शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

घटनात्मक पेचप्रसंगाविरुद्ध काँग्रेस हायकोर्टात जाणार, राज्यपालांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 19:54 IST

राज्याला मुख्यमंत्रीच नाही व मंत्रिमंडळाच्या बैठकाही होत नाहीत. यामुळे सरकारी कारभार ठप्प झाला असून राज्यात जो घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

पणजी : राज्याला मुख्यमंत्रीच नाही व मंत्रिमंडळाच्या बैठकाही होत नाहीत. यामुळे सरकारी कारभार ठप्प झाला असून राज्यात जो घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला आहे, त्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठास याचिका सादर करण्याची शक्यता काँग्रेस पक्ष पडताळून पाहत आहे, असे गोवा प्रदेश काँग्रेसने शनिवारी येथे स्पष्ट केले.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी प्रवक्ते रमाकांत खलप, यतिश नायक व आमदार टोनी फर्नाडिस यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. खलप म्हणाले, की पेचप्रसंगाची सुमोटो पद्धतीने न्यायालयाने दखल घ्यावी अशी विनंती आहे. घटनात्मक यंत्रणाच गोव्यात अस्तित्वात राहिलेली नाही. काँग्रेस पक्षही न्यायालयास याचिका सादर करण्याची शक्यता पडताळून पाहत आहे. आम्ही विचार करत आहोत. न्यायालयाने दखल घेण्यासारखी स्थिती गोव्यात आहे.चोडणकर म्हणाले, की राज्यपालांना काँग्रेसने निवेदन सादर केले होते पण त्यांनी काही कृती केली नाही. राज्यपालांनी 23 दिवसांनंतर आता आमच्या निवेदनाला प्रतिसाद देणारे पत्र लिहिले आहे. तुमचे निवेदन आपण राज्याच्या मुख्य सचिवांकडे पाठवून दिल्याचे राज्यपालांनी काँग्रेसला कळवले आहे. हे करण्यासाठी त्यांना तेवीस दिवसांचा कालावधी लागला, यावरून कोणतीच यंत्रणा सध्या काम करत नाही हे स्पष्ट होते. राजभवनवरून चालत देखील कुणी पर्वरीला मुख्य सचिवांकडे जायचे असे ठरवले तर एका दिवसात जाऊन तिथे परत येता येते पण राज्यपालांनी मुख्य सचिवांकडे काँग्रेसची मागणी पोहचविण्यासाठी तेवीस दिवसांचा कालावधी घेतला. काँग्रेसच्या मागण्या काय आहे ते पाहण्यासाठीही राज्यपालांना वेळ नाही. मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याच्या स्थितीबाबत सरकार साधे बुलेटीन देखील जारी करत नाही. फक्त ते उपचारांना प्रतिसाद देतात एवढेच तीन महिने सांगितले जात आहे.चोडणकर म्हणाले, की गेले तीन महिने प्रशासन ठप्प आहे. तीन महिन्यांत एकदाच मंत्रिमंडळाची बैठक झाली. गोव्याला मुख्यमंत्रीच नाही. गोव्यात आपले लाखो सदस्य आहेत असे भाजपचे नेते सांगतात. मुख्यमंत्रीपदासाठी पात्र असा एक देखील सदस्य त्यांना ह्या लाखोंमधून मिळत नाही काय? अमित शहा यांनी गोल्याला दुसरा मुख्यमंत्री द्यावा. त्यांना लोकांनी कौल दिला नव्हता पण बळजबरीने भाजपने सरकार घडविले व आता गोव्याला नेतृत्वहीन करून ठेवले आहे. तुम्ही नवा सीएम द्या किंवा सत्ता सोडा अशी मागणी आम्ही शहा यांच्याकडे आज रविवारी करणार आहोत. काँग्रेस पक्ष अमित शहा यांच्यासमोर पाच प्रश्न मांडणार आहे. म्हादई पाणी प्रश्नीही त्यांना जाब विचारला जाईल, असे यतिश नायक व खलप यांनी नमूद केले.