शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

‘कोविड बॅच’ने केली कमाल, यंदा बारावीचा उच्चांकी ९५.४६ टक्के निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 16:03 IST

गोवा शालान्त मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजीः गोवा शालान्त मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला असून यंदा सरासरी ९५.४६ टक्के निकाल लागला आहे. मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेटये यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी मंडळाचे सचिव विद्यादत्त नाईक, उपसचिव भारत चोपडे, सहाय्यक सचिव शीतल कदम उपस्थित होते.

बारावी परीक्षेत विज्ञान शाखेचा निकाल ९६.१० टक्के लागला असून वाणिज्य शाखेचा निकाल सर्वाधिक ९६.५२ टक्के लागला आहे. कला शाखेचा निकाल ९५.१६ टक्के असून व्यावसायिक विभागाचा निकाल ९२.७५ टक्के लागला आहे. यंदाही मुलींनी निकालाच्या बाबतीत माजी मारताना परंपरा कायम ठेवली आहे. चारही विभागात मिळून एकूण १९,८०२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यात ९,९३० मुले तर ९,८७२ मुली होत्या. यापैकी ९५.०३ टक्के मुले तर ९५.८८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

ग्रामीण विद्यार्थ्यांचा डंका

बारावीच्या परीक्षेत ग्रामीण विद्यार्थ्यांची कामगिरी ही नजरेत भरणारी आहे. सत्तरी तालुक्याचा (८२.९८टक्के) अपवाद वगळता सर्व ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक विद्यालयांनी शहरातील विद्यालयांपेक्षा सरस कामगिरी बजावली आहे. सांगे तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९८.६३ टक्के इतका लागला आहे. काणकोण तालुक्यात ९७.५७ टक्के, बार्दशात ९७.१९ टक्के निकाल लागला आहे. पेडणेत ९५.५१ टक्के निकाल लागला आहे. शहरी भागांत सर्वाधिक निकाल तिसवाडीत २७.८३ टक्के इतका लागला आहे.

मुलीच सरस

यंदाही मुलींनी मुलांपेक्षा सरस कामगिरी बजावताना उत्तीर्ण टक्केवारी ९५.८८ इतकी लावली. मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ९५.०३ आहे.

मने जिंकली.....

२०२१ मध्ये कोविड महामारीमुळे दहावीच्या परीक्षाच होऊ शकल्या नव्हत्या. अंतर्गत मूल्यांकनाद्वारे ही मुले उत्तीर्ण झाली होती. कोविडमुळे उत्तीर्ण झाले, म्हणून अनेक लोक त्यांची थट्टा करीत होते. आज बारावीचा निकाल लागला तो त्याच बॅचचा ५ वर्षातील सर्वाधिक निकाल लावून या बँचने थट्टा करणायांची तोंडे बंद केली.

दोन टर्ममध्ये परीक्षा

कोरोना महामारीच्या काळात सीबीएसई दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा या दोन टर्ममध्ये घेण्यात आल्या होत्या. गोवा शालान्त मंडळानेही त्याच धर्तीवर २ सत्रात परीक्षा घेतल्या होत्या. दोन्ही सत्रातील गुण एकत्र करून निकाल जाहीर करण्यात आला आहे.

१० हजार विद्यार्थ्यांना ६०-८० % गुण

इयत्ता दहावीत परीक्षा न घेता उत्तीर्ण करण्यात आलेली कोविडची बॅच म्हणून थट्टा करणाऱ्यांना चपराक देताना आणखी एक महत्त्वपूर्ण कामगिरी या बेंचने केली आहे. या बॅचचे १०,२९९ विद्यार्थी म्हणजेच ५० टवण्याहून अधिक विद्याथ्र्यांनी ६० ते ८० टक्के गुण मिळविले आहेत.

फोटोकॉपी अर्ज १३ पर्यंत

उत्तरपत्रिकाच्या फोटो कॉपी मागणारे विद्यार्थी ते १३ मे पर्यंत मागू शकतात. प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिकेला ३५० रुपये आकारले जाणार आहेत. फेरमूल्यांकनासाठी ७०० रुपये शुल्क असून २८ मे त्यासाठी अंतिम तारीख आहे. अॅक्सेन्सिया पद्धतीने व्हेरिफिकेशनसाठी दर विषयाला १०० रुपये शुल्क असून त्यासाठी १८ मेपर्यंत मुदत आहे

 

टॅग्स :goaगोवाEducationशिक्षणHSC Exam Resultबारावी निकाल