शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

घटनात्मक पेचप्रसंगाविरुद्ध काँग्रेस हायकोर्टात जाणार, राज्यपालांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 19:54 IST

राज्याला मुख्यमंत्रीच नाही व मंत्रिमंडळाच्या बैठकाही होत नाहीत. यामुळे सरकारी कारभार ठप्प झाला असून राज्यात जो घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

पणजी : राज्याला मुख्यमंत्रीच नाही व मंत्रिमंडळाच्या बैठकाही होत नाहीत. यामुळे सरकारी कारभार ठप्प झाला असून राज्यात जो घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला आहे, त्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठास याचिका सादर करण्याची शक्यता काँग्रेस पक्ष पडताळून पाहत आहे, असे गोवा प्रदेश काँग्रेसने शनिवारी येथे स्पष्ट केले.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी प्रवक्ते रमाकांत खलप, यतिश नायक व आमदार टोनी फर्नाडिस यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. खलप म्हणाले, की पेचप्रसंगाची सुमोटो पद्धतीने न्यायालयाने दखल घ्यावी अशी विनंती आहे. घटनात्मक यंत्रणाच गोव्यात अस्तित्वात राहिलेली नाही. काँग्रेस पक्षही न्यायालयास याचिका सादर करण्याची शक्यता पडताळून पाहत आहे. आम्ही विचार करत आहोत. न्यायालयाने दखल घेण्यासारखी स्थिती गोव्यात आहे.चोडणकर म्हणाले, की राज्यपालांना काँग्रेसने निवेदन सादर केले होते पण त्यांनी काही कृती केली नाही. राज्यपालांनी 23 दिवसांनंतर आता आमच्या निवेदनाला प्रतिसाद देणारे पत्र लिहिले आहे. तुमचे निवेदन आपण राज्याच्या मुख्य सचिवांकडे पाठवून दिल्याचे राज्यपालांनी काँग्रेसला कळवले आहे. हे करण्यासाठी त्यांना तेवीस दिवसांचा कालावधी लागला, यावरून कोणतीच यंत्रणा सध्या काम करत नाही हे स्पष्ट होते. राजभवनवरून चालत देखील कुणी पर्वरीला मुख्य सचिवांकडे जायचे असे ठरवले तर एका दिवसात जाऊन तिथे परत येता येते पण राज्यपालांनी मुख्य सचिवांकडे काँग्रेसची मागणी पोहचविण्यासाठी तेवीस दिवसांचा कालावधी घेतला. काँग्रेसच्या मागण्या काय आहे ते पाहण्यासाठीही राज्यपालांना वेळ नाही. मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याच्या स्थितीबाबत सरकार साधे बुलेटीन देखील जारी करत नाही. फक्त ते उपचारांना प्रतिसाद देतात एवढेच तीन महिने सांगितले जात आहे.चोडणकर म्हणाले, की गेले तीन महिने प्रशासन ठप्प आहे. तीन महिन्यांत एकदाच मंत्रिमंडळाची बैठक झाली. गोव्याला मुख्यमंत्रीच नाही. गोव्यात आपले लाखो सदस्य आहेत असे भाजपचे नेते सांगतात. मुख्यमंत्रीपदासाठी पात्र असा एक देखील सदस्य त्यांना ह्या लाखोंमधून मिळत नाही काय? अमित शहा यांनी गोल्याला दुसरा मुख्यमंत्री द्यावा. त्यांना लोकांनी कौल दिला नव्हता पण बळजबरीने भाजपने सरकार घडविले व आता गोव्याला नेतृत्वहीन करून ठेवले आहे. तुम्ही नवा सीएम द्या किंवा सत्ता सोडा अशी मागणी आम्ही शहा यांच्याकडे आज रविवारी करणार आहोत. काँग्रेस पक्ष अमित शहा यांच्यासमोर पाच प्रश्न मांडणार आहे. म्हादई पाणी प्रश्नीही त्यांना जाब विचारला जाईल, असे यतिश नायक व खलप यांनी नमूद केले.