शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

गोव्यात इफ्फीच्या आयोजनावरून टीकेचा सूर; अधिवेशन अर्ध्या दिवसात गुंडाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 20:42 IST

कोविडच्या भीतीचे कारण सांगत सरकारने विधानसभा अधिवेशन अर्ध्या दिवसात गुंडाळले. कोविड संकटाबाबतही विधानसभेत चर्चा झाली नाही.

ठळक मुद्देभाजपाचे अनेक कार्यकर्तेही सध्या हे चाललेय काय असे विचारू लागले आहेत. सोशल मिडियावरूनही कार्यकर्ते व्यक्त होत आहेत.

पणजी : सरकार कोविड संकटाचे कारण देऊन राष्ट्रीय क्रिडा स्पर्धाचे आयोजन लांबणीवर टाकते. पण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) मात्र आयोजित करणारच असा आग्रह धरते. यावरून टीकेचा सूर लोकांमध्ये तीव्र होऊ लागला आहे. पणजीला व पूर्ण गोव्यालाही कोविड संकटाने घेरलेले असल्याने व रुग्णांचे मृत्यू थांबविण्याबाबतही सरकार पूर्ण अपयशी ठरलेले असल्याने इफ्फीच्या आयोजनाचा धोका का पत्करला जातो, इफ्फीवर कोट्यवधी रुपये का म्हणून खर्च करावे? असा प्रश्न लोक विचारू लागले आहेत.

कोविडच्या भीतीचे कारण सांगत सरकारने विधानसभा अधिवेशन अर्ध्या दिवसात गुंडाळले. कोविड संकटाबाबतही विधानसभेत चर्चा झाली नाही. केवळ चाळीस आमदार एकत्र येऊन विधानसभा अधिवेशन जास्त दिवस चालवणे हे सरकारला कोविडबाबत धोक्याचे वाटते. पण इफ्फीवेळी देश- विदेशातील हजारो प्रतिनिधी पणजीत येणार आहेत. हे प्रतिनिधी सगळीकडे फिरतील याविषयी सरकारला काही चिंता वाटत नाही. 

सध्या सरकारकडे पैसा नाही व त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठीची गृह कर्ज योजनाही बंद केली गेली. मात्र राज्य सरकार अशावेळी कोटय़वधी रुपये खर्च करून इफ्फीचे आयोजन कसे काय करू पाहते? असा प्रश्न लोकांना पडला आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी इफ्फी आयोजनास आक्षेप घेतला आहे. पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनीही सरकार सोळा कोटी रुपये खर्च करून इफ्फी सध्या का आयोजित करू पाहते, असा प्रश्न विचारला आहे. सरकारी खर्च कपातीच्या गोष्टी मुख्यमंत्री सांगतात. मात्र प्राधान्य इफ्फीच्या आयोजनास देतात. मंत्र्यांना ग्लॅमरचे एवढे आकर्षण आहे काय?अशी विचारणा खंवटे यांनी केली आहे.

भाजपाचे अनेक कार्यकर्तेही सध्या हे चाललेय काय असे विचारू लागले आहेत. सोशल मिडियावरूनही कार्यकर्ते व्यक्त होत आहेत. कोविड संकट काळात इफ्फीचा विचार देखील नको असे भाजपाचे काही प्रमुख पदाधिकारी काही मंत्र्यांना सांगू लागले आहेत. भाजपाच्या एका अनुभवी पदाधिकाऱ्याने ईएसजीवरील काहीजणांशी संपर्क साधला व सध्या इफ्फीच्या आयोजनाविषयी बोलू नका, असा सल्ला दिला आहे. 

टॅग्स :goaगोवाIFFIइफ्फीcorona virusकोरोना वायरस बातम्या