शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

गोव्यातील विद्यालयांमध्ये समुपदेशक; हाताळतात वर्षाकाठी १५ हजार प्रकरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 15:24 IST

विद्यार्थ्यांमधील ताणतणाव ही जागतिक समस्या बनली असताना गोवा हे देशातील एकमेव राज्य आहे, जेथे इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने समुपदेशक नेमले आहेत.

पणजी : विद्यार्थ्यांमधील ताणतणाव ही जागतिक समस्या बनली असताना गोवा हे देशातील एकमेव राज्य आहे, जेथे इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने समुपदेशक नेमले आहेत. राज्यातील २0८ माध्यमिक विद्यालये आणि ५७ हायर सेकंडरींमध्ये ७२ समुपदेशक आणि १७ पर्यवेक्षक गोवाशिक्षण विकास महामंडळातर्फे कार्यरत आहेत. 

समुपदेशकांच्या प्रमुख म्हणून काम करणा-या परीशा प्रभुगांवकर यांनी विद्यार्थ्यांच्या समस्यांचे वेगवेगळे पैलू ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत उघड केले. त्या म्हणाल्या की,‘ इयत्ता नववीत पोचल्यानंतर विद्यार्थ्यांना शिक्षणाबाबतचा ताण तणाव प्रचंड असतो. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी पालकांचा दबाव, परीक्षेबद्दलची भीती या गर्तेत विद्यार्थी सापडतो आणि त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. समस्याग्रस्त एकूण विद्यार्थ्यांपैकी ३0 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी इयत्ता नऊवीतील असतात. वर्षाकाठी १५ हजारांहून अधिक  प्रकरणे हाताळली जातात. 

नेमक्या कोणत्या समस्या विद्यार्थ्यांमध्ये आढळतात, असा प्रश्न केला असता त्या म्हणाल्या की, ‘ मानसिक आरोग्य, अभ्यासातील अडचणी, भावनिक तसेच करियरशी संबंधित समस्यांव्यतिरिक्त अशा ताणतणावाचे प्रमाण लक्षणीय आहे. मुलींमध्ये आरोग्याच्या समस्याही असतात. मासिक पाळीसारख्या समस्यांमध्ये मुली गोंधळून जातात. त्यांना या वयात समुपदेशनाची गरज असते.’ 

तुम्ही अशा प्रकारच्या समस्या कशा प्रकारे हाताळता या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, ‘सकारात्मक दृष्टिकोन देणे आणि त्यांच्यातील कौशल्य हेरुन कला गुणांना वाव देणे अशी कामे आम्ही करीत असतो. एखादा विद्यार्थी जास्तच ताणावाखाली दिसून आला तर गरजेनुसार पालकाच्या संमतीने मानसोपचार तज्ञाकडून वैद्यकीय उपचारही करुन घेतले जातात.’

अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या की,‘शिक्षण विकास महामंडळाने २0१३ साली ६५ समुपदेशक आणि १२ पर्यवेक्षक घेऊन सरकारी व अनुदानित विद्यालयांमध्ये हा उपक्रम सुरु केला. विद्यालयामध्ये १ हजारपेक्षा जास्त विद्यार्थीसंख्या असल्यास आठवड्यातून तीन दिवस समुपदेशक या विद्यालयांमध्ये जात असतात. समुपदेशक तसेच पर्यवेक्षकांसाठी वेळोवेळी कार्यशाळा तसेच प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जातात. दर आठवड्याला तालुका स्तरावर समुपदेशकांच्या तसेच पर्यवेक्षकांच्या बैठका घेतल्या जातात.  या कामाचा वेळोवेळी आढावा घेतला जातो. समुपदेशकांचेही काही प्रश्न असतात. त्यांच्यासाठीही कार्यशाळा घेतल्या जातात. 

टॅग्स :goaगोवाEducationशिक्षण