शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

सध्या राज्यात हुकूमशाहीचाच अनुभव: युरी आलेमाव  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 12:39 IST

कुडचडे संविधान बचाव अभियान

लोकमत न्यूज नेटवर्क, कुडचडे: सरकारला सामान्य शेतकऱ्यांच्या हिताशी काहीच देणे-घेणे नाही, म्हणूनच संजीवनी साखर कारखाना बंद करण्यात आला. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मांडलेले विविध विषय आपण विधानसभेत मांडणार असून सरकारला उत्तर द्यावेच लागणार. सरकार कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढते, वर्कऑर्डर निघतात पण विकास कामे पूर्ण होत नाही. राज्यात सुरू असलेली हुकुमशाही पोर्तुगीज, सालाझार यापेक्षाही भयानक आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला.

कुडचडे, सावर्डे व सांगे मतदारसंघातील लोकांना आपल्या समस्या मांडता याव्यात यासाठी काँग्रेसने सोमवारी (दि.७) कुडचडे येथे संविधान बचाव अभियान आयोजित केले आहे. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, खासदार विरियातो फर्नांडिस, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता, सविओ डिसिल्वा, प्रदेश महिलाध्यक्षा प्रतीक्षा खलप, युवा अध्यक्ष महेश नाडर, रजनीकांत नाईक, जितेंद्र नाईक आदी उपस्थित होते. यावेळी युरी म्हणाले, की राज्यात बेरोजगारी वाढत चाललेली आहे. युवक व्यसनाकडे वळत आहे, पण सरकारचे लक्ष फक्त भ्रष्टाचार करण्याकडे आहे.

खासदार फर्नाडिस म्हणाले, की पुरेसे पाणी भाजप सरकार देऊ शकत नाही. खाण व्यवसाय सुरू करणार, हे खोटे आश्वासन दिली जात आहे. मात्र, कोळशासाठी काम सुरू आहे. आमदार डिकॉस्ता म्हणाले, की काँग्रेस पक्ष देशासाठी त्याग करणारा पक्ष आहे. आज जी काही विकासकामे दिसत आहेत, ती काँग्रेस पक्षाच्या साठ वर्षांच्या कालावधीत झाली.

'सागरमाला' होऊ देणार नाही: पाटकर

यावेळी पाटकर म्हणाले, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सादर केलेले प्रश्न आणि समस्या हे सरकार सोडवू शकत नाही, हे स्पष्ट झाले आहे. येणाऱ्या विधानसभेत काँग्रेस पक्ष अनेक विषयांवर आवाज उठविणार आहे. नद्याचे प्रदूषण होत आहे, त्यात सागरमाला प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण