शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील किनाऱ्यांवरील सीआरझेडचे उल्लंघन उघड, सरकारचे आपत्ती व्यवस्थापनही यथातथाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 14:46 IST

वादळामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने गोव्याच्या किनारपट्टीला त्याचा फटका बसल्यानंतर येथील किनाऱ्यांवरील सीआरझेड उल्लंघनाचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत.

पणजी - वादळामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने गोव्याच्या किनारपट्टीला त्याचा फटका बसल्यानंतर येथील किनाऱ्यांवरील सीआरझेड उल्लंघनाचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. त्याचबरोबर राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाची निष्क्रियताही चव्हाट्यावर आली आहे. 'सरकारी यंत्रणेकडून या आपत्तीच्या वेळी कोणतीही मदत मिळाली नाही आम्हाला स्वतःचा या आपत्तीशी सामना करावा लागला, असे अखिल गोवा शॅक व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोज यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

हवामान वेधशाळेने वादळाची आठ दिवसांपूर्वी कल्पना दिली होती. परंतु सरकारने काहीच हालचाली केल्या नाहीत. आम्हाला स्वतःला या संकटाची सामना करावा लागला. शॅकमध्ये पाणी घुसल्याने काही ठिकाणी तात्पुरती बांधकामे हटवावी लागली पलंग वाहून गेले. पर्यटन खात्याची किंवा जिल्हाधिकारी अथवा मामलेदार कार्यालयात कोणीही चौकशीसाठी आले नाहीत, असे अन्य शॅकमालकांनीही या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. 

दुसरीकडे अशा दुर्घटना टाळण्यासाठी  आता भरती रेषेपासून दूर किनाऱ्यावर वाळूच्या टेकड्यांवर शॅक उभारण्याची परवानगी हवी आहे. कार्दोज म्हणाले की, किनाऱ्यापासून जरा मागे टेकड्यांवर शॅक उभारण्यासाठी परवाने दिले असते तर या वादळात शॅक बुडाले नसते.  एकदम किनाऱ्यावर भरती रेषेपासून जवळ जागा देण्याऐवजी थोडी मागे दिली असती तर तेवढे नुकसान झाले नसते. किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाला तशी विनंतीही करण्यात आली होती परंतु वाळूच्या टेकड्या असल्याने तेथे शॅक उभारण्यास परवानगी नाकारण्यात आली. वाळूच्या टेकड्या नष्ट होतील, अशी भीती प्राधिकरणाला असल्यानेच तेथे परवाना दिली जात नाही असे ते म्हणाले.  शॅक उभारणी तात्पुरती असते त्यामुळे वाळूच्या टेकड्या नष्ट होण्याचा प्रश्नच नाही.

दुसरीकडे याबाबतीत शास्त्रज्ञांचे वेगळे मत आहे. येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे माझी शास्त्रज्ञ डॉक्टर आंतोनियो मास्कारेन्हस यांच्या मते शॅकना वाळूच्या टेकड्या पासून किमान तीन मीटर अंतरापर्यंत परवानगी देताच कामा नये. परंतु एकदा का किनाऱ्यावर शॅक उभारण्यासाठी परवानगी मिळाली की वाटेल तसा विस्तार करतात आणि वाळूच्या टेकड्यांवरही अतिक्रमण करतात. वादळाच्या तडाख्यात पाण्याची पातळी वाढून शॅकमध्ये पाणी घुसण्याचा जो प्रकार घडला त्याला किनाऱ्यावरील सीआरझेड उल्लंघनाचे स्वर प्रकारही कारणीभूत आहेत. समुद्राला उधाण आले आणि पाण्याची पातळी वाढली तर या वाळूच्या टेकड्या संरक्षक भिंतीचे काम करुन गावच्या गांव वाचवतात. शॅकमालकांना मात्र त्यांचा व्यवसाय सुरळीत चालावा यासाठी आता या वाळूच्या टेकड्यांची ही गरज भासू लागली आहे.

अशी माहिती मिळते की, गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाची स्पष्ट मार्गदर्शक तत्वे आहेत, जात असे म्हटले आहे की, वाळूच्या टेकडीपासून  दूर कोरड्या जागेत शॅक उभारावेत. असे सांगितले जाते की, सोमवारी पौर्णिमा होती त्यामुळे आधीच समुद्राला भरती होती  त्यात वादळाचा तडाखा बसला त्यामुळे पाण्याची पातळी आणखी वाढली. कार्दोज यांनी दिलेल्या माहितीनुसार मोबोर, केळशी, बाणावली भागात सर्वात जास्त झळ पोचली असून लाखो रुपयांची हानी झाली आहे.

टॅग्स :goaगोवा