शेतकऱ्यांच्या हिताशी काहीच देणे-घेणे नाही, म्हणूनच संजीवनी साखर कारखाना बंद करण्यात आला. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मांडलेले विविध विषय आपण विधानसभेत मांडणार असून सरकारला उत्तर द्यावेच लागणार. सरकार कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढते, वर्कऑर्डर निघतात पण विकास कामे पूर्ण होत नाही. राज्यात सुरू असलेली हुकुमशाही पोर्तुगीज, सालाझार यापेक्षाही भयानक आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला.

कुडचडे, सावर्डे व सांगे मतदारसंघातील लोकांना आपल्या समस्या मांडता याव्यात यासाठी काँग्रेसने सोमवारी (दि.७) कुडचडे येथे संविधान बचाव अभियान आयोजित केले आहे. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, खासदार विरियातो फर्नांडिस, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता, सविओ डिसिल्वा, प्रदेश महिलाध्यक्षा प्रतीक्षा खलप, युवा अध्यक्ष महेश नाडर, रजनीकांत नाईक, जितेंद्र नाईक आदी उपस्थित होते. यावेळी युरी म्हणाले, की राज्यात बेरोजगारी वाढत चाललेली आहे. युवक व्यसनाकडे वळत आहे, पण सरकारचे लक्ष फक्त भ्रष्टाचार करण्याकडे आहे.

खासदार फर्नाडिस म्हणाले, की पुरेसे पाणी भाजप सरकार देऊ शकत नाही. खाण व्यवसाय सुरू करणार, हे खोटे आश्वासन दिली जात आहे. मात्र, कोळशासाठी काम सुरू आहे. आमदार डिकॉस्ता म्हणाले, की काँग्रेस पक्ष देशासाठी त्याग करणारा पक्ष आहे. आज जी काही विकासकामे दिसत आहेत, ती काँग्रेस पक्षाच्या साठ वर्षांच्या कालावधीत झाली.

'सागरमाला' होऊ देणार नाही: पाटकर

यावेळी पाटकर म्हणाले, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सादर केलेले प्रश्न आणि समस्या हे सरकार सोडवू शकत नाही, हे स्पष्ट झाले आहे. येणाऱ्या विधानसभेत काँग्रेस पक्ष अनेक विषयांवर आवाज उठविणार आहे. नद्याचे प्रदूषण होत आहे, त्यात सागरमाला प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण