शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

विद्यमान सरकारने राज्यातील जनतेची अवस्था जाळ्यात अडकलेल्या किड्यासारखी केली; काँग्रेसची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2024 07:51 IST

राज्यात विकासाच्या नावाखाली जे काही चालते ते पाहावत नाही. बेकायदेशीर गोष्टी वाढत चालल्या आहेत, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील सामान्य लोकांची जी स्थिती आहे ती जाळ्यात अडकलेल्या किड्याप्रमाणे आहे. विद्यमान सरकारनेच ही अवस्था करून ठेवली आहे. आमच्या जमीनी आज परप्रांतियांच्या घशात घातल्या जात आहेत. आपण पोर्तुगीजांना दोष देत असलो, तरी राज्याच्या जमिनी शाबूत ठेवण्यासाठी त्यांनी केलेले कायदे महत्त्वपूर्ण आहेत, असे उद्‌गार माजी केंद्रीय कायदा मंत्री अॅड. रमाकांत खलप यांनी काढले.

सध्याच्या काळात राज्यातील जमिनी वाचवण्याची आणि चक्रव्यूहात अडकलेला गोवा त्यातून बाहेर काढण्याची जबाबदारी सत्ताधारी आणि विरोधकांची आहे, खलप म्हणाले. ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते.

राज्यात विकासाच्या नावाखाली जे काही चालते ते पहावत नाही. बेकायदेशीर गोष्टी वाढत चालल्या आहेत. सीआरझेड नावाची गोष्टच आता राहिलेली दिसत नाही. हे सर्व थांबविण्यासाठी सर्वांनीच एकत्रित काम करणे आवश्यक आहे. आज राज्य उद्ध्वस्त होत असताना 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?' असे पुन्हा पुन्हा विचारले जाणे आवश्यक असल्याचे खलप यांनी सांगितले.

ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ यांनी राज्याच्या राजकारणाचा डोळस इतिहास लिहण्यास सुरुवात केली पाहिजे. गोवा सहकार मित्र मंडळाकडून सहकार क्षेत्रात जे आज चालले आहे त्याची चिकित्सा, चिरफाड करावी, असे आवाहनही अॅड. खलप यांनी केले. राज्यात मोठ्या प्रमाणात जमिनी विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. बोगस कागदपत्रांच्या सहाय्याने अनेक व्यवहार केले जात आहेत. त्यामुळे लोकांनी योग्य पडताळणी करण्याची गरज असल्याचे अॅड. खलप म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस