शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी, तरच जरब बसेल - भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 14:28 IST

पणजीहून पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मडगाव शहरात दिवसाढवळ्य़ा तिघा गुन्हेगारांनी एका सराफाचा खून करण्याची घटना घडली.

पणजी : राज्यात कोणताही गुन्हा घडल्यानंतर त्या गुन्ह्यामध्ये जे सापडतात, त्या गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हायला हवी. कडक शासन झाले तरच गुन्हेगारांना जरब बसेल, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी गुरुवारी लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी व्यक्त केले.

पणजीहून पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मडगाव शहरात दिवसाढवळ्य़ा तिघा गुन्हेगारांनी एका सराफाचा खून करण्याची घटना घडली. लोकांच्या समोर सराफाचा जीव गेला. यामुळे पूर्ण गोवा हादरला. चोरीच्या उद्देशाने गुन्हेगार आले होते. ज्या स्वप्नील वाळके नावाच्या पस्तीस वर्षीय तरुण सराफाचा यात बळी गेला, त्याची आई भाजपची ज्येष्ठ पदाधिकारी आहे. या पाश्र्वभूमीवर बोलताना तानावडे म्हणाले, की पोलिस चोवीस तासांत गुन्हेगारांना अटक करतील असा आम्हाला विश्वास होता. सीसीटीव्हीमध्ये काही चेहरे दिसले होते. गुन्हा घडल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्याची गंभीरपणो दखल घेतली व पोलिसांना तपासावेळी पूर्ण स्वातंत्र्य दिले. तपास काम सध्या योग्य दिशेने सुरू आहे.

तानावडे म्हणाले, की तिघा हल्लेखोरांपैकी दोघांना पोलिसांच्या क्राईम ब्रँचने चोवीस तासांत पकडले. तिसरा आरोपीही निश्चितच पकडला जाईल असा आम्हा सर्वाना विश्वास आहे. मी स्वत: मडगावला भेट देऊन मयताच्या आईला भेटलो. खून झाल्याबाबत आम्हाला सर्वानाच फार वाईट वाटले. जिथे सराफाचे दुकान आहे, त्या दुकानालाही मी भेट दिली. दिवसाढवळ्य़ा तिथे खून होणो हे धक्कादायकच आहे. अशा प्रकारच्या गुन्हेगारांना कडक शासन व्हायला हवे ही लोकांचीही इच्छा आहे. गुन्हेगार सुटता कामा नयेत. अनेकदा काहीजण तुरुंगात राहून येतात व सुटल्यानंतरही पुन्हा गुन्हा करतात. गुन्ह्यांची संख्या कमी होण्यासाठी गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हायला हवी. न्यायालयांनी गुन्हेगारांना कडक शासन करावे.

टॅग्स :BJPभाजपाPoliceपोलिस