शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

विद्यमान सरकारने राज्यातील जनतेची अवस्था जाळ्यात अडकलेल्या किड्यासारखी केली; काँग्रेसची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2024 07:51 IST

राज्यात विकासाच्या नावाखाली जे काही चालते ते पाहावत नाही. बेकायदेशीर गोष्टी वाढत चालल्या आहेत, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील सामान्य लोकांची जी स्थिती आहे ती जाळ्यात अडकलेल्या किड्याप्रमाणे आहे. विद्यमान सरकारनेच ही अवस्था करून ठेवली आहे. आमच्या जमीनी आज परप्रांतियांच्या घशात घातल्या जात आहेत. आपण पोर्तुगीजांना दोष देत असलो, तरी राज्याच्या जमिनी शाबूत ठेवण्यासाठी त्यांनी केलेले कायदे महत्त्वपूर्ण आहेत, असे उद्‌गार माजी केंद्रीय कायदा मंत्री अॅड. रमाकांत खलप यांनी काढले.

सध्याच्या काळात राज्यातील जमिनी वाचवण्याची आणि चक्रव्यूहात अडकलेला गोवा त्यातून बाहेर काढण्याची जबाबदारी सत्ताधारी आणि विरोधकांची आहे, खलप म्हणाले. ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते.

राज्यात विकासाच्या नावाखाली जे काही चालते ते पहावत नाही. बेकायदेशीर गोष्टी वाढत चालल्या आहेत. सीआरझेड नावाची गोष्टच आता राहिलेली दिसत नाही. हे सर्व थांबविण्यासाठी सर्वांनीच एकत्रित काम करणे आवश्यक आहे. आज राज्य उद्ध्वस्त होत असताना 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?' असे पुन्हा पुन्हा विचारले जाणे आवश्यक असल्याचे खलप यांनी सांगितले.

ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ यांनी राज्याच्या राजकारणाचा डोळस इतिहास लिहण्यास सुरुवात केली पाहिजे. गोवा सहकार मित्र मंडळाकडून सहकार क्षेत्रात जे आज चालले आहे त्याची चिकित्सा, चिरफाड करावी, असे आवाहनही अॅड. खलप यांनी केले. राज्यात मोठ्या प्रमाणात जमिनी विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. बोगस कागदपत्रांच्या सहाय्याने अनेक व्यवहार केले जात आहेत. त्यामुळे लोकांनी योग्य पडताळणी करण्याची गरज असल्याचे अॅड. खलप म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस