शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

गोव्यातील विद्यालयांमध्ये समुपदेशक; हाताळतात वर्षाकाठी १५ हजार प्रकरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 15:24 IST

विद्यार्थ्यांमधील ताणतणाव ही जागतिक समस्या बनली असताना गोवा हे देशातील एकमेव राज्य आहे, जेथे इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने समुपदेशक नेमले आहेत.

पणजी : विद्यार्थ्यांमधील ताणतणाव ही जागतिक समस्या बनली असताना गोवा हे देशातील एकमेव राज्य आहे, जेथे इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने समुपदेशक नेमले आहेत. राज्यातील २0८ माध्यमिक विद्यालये आणि ५७ हायर सेकंडरींमध्ये ७२ समुपदेशक आणि १७ पर्यवेक्षक गोवाशिक्षण विकास महामंडळातर्फे कार्यरत आहेत. 

समुपदेशकांच्या प्रमुख म्हणून काम करणा-या परीशा प्रभुगांवकर यांनी विद्यार्थ्यांच्या समस्यांचे वेगवेगळे पैलू ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत उघड केले. त्या म्हणाल्या की,‘ इयत्ता नववीत पोचल्यानंतर विद्यार्थ्यांना शिक्षणाबाबतचा ताण तणाव प्रचंड असतो. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी पालकांचा दबाव, परीक्षेबद्दलची भीती या गर्तेत विद्यार्थी सापडतो आणि त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. समस्याग्रस्त एकूण विद्यार्थ्यांपैकी ३0 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी इयत्ता नऊवीतील असतात. वर्षाकाठी १५ हजारांहून अधिक  प्रकरणे हाताळली जातात. 

नेमक्या कोणत्या समस्या विद्यार्थ्यांमध्ये आढळतात, असा प्रश्न केला असता त्या म्हणाल्या की, ‘ मानसिक आरोग्य, अभ्यासातील अडचणी, भावनिक तसेच करियरशी संबंधित समस्यांव्यतिरिक्त अशा ताणतणावाचे प्रमाण लक्षणीय आहे. मुलींमध्ये आरोग्याच्या समस्याही असतात. मासिक पाळीसारख्या समस्यांमध्ये मुली गोंधळून जातात. त्यांना या वयात समुपदेशनाची गरज असते.’ 

तुम्ही अशा प्रकारच्या समस्या कशा प्रकारे हाताळता या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, ‘सकारात्मक दृष्टिकोन देणे आणि त्यांच्यातील कौशल्य हेरुन कला गुणांना वाव देणे अशी कामे आम्ही करीत असतो. एखादा विद्यार्थी जास्तच ताणावाखाली दिसून आला तर गरजेनुसार पालकाच्या संमतीने मानसोपचार तज्ञाकडून वैद्यकीय उपचारही करुन घेतले जातात.’

अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या की,‘शिक्षण विकास महामंडळाने २0१३ साली ६५ समुपदेशक आणि १२ पर्यवेक्षक घेऊन सरकारी व अनुदानित विद्यालयांमध्ये हा उपक्रम सुरु केला. विद्यालयामध्ये १ हजारपेक्षा जास्त विद्यार्थीसंख्या असल्यास आठवड्यातून तीन दिवस समुपदेशक या विद्यालयांमध्ये जात असतात. समुपदेशक तसेच पर्यवेक्षकांसाठी वेळोवेळी कार्यशाळा तसेच प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जातात. दर आठवड्याला तालुका स्तरावर समुपदेशकांच्या तसेच पर्यवेक्षकांच्या बैठका घेतल्या जातात.  या कामाचा वेळोवेळी आढावा घेतला जातो. समुपदेशकांचेही काही प्रश्न असतात. त्यांच्यासाठीही कार्यशाळा घेतल्या जातात. 

टॅग्स :goaगोवाEducationशिक्षण